शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

जनतेनेच आता जातीयवादी शक्तींना रोखले पाहिजे; नसीम खान यांचा BJP वर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 9:23 PM

राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा ठाण्यातून प्रारंभ

ठाणे: केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून देशातील अर्थव्यवस्था उध्वस्त केली आहे. देशात जातीयवादी शक्ती सक्रीय झाली आहे. जनतेनेच आता अशा जातीयवादी शक्तीला रोखले पाहिजे, असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री नसीम खान यांनी रविवारी ठाण्यात केले.

संपूर्ण महाराष्ट्रात १४ ते २९ नोव्हेंबर पर्यंत राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा प्रारंभ भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन नसीम खान यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.विक्र ांत चव्हाण,जेष्ठ काँग्रेस नेते सुरेश ठाणेकर,प्रदेश काँग्रेस सचिव अनिस कुरेशी,महेश कांबळे,मोहन तिवारी,सुखदेव घोलप आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खान म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या काही धोरणात्मक निर्णयामुळे सर्व सामान्य जनता हवालदिल असून देशातील व्यापार उद्योगात याचा खूप मोठा फटका बसला आहे. साहजिकच त्याचा परिणाम सर्व क्षेत्रातील संबधितांना बसत आहे. काँग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने जनआंदोलन करीत आली आहे. तरीही केंद्रातील भाजपा सरकारला जाग येत नसून आता जनजागरण अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचे सागितले.

संपूर्ण महाराष्ट्रात हे जनजागरण अभियान राबविण्यात येणार असून १४ नोव्हेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी हे अभियान सुरू केल्याचे सांगून संविधान दिनी म्हणजेच २९ नोव्हेंबरपर्यंत हे अभियान चालू राहणार आहे. संपूर्ण शहरातील विविध भागात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात प्रामुख्याने वाढती महागाई, वाढती बेरोजगारी बाबत जनतेमध्ये जाऊन जनजागरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Naseem Khanनसीम खानBJPभाजपा