शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वाटाणा, वांगी, शेवगा महागला, अन्य भाज्यांचे भाव मात्र घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 02:55 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजारात (एपीएमसी) भाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव घसरले आहेत. दिवाळीत अनेकांनी मिठाई व फराळाला प्राधान्य दिल्याने भाजी मार्केट ओस पडले आहे. पाच दिवसांपासून बाजार थंड आहे.

- मुरलीधर भवारकल्याण - कल्याण कृषी उत्पन्न बाजारात (एपीएमसी) भाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव घसरले आहेत. दिवाळीत अनेकांनी मिठाई व फराळाला प्राधान्य दिल्याने भाजी मार्केट ओस पडले आहे. पाच दिवसांपासून बाजार थंड आहे. बाजारात हिरवा वाटाणा, वांगी आणि शेवग्याच्या शेंगा महाग झाल्या आहेत. दिवाळीनंतरच बाजारात तेजीची शक्यता व्यक्त केली जात आहे.सध्या राज्यात हिरव्या वाटाण्याचे पीक घेण्यास हवामान अनुकूल नाही. त्यामुळे त्याचे पीक घेतले जात नाही. एरव्हीही हिरवा वाटाणा मध्य प्रदेशातून येतो. सध्या बाजारात विक्रीसाठी आलेला हिरवा वाटाणा हा हिमाचल प्रदेशातून येत आहे. १० किलो हिरव्या वाटाण्याची गोणी घाऊक बाजारात एक हजार रुपये किमतीला विकली जात आहे. तर, किरकोळ बाजारात त्याची १६० रुपये किलोने विक्री होत आहे. त्यामुळे आलू मटार भाजी, हिरवा वाटाण्याचा पुलाव करणे ग्राहकांच्या खिशाला परवडणारे नाही. भाज्यांमध्ये हिरवा वाटाणा हा राजा समजला जातो. बाजारात त्याला मागणी जास्त असते. त्यामुळे तो नेहमीच भाव खाऊन जातो.हिरव्या वाटाण्यापाठोपाठ स्वस्त असलेली वांगी सध्या महाग विकली जात आहे. किरकोळ बाजारात एक किलो वांग्याला ६० रुपये भाव मिळत आहे. तर, घाऊक बाजारात ३२ ते ४० रुपये किलोने विकली जात आहे. हवामानबदलामुळे वांग्याचा माल लगेच किडतो. त्यामुळे चांगल्या मालाला किरकोळ बाजारात ग्राहकाला किलोमागे ६० रुपयांची किंमत मोजावी लागत आहे. तसेच, शेवग्याच्या शेंगांचा भाव जास्त आहे. चेन्नई आणि हैदराबाद येथून शेवग्याच्या शेंगा विक्रीस आल्या आहेत. घाऊक बाजारात शेवग्याची शेंग ४० रुपये, तर किरकोळ बाजारात ६० रुपये दराने विकली जात आहे.हिरवा वाटाणा, वांगी आणि शेवग्याच्या शेंगा सोडल्या, तर अन्य भाज्यांचे भाव घसरले आहेत. भेंडीची भाजी घाऊक बाजारात ३२ रुपये दराने आहे. किरकोळ बाजारात तिचा भाव किलोला ८ ते १० रुपये आहे. बाजारात गुजरात भेंडीची चलती आहे. टोमॅटोचे २५ किलो वजनाचे एक कॅरेट १५० ते २०० रुपयांना घाऊक बाजारात विकले जात आहे. किरकोळ बाजारात सहा ते आठ रुपये दराने टोमॅटो विकला जात आहे. गाजर राजस्थानमधील जयपूर येथून येत आहे. जोधपुरी गाजर हे गाजरहलव्यासाठी खरेदी केले जाते. घाऊक बाजारात २५ ते ३० रुपये किलो दर आहे, तर किरकोळ बाजारात या गाजराचा भाव किलोला ४० रुपये आहे. साधे गाजर हे बंगळुरू येथून येत आहे. त्याचा भाव १० ते १५ रुपये किलो आहे. त्याचा वापर व्हेज बिर्याणी व पुलावमध्ये केला जातो. पत्ताकोबी घाऊक बाजारात तीन ते पाच रुपये किलो तर किरकोळ बाजारात आठ ते १० रुपये किलोने विकला जात आहे. फ्लॉवरचा भाव घाऊक बाजारात आठ ते १० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात २० रुपये आहे.ढोबळी मिरची घाऊक बाजारात किलोला ३० रुपये, तर किरकोळ बाजारात ४० रुपये किलो, फरसबी घाऊक बाजारात २० ते ३० रुपये किलो आणि किरकोळ बाजारात ३५ रुपये किलो आहे. घेवडा घाऊक बाजारात २५ रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ३० रुपये किलो, काकडी घाऊक बाजारात १० ते १२ रुपये किलोे तर, किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये किलोने विकली जात आहे. दोडका घाऊक बाजारात २० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ३० रुपये किलो आहे. घोसाळी घाऊक बाजारात किलोला १० ते १२ रुपये, तर किरकोळ बाजारात २५ रुपये किलो आहे. अलिबागची तोंडली घाऊक बाजारात २० ते ३० रुपये किलोने विकली जात आहे. गुजरातहून येणाऱ्या तोंडलीचा भाव किलोमागे १० रुपये आहे. ही तोंडली स्वस्त असल्याने तिला मागणी आहे.२५ गाड्यांचा माल पडूनकल्याण एपीएमसीमध्ये बुधवारी भाज्यांच्या ७० गाड्या आल्या होत्या. त्यापैकी २५ गाड्यांच्या मालाला उचल नाही. तो बाजार समितीत तसाच पडून आहे. बाजार थंडा आहे. भावही घसरला आहे, असे भाजीविक्रेते रंगनाथ कारभारी विचारे यांनी सांगितले.दुधी सहा ते आठ रुपये किलोहिवाळ्यात दुधीचा भाव घसरतो. दुधी घाऊक बाजारात सहा ते आठ रुपये किलो तर, किरकोळ बाजारात १० ते १५ रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे दिवाळीत दुधीहलव्याच्या बेत गृहिणींना करता येणार आहे.हृदयविकाराच्या रुग्णांनी आरोग्यासाठी दुधीचा रस सकाळी प्यायचा असतो. त्यांच्यासाठी दुधीचा रस घरच्याघरी करण्यासाठी स्वस्त दुधी घेता येऊ शकतो, ही माहितीविचारे यांनी दिली आहे. काही दिवसात थंडीला सुरुवात होईल. त्यावेळीही भाज्यांचे भाव कमी राहतील, असे जाणकारांनी सांगितले.

टॅग्स :vegetableभाज्याkalyanकल्याण