शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

उपायुक्तांच्या स्वच्छता सर्वेक्षणात आढळल्या प्लास्टिक पिशव्या, दुकानदारांकडून एक लाख ३५ हजार दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 02:19 IST

Mira Bhayander News : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत ३० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची सुरुवात महापालिकेने केली असून आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दुकानदार व फेरीवाले यांच्याकडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या आहेत .

मीरा राेड - स्वच्छ भारत अभियानअंतर्गत ३० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची सुरुवात महापालिकेने केली असून आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दुकानदार व फेरीवाले यांच्याकडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या आहेत . त्यांच्यावर कारवाई करत एक लाख ३५ हजार दंड वसूल करत पिशव्या जप्त केल्या गेल्या.आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी पालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना विविध परिसराचे पालकत्व दिले आहे. आरोग्य विभागाने शहरात स्वच्छता ठेवणे, नागरिकांनी ओला-सुका करणे, प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करणे, अतिक्रमण विभागाने रस्ते व पदपथांवरील अतिक्रमण, बेवारस वाहने हटवणे, बांधकाम विभागाने रस्त्यावरील डेब्रिज हटवून स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवायची आहे. पाणीपुरवठा विभागाने खड्डे बुजवणे, मलनिःसारण केंद्र सफाई करणे आदी कामे करायची आहेत. वृक्ष प्राधिकरण, शिक्षण, नगररचना विभागांनाही त्यांच्या अखत्यारीतील कामांच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी त्यांच्या स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी आदींसह मोहिमेस सुरुवात केली असता त्यांना दुकानदार आणि फेरीवाल्यांकडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळला. शहरात प्लास्टिक पिशव्या आणि बंदी असलेल्या एकदा वापरातील प्लास्टिक वस्तूंची सर्रास विक्री आणि वापर होत असल्याच्या बातम्या ‘लोकमत’ने सातत्याने दिल्या होत्या. दुसरीकडे मात्र पालिका कारवाई करत असल्याचा दावा करत होती. परंतु पालिकेचा दावा हा कांगावा असल्याचे पानपट्टे यांच्या कारवाईने पुन्हा उघड झाले आहे. दरम्यान, शहरात या आधीही बंदी असलेल्या पिशव्यांचा वापर सर्रास हाेऊनही पालिकेकडून ठाेस कारवाई केली जात नव्हती.प्लास्टिक पिशव्या आणि अन्य बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंवर पालिका नियमित कारवाई करणार आहे. अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गेल्या वर्षी शहराचा देशात १९वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक आला होता. कचरामुक्त शहर म्हणून तीन तारांकित तसेच हागणदारीमुक्त कार्यामुळे ओडीएफ म्हणून गौरवण्यात आले होते. त्यामुळे या वर्षी प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे.    - डॉ. संभाजी पानपट्टे,  उपायुक्त 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर