शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

कवी मधुकर जोशी यांचे निधन; वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 02:43 IST

जोशी गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना वरचेवर डायलेसिस करावे लागणार होते. रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डोंबिवली : ‘आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे’ या आणि यासारख्या अनेक काव्यपंक्तींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कवी मधुकर जोशी (९०) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मालती, डॉ. अविनाश, डॉ. शिरीष, जगदीश ही तीन मुले व डॉ. अलकानंद आणि अंजली या दोन मुली असा परिवार आहे.जोशी गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना वरचेवर डायलेसिस करावे लागणार होते. रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर डोंबिवली स्मशानभूमीत अत्यंत मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.जोशी यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३० रोजी झाला. त्यांचे वडील नीलकंठ हे संत साहित्याचे अभ्यासक होते. वडिलांकडून साहित्याचे बाळकडू जोशी यांना मिळाले. जोशी यांचे शालेय शिक्षण नाशिक येथे झाले. त्यांनी सहावीत असताना पहिली कविता ‘गांधीस वंदन’ (चंद्रकांता) ही कविता लिहीली. केंद्र सरकारच्या सेन्ट्रल एक्साईज विभागात काम करणारे जोशी १९८८ साली सेवानिवृत्त झाले. शास्त्रीय गायक डी. व्ही. पलुस्कर यांच्याशी जोशी यांचा परिचय झाला. पलुस्कर यांनी एचएमव्ही कॅसेट कंपनीचे संचालक जी. एन. जोशी यांच्याशी जोशी यांचा परिचय करुन दिला. १९५३ मध्ये आकाशवाणीवरून जोशी यांनी लिहिलेल्या भूपाळीचे प्रसारण करण्यात आले. जोशी यांच्या गीतांची पहिली रेकॉर्ड प्रकाशित झाली. या रेकॉर्डच्या एका बाजूला ‘मालवल्या नभमंदिरातल्या तारांच्या दीपिका’ आणि दुसऱ्या बाजूला ‘ राधिकेचा राऊळी ये मोहना मधुसुदना’ हे होते. आकाशवाणीवरील भावसरगम कार्यक्रमाकरिता जोशी यांनी २१ सांगितीका लिहील्या होत्या. त्यातील ‘बाजीराव मस्तानी’ खूप गाजली होती. आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ या वृत्तपत्रात त्यांनी ‘महाराष्ट्र गाथा’ नावाचे सदर सलग तीन वर्षे लिहिले होते. जोशी यांनी ९ ते १० हजार कविता लिहिल्या आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीवरुन ‘गीत शिवायन’ यासह अनेक बालगीते त्यांनी लिहिली. लहान मुलांसाठी लिहिलेली ‘अशीच अमुची आई असती’, ‘झिम झिम झरती श्रावणधारा’, ‘नको ताई रूसू’, यासारखी हजारो गाणी जोशी यांच्या समृध्द लेखणीतून रसिकांच्या पसंतीस उतरली. कवीवर्य कुसुमाग्रज आणि ग.दि. माडगूळकर यांच्या कवितेची छाप त्यांच्यावर पडली. वयाच्या ८६ व्या वर्षीपर्यंत त्यांचे लिखाण सुरूच होते. जोशी यांच्या गीत लेखनाची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दखल घेऊन कौतुक केले होते. जोशी यांची ३५० गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.