शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

खड्डयांनी घेतला पाचवा बळी, सर्वसामान्यांचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 11:49 IST

पावसात हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत

कल्याण - मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे नवीन नाहीत. मात्र पावसात हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. आज कल्याणमधील आणखी एकाचा खड्याने बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांतील हा पाचवा बळी आहे. 

कल्याण पश्चिमेकडील गांधारी पुल परिसरातील खड्डेमय रस्त्यांनी कल्पेश जाधव या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या 13 दिवसांतील खड्यांमुळे हा पाचवा मृत्यू झाला आहे. पहाटे सव्वाचारच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून घटनेनंतर पसार झालेल्या कंटेनरचालकाचा शोध सुरु असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी दिली. 

(आणखी वाचा : वेदनादायी वास्तव... खड्ड्यामुळे जीव गमावलेल्या मुलासाठी वडील घेऊन आले दही-भात!)

कल्पेश हा पहाटे आपल्या दुचाकीवरुन जात असताना खड्यांमुळे त्याची गाडी स्लीप झाली आणि तो खाली कोसळला. यावेळी मागून भरधाव वेगात आलेला कंटेनर  त्याच्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. भिवंडी तालुक्यातील नांदकर येथील रहिवासी असलेला कल्पेश याचा मटेरियल सप्लायरचा व्यवसाय होता. 

कल्याण नजीकच्या द्वारली परिसरात खड्डयामुळे अण्णा नामक पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवारी घडली होती. तर याआधी शिवाजी चौकात रस्त्याच्या असमतोलपणामुळे आरोह आतराळे आणि मनीषा भोईर या दोघांचा बळी गेल्याची घटना अनुक्रमे २ जून आणि ७ जुलैला घडली आहे. 

कल्याण-डोंबिवलीत खड्डे भरण्यासाठी १३.९० कोटींचे कंत्राट

महापालिकेत खड्डे बुजवण्यासाठी खडी-मातीचा भराव टाकण्यासह पावसाने उघडीप घेतल्यावर आवश्यकतेनूसार डांबरीकरण करण्यासाठी १३.९० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यापैकी डोंबिवलीसाठी ६ कोटी ९० लाखांची तरतूद असल्याची माहिती डोंबिवली विभागीय अभियंता प्रशांत भुजबळ यांनी दिली. त्यामध्ये शहरातील ह, फ, ग, आय आणि जे असे पाच प्रभाग मिळून काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Potholeखड्डेAccidentअपघात