शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

मोखाड्यामध्ये नागली, भातपिकावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:27 AM

शेतकरी धास्तावले : हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती, मुसळधार पावसाचा परिणाम

जव्हार : मोखाडा तालुक्यात खरिपात भात, नागली आणि वरई ही मुख्य आणि नगदी पिके घेतली जातात. सततच्या मुसळधार पावसामुळे भातावर बगळ्या तर नागली पिकावर बेडक्या आणि खैºया रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतातच हे पीक आडवे होऊ न ते कुजू लागले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार असून धान्याऐवजी हाती पेंढाच येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मोखाड्यात खरिपाच्या एकूण १३ हजार हेक्टर शेतीच्या चार हजार ५०० हेक्टर नागली, तर भाताचे दोन हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. येथील आदिवासी शेतकऱ्यांना एकमेव खरीप पिकाचाच उदरनिर्वाहासाठी आधार आहे. अन्य कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पोटरीत आलेल्या ( लोंब येण्याची वेळ ) पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.मुख्य नगदी पीक असलेल्या नागलीवर बेडक्या आणि खैºया तर भातपिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उभे पीक आडवे होऊन जमीनदोस्त होऊ लागले आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. यापुढे सतत कोसळधार सुरू राहिल्यास हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊन शेतकºयांच्या हाती गवताचा पेंढा येणार आहे.नागली व भाताचे पीक चांगले बहरले होते. मात्र, सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने या पिकांवर बगळ्या, बेडक्या आणि खैºया हा रोग पडला आहे. कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी ही पिकांची पाहणी केली आहे. त्यामुळे या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी.- दिलीप जागळे,शेतकरी व माजी सरपंच, गोमघर-डोंगरवाडी 

टॅग्स :thaneठाणे