शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

मुंबई, ठाण्याला पाणी पाजणाऱ्या भातसा धरणात अवघा ४३ टक्के पाणीसाठा

By सुरेश लोखंडे | Updated: May 1, 2023 18:25 IST

पावसाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी महापालिकांना केंद्र व राज्य शासनाने पाणी राखून ठेवण्याचे सुचविले आहे.

ठाणे : पावसाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी महापालिकांना केंद्र व राज्य शासनाने पाणी राखून ठेवण्याचे सुचविले आहे. या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मे महिन्याच्या प्रारंभी धरणातील पाणीसाठ्याची चाचपणी केली असता मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत अवघा ४२.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात दररोज पाणी वापरासह सध्याच्या उन्हाने बाष्पीभवन होऊन या महिनाअखेर हा पाणीसाठा अत्यल्प राहणार असल्याची चिंता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यात दक्षिण पॅसिफिक महासागरात ‘अल निनो’ हा समुद्र प्रवाह सक्रिय झाला आहे. त्यामुळे मान्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जूननंतर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. यंदा विलंबाने होणारा पाऊस ७० ते ८० टक्के पडेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळीस्थितीदेखील उद्भवू शकते. त्यामुळे पाण्याच्या वापरात काटकसर कशी करायची? धरणांमध्ये सध्या पाणीसाठा किती? त्यातून बचतीचा मार्ग अवलंबून पाणीसाठा राखून ठेवण्यासाठी महापालिकांना नगरविकास विभागाने धारेवर धरले आहे. मुंबई, ठाणे या महानगरांना शहापूरजवळील भातसा या मोठ्या जलाशयातून पाणीपुरवठा होतो. त्यात फक्त ४२.७१ टक्के म्हणजे ४०२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या धरणात आजपर्यंत ४७.०२ टक्के पाणीसाठा होता.

या धरणांत आहे एवढा पाणीसाठा

भातसाप्रमाणेच पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणात २४ दलघमी पाणीसाठा असून, तो अवघा १३.६६ टक्के आहे. अप्पर वैतरणात ४९.५७ टक्के पाणीसाठा असून, १६४.२४ दलघमी पाणी उपलब्ध आहे. तानसात ३७.९१ टक्के साठा म्हणजे ५४.९९ दलघमी पाणी आहे. तर मोडकसागरमध्ये ४२.७३ दलघमी म्हणजे ३३.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ठाण्याप्रमाणेच जिल्ह्यातील केडीएमसी, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर आदी महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीच्या आंध्रा धरणात ४३.२८ टक्के म्हणजे १४६.७८ दलघमी पाणीसाठा आहे. या शहरांसह सर्व एमआयडीसीमधील उद्योगांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातही अवघा ४१.८४ टक्के साठा शिल्लक आहे. सध्या १४१.७८ दलघमी पाणीसाठा असून, गेल्या वर्षी मेच्या प्रारंभी ४६ टक्के पाणीसाठा होता.