शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

"एखाद्याला मुलगा झाला, तरी काही जण श्रेय घेतात अन् म्हणतात..."; देवेंद्र फडणवीस यांची तुफान टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 15:30 IST

सध्याच्या काळात आपण न केलेल्या कामाचेही श्रेय घेण्याचा काही लोकांचा विषय आहे. कोणतेही काम आमच्याचमुळे झाले असल्याचा दावा केला जात आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

ठाणे- ठाण्यातील मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच नियमावली मंजुरी केली होती. मात्र, त्याच्या अंमलबजावणीला आणखी एक वर्षभराचा कालावधी लागला. सध्याच्या काळात आपण न केलेल्या कामाचेही श्रेय घेण्याचा काही लोकांचा विषय आहे. कोणतेही काम आमच्याचमुळे झाले असल्याचा दावा केला जात आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या निधीतून ठाण्यात दिव्यांग स्नेही उद्यान व आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून उभारलेल्या कै. वसंतराव डावखरे प्रेक्षा गॅलरीसह विविध विकास कामे आणि ठाण्यातील भाजपा नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचे फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पाटील, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, प्रदेश सचिव संदिप लेले, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मणेरा, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, स्नेहा आंब्रे, कविता पाटील, नम्रता कोळी, नंदा पाटील आदींची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही जातीची संख्या न पाहता वंचितांचे राज्य उभारले. राम राज्यानुसार सर्वांना समान अधिकार दिले, तेच सूत्र पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कल्याणकारी सरकार चालविले जात आहे. तसेच दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

ठाणे शहरातील मोडकळीस आलेल्या अधिकृत इमारतींविषयी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी सातत्याने संघर्ष केला. त्या रहिवाशांना न्याय देण्यासाठी माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात नियमांना मंजुरी देण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणी व घोषणा होण्यास वर्षभराचा कालावधी लागला. या कामाचे श्रेय घेण्यासाठीच अंमलबजावणी रखडवली होती का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. सध्याच्या काळात न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही लोकांचा तोच विषय आहे. मात्र, सामान्यांना कोण काम करीत आहे, ते माहिती आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काम करीत राहावे. छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन शेवटच्या माणसांपर्यंत न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करू या, असे आवाहन फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.

यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणच्या दुर्गाडी पुलासह विविध कामांबाबतचे भाजपाचे श्रेय खेचून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आता ठाणे व कल्याण शहरात आपण केलेल्या कामाचे श्रेय ओरडून सांगण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. या वेळी विनय सहस्त्रबुद्धे, संजय केळकर, निरंजन डावखरे यांचीही भाषणे झाली 

'एखाद्याला मुलगा झाला, तरी श्रेय घेतात'एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण श्रेय घेतात. आमच्या प्रेरणेने त्यांना मुलगा झाल्याचे म्हणतात, असा टोलाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

'शिवरायांनी जागविलेले पौरुष पुन्हा निर्माण करण्याची गरज' -मुघलांची मनसबदारी व चाकरी करीत असलेल्या समाजात छत्रपती शिवाजी महाराजांनी पौरुष निर्माण केले होते. आताच्या समाजात ते पौरुष पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे. छत्रपती शिवरायांच्या रक्तातील अंश प्रत्येक व्यक्तीत असून, प्रत्येकाने अन्यायाविरोधात लढण्यासाठी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजातर्फे आयोजित कार्यक्रमात केले. या वेळी शिवज्योतीचे पूजन करून शिव सन्मान ज्योत यात्रा काढण्यात आली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाthaneठाणे