शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

ठाण्यातील मूळ मालकास मिळाली अखेर १०९ गुंठे जमीन: महसूल विभागाने दिला सातबारा

By जितेंद्र कालेकर | Updated: April 6, 2018 22:37 IST

सुमारे १०९ गुंठे जमीन भलत्याच व्यक्तींच्या नावावर झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर महसूल विभागाने संबंधित जमिनीचा सातबारा मूळ जमीनमालकाच्या नावावर करून तशी फेरफार नोंदही केली आहे.

ठळक मुद्दे' लोकमत'चे मानले आभार आरोपींचा अटकपूर्व जामीनही फेटाळलालोकमत इफेक्ट

जितेंद्र कालेकरठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत तयार करून सुमारे १०९ गुंठे जमीन भलत्याच व्यक्तींच्या नावावर झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने संबंधित जमिनीचा सातबारा मूळ जमीनमालकाच्या नावावर करून तशी फेरफार नोंदही केली आहे. याबाबतचे पत्र मूळ जमीनमालक रामदास पाटील यांना देसाईगावच्या तलाठी सपना चौरे यांच्यामार्फत गुरुवारी देण्यात आले. शासनाने केलेल्या या कार्यवाहीबद्दल त्यांनी ‘लोकमत’सह महसूल अधिकाऱ्यांचेही आभार मानले आहे.बनावट कागदपत्रांच्या आधारे जितेंद्र देशमुख (रा. डोंबिवली) आणि सुनंदा वाघमारे (रा. मीठबंदर रोड, ठाणे) यांच्यासह आठ जणांनी रामदास पाटील यांची सुमारे १०९ गुंठे जमीन हडपली होती. याप्रकरणी मार्च २०१८ मध्ये डायघर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्यामुळे पोलीस आणि महसूल विभागाकडून स्वतंत्रपणे चौकशी सुरू होती. पाटील यांनी पोलीस आणि महसूल विभागाकडे फेºया मारूनही त्यांना दाद दिली जात नव्हती. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘चक्क १०९ गुंठे जमीन लाटली’, ‘आठ जणांविरुद्ध गुन्हा : बनावट दस्त आणि मृत व्यक्तीची स्वाक्षरी दाखवून केला व्यवहार’ या मथळ्याखाली ४ एप्रिल २०१८ च्या ‘लोकमत’, ‘हॅलो ठाणे’च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. याच वृत्ताची दखल घेऊन ठाण्याचे प्रांताधिकारी सुदाम पाटील यांनी दुसºयाच दिवशी म्हणजे ५ एप्रिल रोजी १४६१ आणि १४६२ क्रमांकांचे फेरफार रद्द करून मूळ मालक पाटील यांच्यासह २५ जणांच्या नावाने सात-बारा करण्याचे आदेश दिले. त्यावर दहिसरचे मंडळ अधिकारी कुंदन जाधव यांनी देसाई गावच्या तलाठी सपना चौरे यांना त्यावर कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार, पाटील यांना कार्यालयात बोलावून गुरुवारी सायंकाळी जमीन त्यांच्या नावावर झाल्याचा सातबारा देण्यात आला.दरम्यान, ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या यातील सुनंदा वाघमारे (तलाठ्याची पत्नी), जितेंद्र देशमुख (तलाठ्याचा मदतनीस), एकनाथ गोटेकर (मेहुणा), यशवंत शिंदे, फुलचंद पाटील आणि विश्वनाथ पाटील या सहा जणांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला. तर, महसूल विभागाने तातडीने याप्रकरणी दखल घेऊन मूळ मालकाचा सात-बारा नावावर केल्याने देसाई गावचे तलाठी ए.एम. मिरकुटे यांचा मात्र अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे...................... 

‘‘मृत व्यक्तींच्या स्वाक्ष-या करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त बनवून जमीन दुस-याच्या नावावर झाल्याचे समजल्यानंतर १५ जानेवारी २०१८ रोजी डायघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. दोन महिन्यांच्या चौकशीनंतर याप्रकरणी १७ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला. परंतु, २० दिवसांत कोणालाही अटक झाली नाही. ३ एप्रिल रोजी ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच शासनाला जाग आली. त्यानंतर, उपविभागीय अधिकाºयांनी दखल घेऊन १०९ गुंठे जमीन मूळ मालकांना परत केली. त्याबद्दल महसूल अधिकारी आणि ‘लोकमत’चे आभारी आहोत.’’रामदास पाटील, पाटील, देसाई गाव, ठाणे 

‘‘यातील आरोपींना शोधण्यासाठी दोन वेगवेगळी पथके तयार केली आहे. डोंबिवली आणि ठाण्याच्या कोपरी येथेही त्यांचा शोध घेण्यात आला. त्यांच्या घरांना टाळे होते. ते पसार झाले असले, तरी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक केली जाईल.’’सुशील जावळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डायघर पोलीस ठाणे

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे