शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर उतरुन लोकांना दगड मारले नाही, म्हणजे बरं, विखे पाटलांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 19:19 IST

काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. कच्च्या तेलाच्या किमंती कमी झाल्यानंतरही इंधन दरवाढ होत आहे.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील आणखी एका नेत्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

ठाणे : भाजपचे तत्वज्ञान किंवा कार्यपध्दती ही देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळेच राज्यात किमान समान कार्यक्रमाअंतर्गत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले आहे. भाजपला ज्या ज्या पातळीवरुन दूर ठेवायचे असेल त्यानुसार ते, ते निर्णय घेतले जातील, असा विश्वास महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी सबुरीचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.           काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. कच्च्या तेलाच्या किमंती कमी झाल्यानंतरही इंधन दरवाढ होत आहे. दुर्देवाने केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही, काँग्रेसच्या काळात एक रुपयाची जरी इंधन वाढ झाली तर भाजपकडून आंदोलन केले जाते होते. मात्र, आता ते लपुन बसले आहेत का? त्यांचा शोध घेण्याची वेळ आल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच, केंद्राने दर कमी करावेत असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारची जबबादारी यात कमी आहे, राज्य सरकारची अडचण झाली असून 50 हजार कोटींचा जीएसटी अद्यापही केंद्राने दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ईडी, सीआयडी या यंत्रणा पूर्वी माहित नव्हत्या, आता लहान मुलांनासुद्धा ईडी समजायला लागली आहे, या यंत्रणा राष्ट्रीय पातळीवरील असून विघातक प्रकृवत्तींना आळा बसविण्यासाठी असाव्यात. मात्र, त्या आता राजकारणासाठी वापरल्या जात असल्याने त्याचे दुष्परीणाम हे निश्चितच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हर्षवर्धन पाटील यांचा समाचार घेतांना भाजपमध्ये शांत झोप लागत असल्याचे ते सांगत आहे. परंतु तिकडे गेलेल्या लोकांवर किंवा भाजपमधील नेत्यांवर कारवाई होतांना दिसत नाही, असंच होत आहे. परंतु सरकार कसे कमकुवत होईल, कसे पाडता येईल यासाठी केंद्र सरकाराच्या संस्थांनी कितीही प्रयत्न केला तरी आमचे सरकार भक्कपणे राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील आणखी एका नेत्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. परंतु अशा नेत्यांची आता किव येत आहे, मोठ्या आशेने त्यांची किव आली आहे, शपथविधीचे स्वप्न पाहत होते, नवीन कपडेही शिवत होते, आज सरकार पडेल, उद्या सरकार पडले असे वाटत होते, परंतु तसे होत नसल्याने त्यांच्यात नैराश्य आलेले आहे. त्यामुळेच् असे बेताल वक्तव्य केले जात असल्याची टिकाही त्यांनी केली. उद्या रस्त्यावर उतरुन लोकांना दगडं मारले नाही, म्हणजे बर असा टोलाही त्यांनी लगावला आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झाले असले तरी कोरोना संपलेला नाही. परंतु तरीदेखील हिवाळी अधिवेशन नागपुरला होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसBJPभाजपाthaneठाणेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील