शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

Oxygen Shortage: ऑक्सिजन न मिळाल्याने ठाण्यात ४ रुग्ण दगावले; नातेवाईकांचा आरोप हॉस्पिटलने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 13:08 IST

Oxygen Shortage, corona virus in Thane: ठाण्यातील वर्तक नगर येथील खाजगी कोविड हॉस्पिटल वेदांत रुग्णालयात ही घटना घडली आहे. रुग्णालयाखाली नातेवाईक आणि मनसे, भाजप पक्षाचे पदाधिकारी जमले असून रुग्णालया बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

ठाण्यातील वर्तक नगर नाक्यावरील वेदांत या खाजगी कोरोना रुग्णालयातील 4 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्सिजन संपल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला असल्याने हॉस्पिटलच्या  बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठाणे महापालिकेचे अधिकारी देखील रुग्णालयात पोहचले आहेत.रुग्णालय प्रशासनाने मात्र तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची कबुली दिली असून हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले नसल्याचे रुग्णालयाच्या वगीने स्पष्ट करण्यात आले आहे. (Maharashtra | Four #COVID19 patients died at Vedanta hospital in Thane early morning today. An investigation has been initiated to ascertain the cause of their death: Thane Municipal Corporation)

      वर्तकनगर नाक्यावर वेदांत या खाजगी हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन अभावी 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचा मॅसेज  व्हायरल झाला. त्यानंतर हॉस्पिटल मधील रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले. प्रकरण वाढू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला . घटनास्थळी आलेले आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रकारणची चौकशी करण्याची मागणी केली असून सर्व गैरव्यवहाराची चौकशी सिव्हिल सर्जन मार्फत करण्याची मागणी केली आहे. आम्ही दोन दिवस डॉक्टरांच्या संपर्कात होतो , पैसे भरून देखील योग्य ट्रीटमेंट मिळत नव्हती .

 रात्री आमचे डॉक्टरांशी बोलल्यानंतर डॉक्टर बोले पीपीई किट्स घालून आम्हाला भेटण्यासाठी परवानगी देईल असे सांगण्यात आले.दरम्यान  सकाळी अचानक मृत्यू झाला असल्याचे आम्हाला सांगण्यात आले असून  ऑक्सिजन अभावीच मृत्यू झाला असल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईक साधना पाटील यांनी केला आहे . ठाणे महापालिका प्रशासनामार्फत मात्र अजून काही खुलासा करण्यात आला नाही .तर यासंदर्भात वेदांत हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ.अजय सिंग यांच्याशी संपर्क साधला असता केवळ तीन मृत्यू झाला असुन हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.ऑक्सिजनचा मीठ टॅंक संपला होता मात्र जम्बो टॅंक शिल्लक होता.आय सी यु मधे 25 ते 30 गंभीर रुग्ण असून 12 तासांत हे तीन मृत्यू झाले असल्याचे सिंग यांनी सांगितले .

 रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 53 रुग्ण दाखल असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले नाही. तसेच रुग्ण दगावण्याचा घटना या पहाटे चार ते सकाळी 9 या कालावधीत मृत्यू झाले आहेत.       - संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस