शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

स्थायीने मुख्य लेखापरीक्षकांचे छाटले पंख; ठोक मानधनावरील लेखाधिका-यांच्या मुदतवाढीस स्थायीचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 19:00 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील आर्थिक कारभार वेगाने हातावेगळा होण्यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी मुख्य लेखापरीक्षकांच्या सहाय्याकरिता ठोक मानधनावर दोन लेखाधिका-यांची नियुक्ती केली होती.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील आर्थिक कारभार वेगाने हातावेगळा होण्यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी मुख्य लेखापरीक्षकांच्या सहाय्याकरिता ठोक मानधनावर दोन लेखाधिका-यांची नियुक्ती केली होती. त्यांची मुदत ४ जानेवारीला संपुष्टात आली असून, मुख्य लेखापरीक्षकांच्या निर्देशामुळे प्रत्येक फायलींवर आक्षेपार्ह शेरा मारला जात असल्याने त्या लेखाधिकाऱ्यांना स्थायीने मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने पालिकेत मुख्य लेखापरीक्षकांचेच पंख छाटल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.पालिकेत टक्केवारीचा गोरखधंदा नवीन नाही. टक्केवारीतून विकासकामांचा सपाटा लावला जात असला तरी त्या कामांचे प्रस्ताव व देयकांच्या फायली लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. हा कारभार सुसह्य करण्यासाठी प्रशासनाने मुख्य लेखापरीक्षकांना दोन वरिष्ठ लिपिक दिमतीला दिले. त्यानंतरही फायलींच्या कारभाराचा निपटारा होत नसल्याने प्रशासनाने ४ जानेवारी २०१७ रोजी ठोक मानधनावर मधुकर सुर्वे यांची लेखाधिकारी तर प्रभाकर वर्तक यांची सहाय्यक लेखाधिकारी पदावर नियुक्ती केली. त्यामुळे आर्थिक प्रस्तावांसह देयकांच्या फायलींचा निपटारा त्वरित होण्याची आस पालिकेतील विभाग प्रमुखांसह कंत्राटदारांना लागून राहिली. परंतु त्या प्रस्तावांसह देयकांच्या फायलींवर मुख्य लेखापरीक्षकांच्या निर्देशानुसार कडक शब्दांत शेरा मारला जाऊ लागल्याने प्रत्येक प्रस्तावासह फायलींवर विभागप्रमुखांसह अधिकाऱ्यांना मुख्य लेखापरीक्षकांचा उंबरठा झिजविण्यास भाग पाडले जाऊ लागले. त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांकडे धाव घेतली.टक्केवारीचा कारभार सुरू असतानाही मुख्यलेखापरीक्षकांचा हा आडमुठेपणा कारभार का सुरू आहे, अशी चर्चा कंत्राटदारामध्ये सुरू झाली. अखेर त्याची झळ राजकारण्यांना बसू लागली. त्यातच त्या ठोक मानधनावरील लेखाधिकाऱ्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायीत सादर करण्यात आला. अखेर स्थायीने प्रस्ताव व फायलींवरील सततच्या शेरेबाजीचा वचपा काढण्यासाठी त्या दोन लेखापरीक्षकांच्या मुदतवाढीलाच नकार दिला. यामुळे स्थायीने मुख्यलेखापरीक्षकांचे पंखच छाटल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली असली तरी हे लेखाधिकारी मुदत संपुष्टात येऊनही मुख्यलेखापरिक्षकांच्या वरदहस्तामुळे अद्याप कार्यरत असल्याने राजकीय वर्तूळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक