शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Oxygen Shortage: ऑक्सिजन न मिळाल्याने ठाण्यात ४ रुग्ण दगावले; नातेवाईकांचा आरोप हॉस्पिटलने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 13:08 IST

Oxygen Shortage, corona virus in Thane: ठाण्यातील वर्तक नगर येथील खाजगी कोविड हॉस्पिटल वेदांत रुग्णालयात ही घटना घडली आहे. रुग्णालयाखाली नातेवाईक आणि मनसे, भाजप पक्षाचे पदाधिकारी जमले असून रुग्णालया बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

ठाण्यातील वर्तक नगर नाक्यावरील वेदांत या खाजगी कोरोना रुग्णालयातील 4 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्सिजन संपल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला असल्याने हॉस्पिटलच्या  बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठाणे महापालिकेचे अधिकारी देखील रुग्णालयात पोहचले आहेत.रुग्णालय प्रशासनाने मात्र तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची कबुली दिली असून हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले नसल्याचे रुग्णालयाच्या वगीने स्पष्ट करण्यात आले आहे. (Maharashtra | Four #COVID19 patients died at Vedanta hospital in Thane early morning today. An investigation has been initiated to ascertain the cause of their death: Thane Municipal Corporation)

      वर्तकनगर नाक्यावर वेदांत या खाजगी हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन अभावी 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचा मॅसेज  व्हायरल झाला. त्यानंतर हॉस्पिटल मधील रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले. प्रकरण वाढू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला . घटनास्थळी आलेले आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रकारणची चौकशी करण्याची मागणी केली असून सर्व गैरव्यवहाराची चौकशी सिव्हिल सर्जन मार्फत करण्याची मागणी केली आहे. आम्ही दोन दिवस डॉक्टरांच्या संपर्कात होतो , पैसे भरून देखील योग्य ट्रीटमेंट मिळत नव्हती .

 रात्री आमचे डॉक्टरांशी बोलल्यानंतर डॉक्टर बोले पीपीई किट्स घालून आम्हाला भेटण्यासाठी परवानगी देईल असे सांगण्यात आले.दरम्यान  सकाळी अचानक मृत्यू झाला असल्याचे आम्हाला सांगण्यात आले असून  ऑक्सिजन अभावीच मृत्यू झाला असल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईक साधना पाटील यांनी केला आहे . ठाणे महापालिका प्रशासनामार्फत मात्र अजून काही खुलासा करण्यात आला नाही .तर यासंदर्भात वेदांत हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ.अजय सिंग यांच्याशी संपर्क साधला असता केवळ तीन मृत्यू झाला असुन हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.ऑक्सिजनचा मीठ टॅंक संपला होता मात्र जम्बो टॅंक शिल्लक होता.आय सी यु मधे 25 ते 30 गंभीर रुग्ण असून 12 तासांत हे तीन मृत्यू झाले असल्याचे सिंग यांनी सांगितले .

 रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 53 रुग्ण दाखल असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले नाही. तसेच रुग्ण दगावण्याचा घटना या पहाटे चार ते सकाळी 9 या कालावधीत मृत्यू झाले आहेत.       - संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस