शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

कल्याण जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी शांततेत मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 6:28 PM

कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. मतदानासाठी विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या.

कल्याण- कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. मतदानासाठी विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. कल्याण तालुक्यात दुपारपर्यंत 55 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी पाहता सगळ्याच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.वरप गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका मतदान केंद्रावर 1 हजार 27 मतदारांचे मतदान होते. दुपारी 1 वाजता या मतदान केंद्रावर 40 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला होता. कांबा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन मतदान केंद्रावर दुपारी दीड वाजेर्पयत 61 ते 70 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी संपूर्ण तालुक्यात दुपारी एक वाजता 48 टक्के असताना कांबा गावातील मतदानाची टक्केवारी पाहता कांबा गावातील मतदारांनी मतदानात आघाडी घेतली असल्याचे दिसून आले.कल्याण तालुक्यातील चार गण सोडता अन्य ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादीची युती असली तरी कांबा गटातून निवडणूक लढविणारे शिवसेनेचे उमेदवार संदीप पावशे यांनी सांगितले की, केवळ कांबा गटातच शिवसेना-भाजपाची युती आहे. जास्तीचे मतदान हे आम्हाला फायदेशीर ठरू शकते, असा दावा पावशे यांनी केला. म्हारळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रात मतदारांनी मतदानासाठी एकच गर्दी केली होती. म्हारळ गावातील मतदान प्रक्रिया कशा प्रकारे सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह युवा सेनेचे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे, उल्हासनगरचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी भेट दिली.प्रत्यक्ष पाहणी पश्चात खासदार शिंदे यांनी सांगितले की, मतदानाची आकडेवारी पाहता शिवसेना राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळतील. जिल्हा परिषदेवर शिवसेनाचा भगवा झेंडा फडकेल, असा दावा खासदार शिंदे यांनी यावेळी केला.नेवाळी आंदोलनामुळे खोणीत तणावपूर्ण शांततेत मतदाननेवाळी विमानतळासाठी ब्रिटिश काळात शेतक-यांच्या जमिनी घेतल्या होत्या. त्या परत मिळाव्यात यासाठी नेवाळी परिसरातील शेतक-यांनी जून 2017 मध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनापश्चात खोणी व पिंपरी परिसरात निवडणूक होत असल्याने खोणी परिसरात तणावपूर्ण शांतते मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. 2002 साली नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेली 14 गावे ही कल्याण तालुक्यातील तहसील व कल्याण पंचायत समितीला जोडल्याने या गावांनी खोणी गट व पिंपरी गणासाठी मतदान केले.

मांजर्लीत बदलापूर मांजर्ली गावातील मांजर्ली गटाच्या मतदार यादीत बदलापूर मांजर्ली गावातील 80 मतदारांची नावे मिळून आली. मतदान प्रतिनिधींनी या नावांना आक्षेप घेतला. मात्र हा आक्षेप मतदान अधिका-यांनी धुडकावून लावला. 

टॅग्स :kalyanकल्याण