शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये प्रदूषणकारी प्लान्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 2:30 AM

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

- धीरज परबमीरा रोड : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ तसेच इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये सर्रास प्रदूषणकारी अनेक आरएमसी प्लान्ट सुरू असल्याने वन्यजीव, पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परंतु, वनविभागासह महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या आरएमसी प्लान्टवर कारवाई करण्याऐवजी पाठीशी घालण्याची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.चेणेगाव हे पूर्णपणे इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये येते. तसे असताना येथे सर्रास दोन आरएमसी प्लान्ट चेणे नदीकिनारी सुरू आहे. वरसावेही इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये मोडत असताना येथेही प्लान्ट चालवला जातो. घोडबंदर गावाजवळ तर एका ओळीने प्रदूषणकारी आरएमसी प्लान्ट सुरू आहेत. महापालिकेच्या प्रभाग १३ व १४ मध्ये सुरू असलेल्या या ८ ते १० आरएमसी प्लान्टमुळे मोठ्या प्रमाणात सिमेंट, रासायनिक पावडर, खडी आदींचे कण हवेत मिसळतात. रस्त्यापासून घरांमधील भांड्यांवर सतत या कणांचा थर साचत असतो. श्वास घेण्यासही अनेकांना त्रास होतो. श्वसनाबरोबरच खाण्यातूनही कण शरीरात जातात.मानवी आरोग्याला घातक अशा सततच्या या कणांमुळे नागरिकांमध्ये दमा, खोकला आदी विकार बळावू लागले आहेत. रस्त्यांवर तर वाहनांच्या येजामुळे हवेत पांढरा थर दिसून येतो. नवजात बालक, लहान मुले, वृद्ध, रुग्ण तसेच महिलांना तर खूपच त्रास होत असतो.या प्लान्टमुळे मानवी आरोग्यासह वन्यजीव व पर्यावरणालाही धोका निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. बक्कळ कमाई असलेल्या प्रदूषणकारी आरएमसी प्लान्टची काटेकोर तपासणी केली जात नाही. कारवाईची जबाबदारी ही वनविभागासह जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाची असताना त्यांच्याकडून या प्लान्टना पाठीशी घातले जाते. या भागातील ८ ते १० प्लान्टना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर, आणखी दोन नोटिसा बजावल्या जाणार आहेत. सनियंत्रण समितीने प्रस्ताव फेटाळले, तर नाहरकत न देता प्लान्टवर कारवाई करता येईल, असे सूत्रांनी सांगितले.वनविभागाकडून नाहरकत आल्यानंतर मंडळाकडून परवानगी दिली जाते. चेणे येथील दोन प्लान्टची पाहणी केली असता वनविभागाची नाहरकत त्यांनी दाखवली. पण, आवश्यक बाबींची पूर्तता नसल्याने त्यांना कळवले आहे. घोडबंदर येथील एका प्लान्टला नोटीस बजावली आहे. निवडणुकीनंतर पाहणी करून आवश्यक कार्यवाही केली जाईल. - सुवर्णा गायकवाड, विभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळइकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये आरएमसी प्लान्ट हे हरित क्षेत्रात मोडत असल्याने चालवता येतात. त्यांना परवानगी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घ्यायचा आहे.- दिनेश सिंग, सहायक वनसंरक्षकनियमांचे उल्लंघन करून चालणाऱ्या प्रदूषणकारी बेकायदा आरएमसी प्लान्टमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाळीव जनावरे, वन्यजीव तसेच पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. परंतु, यंत्रणा कारवाईस टाळाटाळ करत आहेत. हे सर्व प्लान्ट बंद करून पाडून टाकावेत व त्यांच्या चालकांवर गुन्हा दाखल करावा. बेजबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे. - निलेश फापाळे, तक्रारदार

टॅग्स :pollutionप्रदूषण