शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

धोकादायक इमारत कोसळल्यास वित्त व जीवितहानीला प्लॉटधारक जबाबदार, महापालिकेने झटकले हात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 2:56 PM

उल्हासनगरात एकून १४७ धोकादायक इमारती, त्यापैकी २३ अतिधोकादायक इमारती

ठळक मुद्देशहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला असून महापालिकेने एकून १४७ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित केल्या. त्यापैकी २३ इमारती अतिधोकादायक तर ८ दुरुस्ती योग्य असल्याचे सांगितले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : मोहिनी पॅलेस इमारतीच्या दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिकेने १४७ धोकादायक इमारती घोषित केल्या. त्यापैकी २३ अतिधोकादायक इमारती आहेत. महापालिकेने स्वतःची जबाबदारी झटकत इमारती मध्ये वास्तव करीत असलेल्या नागरिकांनी इमारत खाली करण्याचे आवाहन केले. जीवित व वित्तहानीला महापालिकेने स्वतःला नव्हेतर प्लॉटधारकांना जबाबदार धरले. 

उल्हासनगरात गेल्या ११ वर्षात शिशमहल, भगवंती, नीलकंठ, शिवसागर, राणी माँ, महालक्ष्मी, शांती पॅलेस, सन्मुख सदन, गुडमन कॉटेज असा ३६ इमारतीचे स्लॅब कोसळून ३० पेक्षा जास्त नागरिकांचे बळी गेले. यातील बहुतांश इमारती सन १९९२ ते ९६ दरम्यान बांधण्यात आल्या असून त्यावेळी रेती उपसावर बंदी असल्याने इमारत बांधकामासाठी दगडाचा बारीक चुरा, उलावा रेतीचा वापर करण्यात आला. यातील बहुतांश इमारती अवैध असून वाढीव छटईक्षेत्राचा वापर करण्यात आला. तत्कालीन महापालिका अधिकारी, राजकीय नेते, नगरसेवक या बांधकामांना जबाबदार असल्याची टीका होत आहे. सन २००६ साली शहरातील अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी खास शहरासाठी विशेष अध्यादेश काढला. मात्र त्याची यशस्वी अंमलबजावणी झाली नाही.

शहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला असून महापालिकेने एकून १४७ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित केल्या. त्यापैकी २३ इमारती अतिधोकादायक तर ८ दुरुस्ती योग्य असल्याचे सांगितले. धोकादायक इमारती मध्ये शेकडो नागरीक जीव मुठीत धरून राहत असून महापालिकेने पावसाळ्यापूर्वी प्लॉटधारकांनी इमारती मधील वास्तव्य हलविण्याचे आवाहन केले. इमारत कोसळून वित्त व जीवितहानी झाल्यास त्याला स्वतः प्लॉटधारक जबाबदार असल्याचे सांगितली. एकूणच महापालिकेने स्वतःची जबाबदारी झटकल्याची टीका होत आहे. तर दुसरीकडे सर्रासपणे बहुमजली अवैध बांधकामे होऊन कारवाई होत नसल्याने, महापालिका कारभारावर सर्वस्तरातून टीका होत आहे. 

दुर्घटनाग्रस्त इमारतीतील नागरिक भाडेतत्वावर? 

शहरात गेल्या ११ वर्षात ३३ पेक्षा जास्त इमारती पडल्या असून ३० पेक्षा जास्त नागरिकांनाचा मृत्यू झाला. इमारती मधील बेघर झालेले शेकडो नागरिक आजही jयाभाडेतत्वावर राहत आहे. धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीच्या मागणीने जोर धरला आहे. शासनाने इमारतीला वाढीव चटईक्षेत्र देऊन पुनर्बांधणी साठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर