शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

खड्डयांनी घेतला पाचवा बळी, सर्वसामान्यांचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 11:49 IST

पावसात हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत

कल्याण - मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे नवीन नाहीत. मात्र पावसात हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. आज कल्याणमधील आणखी एकाचा खड्याने बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांतील हा पाचवा बळी आहे. 

कल्याण पश्चिमेकडील गांधारी पुल परिसरातील खड्डेमय रस्त्यांनी कल्पेश जाधव या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या 13 दिवसांतील खड्यांमुळे हा पाचवा मृत्यू झाला आहे. पहाटे सव्वाचारच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून घटनेनंतर पसार झालेल्या कंटेनरचालकाचा शोध सुरु असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी दिली. 

(आणखी वाचा : वेदनादायी वास्तव... खड्ड्यामुळे जीव गमावलेल्या मुलासाठी वडील घेऊन आले दही-भात!)

कल्पेश हा पहाटे आपल्या दुचाकीवरुन जात असताना खड्यांमुळे त्याची गाडी स्लीप झाली आणि तो खाली कोसळला. यावेळी मागून भरधाव वेगात आलेला कंटेनर  त्याच्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. भिवंडी तालुक्यातील नांदकर येथील रहिवासी असलेला कल्पेश याचा मटेरियल सप्लायरचा व्यवसाय होता. 

कल्याण नजीकच्या द्वारली परिसरात खड्डयामुळे अण्णा नामक पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवारी घडली होती. तर याआधी शिवाजी चौकात रस्त्याच्या असमतोलपणामुळे आरोह आतराळे आणि मनीषा भोईर या दोघांचा बळी गेल्याची घटना अनुक्रमे २ जून आणि ७ जुलैला घडली आहे. 

कल्याण-डोंबिवलीत खड्डे भरण्यासाठी १३.९० कोटींचे कंत्राट

महापालिकेत खड्डे बुजवण्यासाठी खडी-मातीचा भराव टाकण्यासह पावसाने उघडीप घेतल्यावर आवश्यकतेनूसार डांबरीकरण करण्यासाठी १३.९० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यापैकी डोंबिवलीसाठी ६ कोटी ९० लाखांची तरतूद असल्याची माहिती डोंबिवली विभागीय अभियंता प्रशांत भुजबळ यांनी दिली. त्यामध्ये शहरातील ह, फ, ग, आय आणि जे असे पाच प्रभाग मिळून काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Potholeखड्डेAccidentअपघात