शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
2
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
3
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
4
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
5
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
6
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
7
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
8
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
9
“२५० जागांवर तयारीचे राज ठाकरेंचे आदेश, स्वबळावर विधानसभा निवडणूक...”: बाळा नांदगावकर
10
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
11
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
12
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
13
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
14
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
15
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
16
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
17
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
18
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
19
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
20
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात

राजकारण्यांचा ४00 कोटींच्या स्टेम प्राधिकरणावर डोळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 1:52 AM

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, केडीएमसी आणि मीरा भाईंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना पाणीपुरवठा करणारे स्टेम प्राधिकरण पाच वर्षांपूर्वी आर्थिक संंकटात सापडले होते.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, केडीएमसी आणि मीरा भार्इंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना पाणीपुरवठा करणारे स्टेम प्राधिकरण पाच वर्षांपूर्वी आर्थिक संंकटात सापडले होते. मात्र, आता या प्राधिकरणाची ४०० कोटी रुपयांच्या जवळपास मालमत्ता आहे. तीवर डोळा ठेवून या कंपनीवर आपल्या निकटवर्तींची वर्णी लावण्यासाठी राजकारण्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.स्टेमघर प्राधिकरण ही पाणीपुरवठा करणारी देशातील पहिली व एकमेव कंपनी आहे. २०१४ पर्यंत या कंपनीच्या अभियंत्याचे वेतन करण्याचीदेखील ऐपत नव्हती. आर्थिक डबघाईला आलेल्या या कंपनीला सावरण्यासाठी सेवानिवृत्त विवेकानंद चौधरी यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आणि त्यांनी महापालिकांकडे थकलेली पाणीपट्टी कायदेशीर बाजूने वसूल केली. आता कंपनीला गेल्या पाच वर्षांत २८० कोटी रूपये नफा प्राप्त होऊन कंपनीची मालमत्ता ४०० कोटी रुपयांची झाली आहे. या कंपनीच्या मालमत्तेवर डोळा ठेवून महापालिकांमधील काही वरिष्ठ राजकारण्यांनी या प्राधिकरणावर आपल्या निकटवर्तींची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी वेगवगेळ्या कुरापती सुरू केल्याचे ऐकायला मिळत आहे.उल्हास नदीवरून पाणी उचलणारे स्टेम प्राधिकरण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या काही भागासह भिवंडी, मीरा भार्इंदर आणि ठाणे महापालिका आदींमधील ४० लाख नागरिकांना पाणीपुरवठा करते. भिवंडी महापालिकेकडे १५ वर्षांपासूनची पाणीपट्टी रखडली होती. या महापालिकेसह मीरा भार्इंदर महापालिकेकडे रखडलेल्या कोट्यवधी रुपयांचे बिल लवादाच्या कायद्यानुसार वसूल करण्यात यश मिळाले आहे. आता स्टेमची ४०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तीवर डोळा ठेवून या कंपनीच्या व्यवस्थापकपदी निकटवर्तीय अभियंत्याची वर्णी लावण्याच्या काही राजकारण्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी कुरापती करून या प्राधिकरणाच्या व्यवस्थापनावर आप्तस्वकीय अभियंत्यांची वर्णी लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.नवीन यंत्रणाही उभारलीठेकेदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने कायम केले आहे. याशिवाय कंपनी व्यवस्थापनाने दोन किलोमीटरची नवीन पाईपलाईन टाकली आहे. एक नवा पंपहाऊस उभा केला असून वाया जाणारे पाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरण्यास योग्य करण्यासाठी प्रकल्पही उभारला आहे.जिल्ह्यात सुरळीत पाणीपुरवठा करणारी कंपनी म्हणून आता महापालिकांचा या प्राधिकरणावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्याकडून थकीत बिलासह दर महिन्याची पाणीपट्टीदेखील वेळेवर मिळत आहे.कंपनीचे आर्थिक उत्पन्न वाढत असल्यामुळे या सोन्याची अंडी देणाºया कंपनीवर आपला निकटवर्ती व्यवस्थापक घुसवण्यासाठी राजकारण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सध्याच्या व्यवस्थापनाविरोधात यानात्या कारणाने कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे.२८० कोटी रुपयांचा नफादैनंदिन पाणीपुरवठा करणाºया या कंपनीकडे जिल्ह्यातील अन्यही गावांच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. स्टेम प्राधिकरणाची स्थापना २०११ ला झाली असता, त्यावेळी प्राधिकरणाकडे १७० कोटी रुपयांची मालमत्ता होती. पण अवघ्या तीन वर्षांत, म्हणजे २०१४ पर्यंत कंपनी डबघाईला येऊन ३० कोटींवर तग धरून उभी होती. आता कंपनी २८० कोटी रुपयांच्या नफ्यात आहे. भिवंडी महापालिका दरमहा एक कोटी रुपयांच्या पाणीबिलासह थकीत रक्कम महिन्याकाठी देत आहे. पुढील वर्षभरात कंपनीची ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता होणार आहे.

टॅग्स :thaneठाणे