शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण; पत्रकार परिषदेत आव्हाडांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:59 IST

...ही बाब  कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्याला पकडले आणि त्यानंतर आव्हाड यांनी चौकशी करताच, तो ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचा कर्मचारी असल्याचे उघड झाले. 

ठाणे : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची शुक्रवारी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू असताना, पत्रकारांच्या गराड्यात शिरून एकजण मोबाइलमध्ये परिषदेसह उपस्थितांचे चित्रीकरण करू लागला. ही बाब  कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्याला पकडले आणि त्यानंतर आव्हाड यांनी चौकशी करताच, तो ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचा कर्मचारी असल्याचे उघड झाले. 

पोलिसांकडून आपल्या घरावर लक्ष ठेवले जात असल्याचा आरोप संतापलेल्या आव्हाडांनी केला आव्हाड यांच्या निवासस्थानी शुक्रवारी पत्रकार परिषद सुरू असताना माध्यमांचे प्रतिनिधी परिषदेचे चित्रीकरण करीत होते. दरम्यान, एका व्यक्तीने मोबाइलमधून पत्रकार परिषदेसह तिथे उपस्थितांच्या चित्रीकरणास सुरुवात केली. 

आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्या व्यक्तीला बाजूला करीत त्यांच्याकडे विचारणा सुरू केली.  त्या व्यक्तीने ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेतील वर्तकनगर विभागाचा कर्मचारी असल्याची माहिती दिली. घरात शिरून चित्रीकरण करण्याची परवानगी कोणी दिली, अशी विचारणा आव्हाड यांनी करताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार चित्रीकरण केल्याची कबुली त्याने दिली. जोपर्यंत अशी चित्रीकरणाची सूचना देणारा अधिकारी येत नाही,  तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला तिथेच थांबवून ठेवण्याची भूमिका आव्हाड यांनी घेतली.

आमच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडवर लक्ष ठेवले असते तर, तो आधी पकडला गेला असता. माझ्या घरात चित्रीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित करून हात वर केले असते. त्या कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा येऊ नये म्हणून त्याला सोडून दिले. - आ. जितेंद्र आव्हाड, ठाणे. 

राजकीय पत्रकार परिषद असल्याने या कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी चित्रीकरण केले. राजकीय घडामाेडी नाेंदविणे, माहिती घेणे या कामासाठी ताे तिकडे गेला हाेता. ताे त्याच्या कामाचा एक भाग हाेता. त्याला तसे करण्यास सांगितले नव्हते.- पाेलिस अधिकारी, विशेष शाखा, ठाणे.

सरपंच संताेष देशमुख यांची इलेक्शन फंडासाठी हत्या- बीडचे सरपंच संताेष देशमुख यांची हत्या इलेक्शन फंडासाठी झाल्याचा खळबळजनक आराेप शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.- ठाण्यातही पर्यावरण तसेच आवश्यक परवानगी मिळण्याआधीच ठाणे खाडी किनारी मार्गाचे कंत्राट कसे दिले, असा प्रश्न उपस्थित करीत निवडणूक निधीसाठी परवानगी आधी प्रकल्पाचे कंत्राट दिल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिस