शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खाडी स्वच्छतेसाठी लोकसहभाग अत्यावश्यकच, ठाण्यात पार पडली खाडी सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 16:28 IST

जागतिक पाणथळभूमी दिनानिमित्ताने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व पर्यावरण दक्षता मंडळाच्यावतीने खाडी सफारीचे आयोजन केले आहे. शनिवारी सकाळी या वषार्तील पहिली खाडी सफारी पार पडली.

ठळक मुद्देठाण्यात पार पडली खाडी सफारीखाडी स्वच्छतेसाठी लोकसहभाग अत्यावश्यकच पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रसाद कर्णिक यांनी केले मार्गदर्शन

ठाणे : खाडीच्या स्वच्छतेविषयी जनजागृती होत चालल्याने खाडीतील प्रदुषण काहीशा प्रमाणात कमी होत चालले आहे, घनकचरा कमी होत चालला असून पाण्यातही सकारात्मक बदल होत आहे. त्यामुळे मासे येऊ लागले आहे. परंतू खाडीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी १०० टक्के लोकसहभाग आवश्यक आहे असे निरीक्षण खाडी सफारीदरम्यान नोंदविण्यात आले.     ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व पर्यावरण दक्षता मंडळाच्यावतीने शनिवारी सकाळी खाडी सफारी पार पडली. यावेळी पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रसाद कर्णिक यांनी मार्गदर्शन केले. या सफारीत पर्यावरणप्रेमी आणि पत्रकार सहभागी झाले होते. गेल्या १५ वर्षांपासून काडीत मासे मिळत नव्हते परंतू प्रदुषणाचे प्रमाण घटत चालल्याने मासे मिळू लागल्याचे मच्छीमार प्रविण कोळी यांनी यावेळी सांगितले. कस्टम जेट्टी ते भांडुप पर्यंत खाडी सफारी करण्यात आली. यावेळी मासे, तसेच, विविध प्रकारांचे पक्षी आढळून आले.खाडीतले प्रदुषण कमी होत चालले तरी प्लास्टीकचा कचरा आढळून आला. यात प्लास्टीकच्या पिशव्या, प्लास्टीक बाटल्या तसेच, निर्माल्यही आढळून आले. खाडीची ही सद्य परिस्थीती पाहता १०० टक्के खाडी प्रदुषणमुक्त होणे गरजेचे आहे असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले. ठाणे खाडीच्या संवर्धनासाठी व संरक्षणात्मक जनजागृतीसाठी पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेल्या १८ वर्षापासून ‘स्वच्छ खाडी अभियान’ हा उपक्र म चालवत आहे. खाडीच्या पाण्यात उतरून खाडीची स्वच्छता करणे नाही, तर नागरिकांना खाडीमध्ये कचरा टाकण्यापासून रोखणे असा या अभियानाचा उद्देश आहे. स्वच्छ खाडी अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्र म करून लोकांना सुजाण बनवण्याचे काम संस्थेतर्पे केले जात आहे. नागरिकांची जबाबदारी त्यांना कळली की, खाडी व पर्यावरण आपसूकच निर्मळ होईल असा संस्थेचा मानस आहे. ठाणे खाडीबाद्द्ल आणखी जनजागृती करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ७, १३, १४, २५, २६, २७ आणि २८ जानेवारी या दिवसांत खाडी सफारीचे आयोजन केले आहे. या सफारीमध्ये ठाणे खाडी, त्यातील अनेक पक्षी, मासे, कीटक, फुलपाखरे, साप, प्राणी, खारफुटीची झाडे व इतर जैवविविधता प्रत्यक्ष पाहण्याची संधी पर्यावरणप्रेमींना मिळत आहे. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी नियोजन भवन, कलेक्टर आॅफिस, ठाणे येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी जागतिक पाणथळ भूमी दिनाबद्दल जनजागृती अभियान कार्यक्र म आयोजित करण्यात आला असून ज्या शाळांना आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्र म आयोजित करावयाचा आहे त्यांनी लवकरात लवकर संस्थेशी संपर्कसाधण्याचे आवाहन केले आहे. ३ फेब्रुवारी रोजी सोमैय्या कॉलेज, विद्याविहार येथे जागतिक पाणथळ भूमी दिनानिमित्त एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेमध्ये ज्या महाविद्यालयांना सहभागी व्हायचे आहे त्यांनीही संस्थेशी संपर्क साधावा. लवकरात लवकर दोन्ही कार्यक्र मांसाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी पर्यावरण दक्षता मंडळ, ३ सुशीला, काका सोहोनी पथ, घंटाळी, ठाणे (प.) संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेenvironmentवातावरणMumbaiमुंबई