शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

कवीला कुणी ‘घर देता का घर’, धोकादायक इमारतीला पालिकेने बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 1:50 AM

‘अशीच अमुची आई असती...’, ‘झिम झिम झरती श्रावणधारा’, ‘गोल असे ही दुनिया, आणिक गोल असे रुपया,’ अशी एकाहून एक सरस गीते ज्यांच्या लेखणीतून उतरली ते महाराष्ट्रभूषण पुरस्कारप्राप्त कवी मधुकर जोशी यांच्यावर वयाच्या ८८ व्या वर्षी ‘कुणी घर देता का घर?,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : ‘अशीच अमुची आई असती...’, ‘झिम झिम झरती श्रावणधारा’, ‘गोल असे ही दुनिया, आणिक गोल असे रुपया,’ अशी एकाहून एक सरस गीते ज्यांच्या लेखणीतून उतरली ते महाराष्ट्रभूषण पुरस्कारप्राप्त कवी मधुकर जोशी यांच्यावर वयाच्या ८८ व्या वर्षी ‘कुणी घर देता का घर?,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.जोशी हे आयरे येथील ४० वर्षे जुन्या ‘हेरंब’ इमारतीत राहतात. मात्र, ती धोकादायक झाल्याची नोटीस केडीएमसीने बजावली आहे. त्यामुळे बिल्डरने रहिवाशांना जागा रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे आता जायचे कुठे?, असा प्रश्न त्यांना पडला आहे.हेरंब या चार मजली इमारतीत ४३ भाडेकरू राहत होते. पण जागा रिकामी करण्याची नोटीस दिल्याने ४० जणांनी जागा सोडल्या आहेत. आता अवघे तीन कुटुंबे राहत आहेत. डोंबिवलीत मागील वर्षी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी जोशी यांची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. पण संमेलन संपले व साहित्याच्या सारस्वतांना त्यांचा विसर पडला आहे. संमेलनानंतर ते फिरकले देखील नाहीत, अशी खंत जोशी यांनी बोलून दाखवली.जोशी म्हणाले, जागेसाठी खूप पैसे लागतात. ते कुठून आणू? डिपॉझिट खूप सांगतात. माझ्याकडील तुटपुंज्या पैशांमुळे मला भाडेही भरणे शक्य नाही. ४० वर्षे मी नोकरी केली आहे. पण कधीही सरकारकडे जागा मागितली नाही. कारण सरकारवर माझा विश्वास नाही. माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ कवी शांता शेळके, कवी कुसुमाग्रज यांची घरे ही मोडकी होती. सरकारने महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला मात्र त्याबरोबर काही ठोस अशी रक्कम दिली नाही. कविता लेखनाची आपण तपश्चर्या केली आहे. पण साहित्यात त्याला फार किंमत नाही. हिंदी भाषिक कवीला जितका मान आहे, तेवढा मान सन्मान मराठी कवीला मिळत नाही. एकही मराठी कवी भरपूर मिळकत मिळवू शकलेला नाही. मंगेश पाडगावकर यांच्या सारख्या अनेक कवींनी आपला उदरनिर्वाह हा खाजगी नोकरी करून केला आहे. मराठी कवींची दुरवस्था झाली आहे. अनेक सत्कार झाले, पण ते त्या काळापुरते मर्यादित असतात. नंतर त्याला कुणी विचारत नाही. साहित्यात कवितेलाच मानाचे स्थान नाही. आता तर साहित्यालाच फार किंमत उरलेली नाही. नवोदित कवी ज्या कविता लिहितात त्या गद्य स्वरूपात असतात. पद्य कविता काळाच्या पडद्याआड लुप्त होत आहेत. साहित्यात रममाण असलेले आणि साहित्यावर नितांत प्रेम करणाऱ्या जोशी यांची होणारी उपेक्षा सरकारापर्यंत पोहोचणार का?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.पाच हजार भावस्पर्शी गीतेमधुकर जोशी यांनी पाच हजारांपेक्षा जास्त भावस्पर्शी गीते लिहिली आहेत. त्यात ‘अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती,’ हे अजरामर गीतही आहे. सध्या वयोमानानुसार फारसे लिखाण होत नाही. परंतु, नुकत्याच त्यांनी काही मंगलाष्टका लिहिल्या आहेत.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या