शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कवी मधुकर जोशी यांचे निधन; वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 02:43 IST

जोशी गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना वरचेवर डायलेसिस करावे लागणार होते. रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डोंबिवली : ‘आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे’ या आणि यासारख्या अनेक काव्यपंक्तींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कवी मधुकर जोशी (९०) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मालती, डॉ. अविनाश, डॉ. शिरीष, जगदीश ही तीन मुले व डॉ. अलकानंद आणि अंजली या दोन मुली असा परिवार आहे.जोशी गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना वरचेवर डायलेसिस करावे लागणार होते. रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर डोंबिवली स्मशानभूमीत अत्यंत मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.जोशी यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३० रोजी झाला. त्यांचे वडील नीलकंठ हे संत साहित्याचे अभ्यासक होते. वडिलांकडून साहित्याचे बाळकडू जोशी यांना मिळाले. जोशी यांचे शालेय शिक्षण नाशिक येथे झाले. त्यांनी सहावीत असताना पहिली कविता ‘गांधीस वंदन’ (चंद्रकांता) ही कविता लिहीली. केंद्र सरकारच्या सेन्ट्रल एक्साईज विभागात काम करणारे जोशी १९८८ साली सेवानिवृत्त झाले. शास्त्रीय गायक डी. व्ही. पलुस्कर यांच्याशी जोशी यांचा परिचय झाला. पलुस्कर यांनी एचएमव्ही कॅसेट कंपनीचे संचालक जी. एन. जोशी यांच्याशी जोशी यांचा परिचय करुन दिला. १९५३ मध्ये आकाशवाणीवरून जोशी यांनी लिहिलेल्या भूपाळीचे प्रसारण करण्यात आले. जोशी यांच्या गीतांची पहिली रेकॉर्ड प्रकाशित झाली. या रेकॉर्डच्या एका बाजूला ‘मालवल्या नभमंदिरातल्या तारांच्या दीपिका’ आणि दुसऱ्या बाजूला ‘ राधिकेचा राऊळी ये मोहना मधुसुदना’ हे होते. आकाशवाणीवरील भावसरगम कार्यक्रमाकरिता जोशी यांनी २१ सांगितीका लिहील्या होत्या. त्यातील ‘बाजीराव मस्तानी’ खूप गाजली होती. आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ या वृत्तपत्रात त्यांनी ‘महाराष्ट्र गाथा’ नावाचे सदर सलग तीन वर्षे लिहिले होते. जोशी यांनी ९ ते १० हजार कविता लिहिल्या आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीवरुन ‘गीत शिवायन’ यासह अनेक बालगीते त्यांनी लिहिली. लहान मुलांसाठी लिहिलेली ‘अशीच अमुची आई असती’, ‘झिम झिम झरती श्रावणधारा’, ‘नको ताई रूसू’, यासारखी हजारो गाणी जोशी यांच्या समृध्द लेखणीतून रसिकांच्या पसंतीस उतरली. कवीवर्य कुसुमाग्रज आणि ग.दि. माडगूळकर यांच्या कवितेची छाप त्यांच्यावर पडली. वयाच्या ८६ व्या वर्षीपर्यंत त्यांचे लिखाण सुरूच होते. जोशी यांच्या गीत लेखनाची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दखल घेऊन कौतुक केले होते. जोशी यांची ३५० गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.