शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

मुंबई, ठाण्याला पाणी पाजणाऱ्या भातसा धरणात अवघा ४३ टक्के पाणीसाठा

By सुरेश लोखंडे | Updated: May 1, 2023 18:25 IST

पावसाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी महापालिकांना केंद्र व राज्य शासनाने पाणी राखून ठेवण्याचे सुचविले आहे.

ठाणे : पावसाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी महापालिकांना केंद्र व राज्य शासनाने पाणी राखून ठेवण्याचे सुचविले आहे. या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मे महिन्याच्या प्रारंभी धरणातील पाणीसाठ्याची चाचपणी केली असता मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत अवघा ४२.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात दररोज पाणी वापरासह सध्याच्या उन्हाने बाष्पीभवन होऊन या महिनाअखेर हा पाणीसाठा अत्यल्प राहणार असल्याची चिंता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यात दक्षिण पॅसिफिक महासागरात ‘अल निनो’ हा समुद्र प्रवाह सक्रिय झाला आहे. त्यामुळे मान्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जूननंतर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. यंदा विलंबाने होणारा पाऊस ७० ते ८० टक्के पडेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळीस्थितीदेखील उद्भवू शकते. त्यामुळे पाण्याच्या वापरात काटकसर कशी करायची? धरणांमध्ये सध्या पाणीसाठा किती? त्यातून बचतीचा मार्ग अवलंबून पाणीसाठा राखून ठेवण्यासाठी महापालिकांना नगरविकास विभागाने धारेवर धरले आहे. मुंबई, ठाणे या महानगरांना शहापूरजवळील भातसा या मोठ्या जलाशयातून पाणीपुरवठा होतो. त्यात फक्त ४२.७१ टक्के म्हणजे ४०२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या धरणात आजपर्यंत ४७.०२ टक्के पाणीसाठा होता.

या धरणांत आहे एवढा पाणीसाठा

भातसाप्रमाणेच पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणात २४ दलघमी पाणीसाठा असून, तो अवघा १३.६६ टक्के आहे. अप्पर वैतरणात ४९.५७ टक्के पाणीसाठा असून, १६४.२४ दलघमी पाणी उपलब्ध आहे. तानसात ३७.९१ टक्के साठा म्हणजे ५४.९९ दलघमी पाणी आहे. तर मोडकसागरमध्ये ४२.७३ दलघमी म्हणजे ३३.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ठाण्याप्रमाणेच जिल्ह्यातील केडीएमसी, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर आदी महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीच्या आंध्रा धरणात ४३.२८ टक्के म्हणजे १४६.७८ दलघमी पाणीसाठा आहे. या शहरांसह सर्व एमआयडीसीमधील उद्योगांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातही अवघा ४१.८४ टक्के साठा शिल्लक आहे. सध्या १४१.७८ दलघमी पाणीसाठा असून, गेल्या वर्षी मेच्या प्रारंभी ४६ टक्के पाणीसाठा होता.