शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 19:48 IST

मुरबे बंदरातून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या जय श्री साई बोटीला एका मोठ्या मालवाहू बोटीने धडक दिल्याची घटना घडली. 

मुरबे बंदरातून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या जय श्री साई या मासेमारी करणाऱ्या बोटीला वेगाने आलेल्या एका मालवाहू बोटीने जोरात धडक दिल्याची घटना घडली. मोठ्या बोटीने दिलेली धडक इतकी जोरात होती की, मासेमारी करणाऱ्या बोटीतील चार मच्छिमार समुद्रात फेकले गेले. या घटनेत मच्छीमार बोटीचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मासेमारी हंगाम सुरू झाला असून, मुरबे येथील जय श्री साई ही बोट समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. 14 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता या बोटीतील 15 मच्छिमार खलाशांनी सर्व जाळी समुद्रात टाकली. 

समुद्रात २०:००:२६८/७१:१८:१५६ E नॉटिकल क्षेत्रात जाळी टाकल्यानंतर समुद्रात अँकर टाकून आणि बोटीवरील सिग्नल लाईट चालू करून काही मच्छीमार झोपी गेले. तर बोटीचा तांडेल आपल्या सहकाऱ्यांसह समुद्रात टाकलेल्या जाळ्यांवर लक्ष ठेवून होता.

मालवाहू जहाजाने जोरात दिली धडक

९.३० वाजण्याच्या सुमारास बोटीच्या समोरून एक मोठे मालवाहू जहाज येत असल्याचे तांडेल यांना दिसले. त्यांनी बोटीवरील सर्व लाइट्स सुरू केले आणि जहाजाने दिशा बदलावी म्हणून ओरडू लागले. पण, वेगाने आलेल्या या मालवाहू जहाजाने जय श्री साई बोटीला समोरून जोरात धडक दिली.

या धडकेमुळे बोटीमध्ये असलेले चार मच्छीमार समुद्रात फेकले गेले. सर्वत्र अंधार असल्याने हे मच्छिमार समुद्रातील प्रवाहाने वाहून जाऊ लागले. त्याच वेळी बोटीतील तांडेल यांनी आपल्या वायरलेस सेटवरून मुरबे येथील साईप्रिया बोटीचे मालक जितेंद्र राजेंद्र तरे यांच्याशी संपर्क केला आणि मदत मागितली. 

जितेंद्र तरे आणि शांताराम ठाकरे यांनी तात्काळ आपल्या बोटी घेऊन अपघातग्रस्त जय श्री साई बोटीला गाठले. यावेळी बोटीचा पुढचा भाग अपघातग्रस्त झाल्याने समुद्राचे पाणी वेगाने बोटीत शिरत होते.

बोटीत शिरणारे पाणी रोखण्याचे प्रयत्न

मदतीसाठी आलेल्या दोन्ही बोटी आणि जयश्री साई बोटीतील मच्छिमारांनी हाताला मिळेल त्या वस्तूच्या सहाय्याने समुद्राचे येणारे पाणी रोखून धरण्याचे प्रयत्न सुरू केले. तर दुसरीकडे समुद्रात पडलेल्या चार खुलाशांनाही वाचवले. 

समुद्रात वादळी वारे वाहत असल्याने मोठमोठ्या लाटा उसळत होत्या. त्यामुळे मदतीसाठी आलेल्या दोन्ही बोटींना दोरखंडाच्या साह्याने जय श्री साई बोटीला बांधून शुक्रवारी ३.३० वाजता सुखरूप पणे मुरबे बंदरात आणून सोडले. 

या अपघातात जय श्री साई बोटीचे मोठे नुकसान झाले असून, ही बोट पुन्हा मासेमारीला जाण्याच्या क्षमतेची राहिलेली नसल्याचे मुरब्याचे उपसरपंच राकेश तरे यांनी लोकमतला सांगितले. 

टॅग्स :palgharपालघरAccidentअपघातfishermanमच्छीमार