शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

मोरीवली गावावर शोककळा; आठ भाविक हे एकट्या मोरीवलीचे, संपूर्ण गाव हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 06:23 IST

मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी धाव घेतली.

- पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथनजीकच्या मोरीवली गावावर शुक्रवारी शोककळा पसरली. १५ बसगाड्यांमधील एका बसला झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्या दहा जणांपैकी आठ भाविक हे एकट्या मोरीवली गावचे असल्यामुळे संपूर्ण गाव हळहळले. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी धाव घेतली. यासोबत राष्ट्रवादीचे शहरप्रमुख सदाशिव पाटील यांनीही नातलगांची भेट घेऊन सांत्वन केले. 

चौघा चिमुकल्यांचा जीव थोडक्यात वाचला

अपघातग्रस्त बसमध्ये गौरव दिनकर आणि वैष्णव सासे हे आपल्या इतर दोन मित्रांसह प्रवास करीत होते. ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या केबिनमध्ये चौघांची मस्ती सुरू हाेती. प्रवाशांनी त्यांना उल्हासनगरमध्ये बस थांबवून दुसऱ्या बसमध्ये पाठवले. याचवेळी त्या बसमधून प्रवास करणाऱ्या आणखी एका जोडप्याने बसायला जागा न मिळाल्याने बस बदलली. त्यामुळे या जोडप्यासह चार चिमुकल्यांचा जीव वाचला.

काँग्रेसचे कार्यकर्ते रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी

मोरवली गावातील ग्रामस्थांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाल्याची माहिती मिळताच अंबरनाथमधील काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील आणि नगरसेवक उमेश पाटील यांनी रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी धाव घेतली. किरकोळ जखमी झालेल्यांना परत आणणे आणि मृतदेह अंबरनाथला आणण्याकरिता त्यांनी रुग्णवाहिकांचा वापर केला.

टॅग्स :Accidentअपघातshirdiशिर्डीNashikनाशिकambernathअंबरनाथ