शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 19:48 IST

मुरबे बंदरातून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या जय श्री साई बोटीला एका मोठ्या मालवाहू बोटीने धडक दिल्याची घटना घडली. 

मुरबे बंदरातून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या जय श्री साई या मासेमारी करणाऱ्या बोटीला वेगाने आलेल्या एका मालवाहू बोटीने जोरात धडक दिल्याची घटना घडली. मोठ्या बोटीने दिलेली धडक इतकी जोरात होती की, मासेमारी करणाऱ्या बोटीतील चार मच्छिमार समुद्रात फेकले गेले. या घटनेत मच्छीमार बोटीचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मासेमारी हंगाम सुरू झाला असून, मुरबे येथील जय श्री साई ही बोट समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. 14 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता या बोटीतील 15 मच्छिमार खलाशांनी सर्व जाळी समुद्रात टाकली. 

समुद्रात २०:००:२६८/७१:१८:१५६ E नॉटिकल क्षेत्रात जाळी टाकल्यानंतर समुद्रात अँकर टाकून आणि बोटीवरील सिग्नल लाईट चालू करून काही मच्छीमार झोपी गेले. तर बोटीचा तांडेल आपल्या सहकाऱ्यांसह समुद्रात टाकलेल्या जाळ्यांवर लक्ष ठेवून होता.

मालवाहू जहाजाने जोरात दिली धडक

९.३० वाजण्याच्या सुमारास बोटीच्या समोरून एक मोठे मालवाहू जहाज येत असल्याचे तांडेल यांना दिसले. त्यांनी बोटीवरील सर्व लाइट्स सुरू केले आणि जहाजाने दिशा बदलावी म्हणून ओरडू लागले. पण, वेगाने आलेल्या या मालवाहू जहाजाने जय श्री साई बोटीला समोरून जोरात धडक दिली.

या धडकेमुळे बोटीमध्ये असलेले चार मच्छीमार समुद्रात फेकले गेले. सर्वत्र अंधार असल्याने हे मच्छिमार समुद्रातील प्रवाहाने वाहून जाऊ लागले. त्याच वेळी बोटीतील तांडेल यांनी आपल्या वायरलेस सेटवरून मुरबे येथील साईप्रिया बोटीचे मालक जितेंद्र राजेंद्र तरे यांच्याशी संपर्क केला आणि मदत मागितली. 

जितेंद्र तरे आणि शांताराम ठाकरे यांनी तात्काळ आपल्या बोटी घेऊन अपघातग्रस्त जय श्री साई बोटीला गाठले. यावेळी बोटीचा पुढचा भाग अपघातग्रस्त झाल्याने समुद्राचे पाणी वेगाने बोटीत शिरत होते.

बोटीत शिरणारे पाणी रोखण्याचे प्रयत्न

मदतीसाठी आलेल्या दोन्ही बोटी आणि जयश्री साई बोटीतील मच्छिमारांनी हाताला मिळेल त्या वस्तूच्या सहाय्याने समुद्राचे येणारे पाणी रोखून धरण्याचे प्रयत्न सुरू केले. तर दुसरीकडे समुद्रात पडलेल्या चार खुलाशांनाही वाचवले. 

समुद्रात वादळी वारे वाहत असल्याने मोठमोठ्या लाटा उसळत होत्या. त्यामुळे मदतीसाठी आलेल्या दोन्ही बोटींना दोरखंडाच्या साह्याने जय श्री साई बोटीला बांधून शुक्रवारी ३.३० वाजता सुखरूप पणे मुरबे बंदरात आणून सोडले. 

या अपघातात जय श्री साई बोटीचे मोठे नुकसान झाले असून, ही बोट पुन्हा मासेमारीला जाण्याच्या क्षमतेची राहिलेली नसल्याचे मुरब्याचे उपसरपंच राकेश तरे यांनी लोकमतला सांगितले. 

टॅग्स :palgharपालघरAccidentअपघातfishermanमच्छीमार