शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्तांच्या स्वच्छता सर्वेक्षणात आढळल्या प्लास्टिक पिशव्या, दुकानदारांकडून एक लाख ३५ हजार दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 02:19 IST

Mira Bhayander News : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत ३० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची सुरुवात महापालिकेने केली असून आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दुकानदार व फेरीवाले यांच्याकडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या आहेत .

मीरा राेड - स्वच्छ भारत अभियानअंतर्गत ३० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची सुरुवात महापालिकेने केली असून आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दुकानदार व फेरीवाले यांच्याकडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या आहेत . त्यांच्यावर कारवाई करत एक लाख ३५ हजार दंड वसूल करत पिशव्या जप्त केल्या गेल्या.आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी पालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना विविध परिसराचे पालकत्व दिले आहे. आरोग्य विभागाने शहरात स्वच्छता ठेवणे, नागरिकांनी ओला-सुका करणे, प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करणे, अतिक्रमण विभागाने रस्ते व पदपथांवरील अतिक्रमण, बेवारस वाहने हटवणे, बांधकाम विभागाने रस्त्यावरील डेब्रिज हटवून स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवायची आहे. पाणीपुरवठा विभागाने खड्डे बुजवणे, मलनिःसारण केंद्र सफाई करणे आदी कामे करायची आहेत. वृक्ष प्राधिकरण, शिक्षण, नगररचना विभागांनाही त्यांच्या अखत्यारीतील कामांच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी त्यांच्या स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी आदींसह मोहिमेस सुरुवात केली असता त्यांना दुकानदार आणि फेरीवाल्यांकडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळला. शहरात प्लास्टिक पिशव्या आणि बंदी असलेल्या एकदा वापरातील प्लास्टिक वस्तूंची सर्रास विक्री आणि वापर होत असल्याच्या बातम्या ‘लोकमत’ने सातत्याने दिल्या होत्या. दुसरीकडे मात्र पालिका कारवाई करत असल्याचा दावा करत होती. परंतु पालिकेचा दावा हा कांगावा असल्याचे पानपट्टे यांच्या कारवाईने पुन्हा उघड झाले आहे. दरम्यान, शहरात या आधीही बंदी असलेल्या पिशव्यांचा वापर सर्रास हाेऊनही पालिकेकडून ठाेस कारवाई केली जात नव्हती.प्लास्टिक पिशव्या आणि अन्य बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंवर पालिका नियमित कारवाई करणार आहे. अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गेल्या वर्षी शहराचा देशात १९वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक आला होता. कचरामुक्त शहर म्हणून तीन तारांकित तसेच हागणदारीमुक्त कार्यामुळे ओडीएफ म्हणून गौरवण्यात आले होते. त्यामुळे या वर्षी प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे.    - डॉ. संभाजी पानपट्टे,  उपायुक्त 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर