शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

हॉटेल  मालकांनी वहानांची सोय न केल्याने भिवंडीत ३१६ तळीरामांवर पोलीस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 7:24 PM

भिवंडी : नववर्षाच्या स्वागताच्या निमीत्ताने ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी शहर आणि परिसरांतील हॉटेल व धाब्यांवर पहाटेपर्यंत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. ...

ठळक मुद्देभिवंडीत ३१६ तळीरामांवर कारवाईवहाने चालविण्याचा परवाना रद्द होणार?हॉटेल व धाबा मालकांनी मद्यग्राहकांसाठी केली नाही प्रवासी वहाने

भिवंडी: नववर्षाच्या स्वागताच्या निमीत्ताने ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी शहर आणि परिसरांतील हॉटेल व धाब्यांवर पहाटेपर्यंत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये सहभागी झालेल्या तळीरामांना घरी जाण्याची सोय हॉटेल व धाबा मालकांनी न केल्याने अखेर त्यांना दारूच्या नशेत दुचाकी व चारचाकी चालविताना वहातूक पोलीसांनी पकडून कारवाई केली. भिवंडीतील तीन वहातूक पोलीस कार्यालयाने मिळून ३१६ तळीरामांवर कारवाई केली.शहर व परिसरांतील हॉटेल व धाब्यांवर गेल्या तीन दिवसांपासून रोषणाई करून ग्राहकांना आकर्षीत केले होते. त्यामुळे वर्षाअखेरीच्या निमीत्ताने तळीरामांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. काल रोजी रात्री शहर व ग्रामिण भागात स्थानिक पोलीस व वहातूक पोलीसांनी तळीरामांच्या वहानांच्या गतीमान वहातूकीस प्रतिबंध करण्याच्या निमीत्ताने ठिकठिकाणी नाकेबंदी केली होती. तेथे तीन वहातूक शाखेच्या वतीने ड्रन्क अ‍ॅण्ड ड्राईव्ह प्रतिबंधक कारवाई केली. त्यापैकी शहर वहातूक शाखेने ९४,नारपोली वहातूक शाखेने १४७ व रांजनोली वहातूक शाखेने १०५ अशा एकुण ३१६ तळीरामांना मद्यप्राशन करून वहाने चालविताना पकडून कारवाई केली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अशा चालकांचे लायसन्स सहा महिने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार वहातूक पोलीस किती जणांवर कारवाई करणार आहेत,या कडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. वास्तविक दारू पिण्यास येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी प्रवासी वहानांची सोय करून देण्याच्या सुचना शासनाने परवाना धारकांना दिले आहेत. परंतू कोणीही दारू अथवा बिअरबार परवाना धारकांनी अशा प्रकारच्या वहानांची सोय केलेली नाही. त्यामुळे अशा परवानाधारक धाबे व हॉटेलमालकांवर उत्पादन शुल्क विभाग व पोलीसांनी कारवाई केलेली नाही. त्यामुळे पोलीसांची दुटप्पी भूमीका असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह