शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

ढोलताशा पथकांनी धरली परतीची वाट, अवघा ३५ ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याने बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 03:08 IST

गणेशोत्सवात वाजंत्री करून चार पैसे मिळतील, या आशेने राज्यभरातील शेतमजुरी, मोलमजुरी करणारे मुंबई, ठाणे उपनगरांत दाखल होतात.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : गणेशोत्सवात वाजंत्री करून चार पैसे मिळतील, या आशेने राज्यभरातील शेतमजुरी, मोलमजुरी करणारे मुंबई, ठाणे उपनगरांत दाखल होतात. अनेक गणेशभक्तही आपल्या लाडक्या बाप्पाला ढोलताशांच्या गजरात निरोप देण्यासाठी त्यांना वाजंत्रीच्या कामाच्या आॅर्डर देतात. यंदाही डोंबिवलीत ५०० वाजंत्री दाखल झाले होते. मात्र, यंदा व्यवसाय तेजीत नसल्याने अंदाजे ३०० पथकांनी परतीची वाट धरली आहे. यंदाच्या वर्षी ३५ ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याचे एका पथकाचे प्रमुख भारत पाटोळे यांनी सांगितले.पाटोळे म्हणाले, ‘बुलडाणा जिल्ह्यातून अंदाजे ६० पथके डोंबिवलीत आली आहेत. मागील १० वर्षांपासून आम्ही गणेशोत्सवात येथे येतो. या दिवसांत गावी फार कामे नसतात. यंदा ढोलताशा वाजवून चांगली कमाई होईल, असे वाटत होते. परंतु, गेल्या काही वर्षांत या आशा फोल ठरत आहे. मागील वर्षी पावसामुळे व्यवसाय कमी झाला होता. तरीदेखील, ५० टक्के ग्राहकांकडून आॅर्डर मिळाल्या होत्या. परंतु, यंदा त्याहीपेक्षा कमी व्यवसाय झाला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यंदा मानधनही कमी केले आहे. मागील वर्षी एक तासाला तीन हजार रुपये मिळाले होते. यंदा दोन हजार रुपये मिळाले आहेत. दीड, पाच, सात आणि अनंत चतुर्दशीला गणेशाला निरोप दिला जात असल्याने त्या दिवसापुरते काम मिळते. त्यानंतरचे दिवस बसून काढावे लागतात. एका पथकात चार माणसे ढोलताशा वाजवण्यासाठी जातात. ढोलताशांकडे हळूहळू लोकांचा कल कमी होत असल्याचे दिसून येत आहे.’बुलडाण्यामध्ये सर्व गणपतींचे अनंत चतुर्दशीला विसर्जन होते. मागील सात दिवसांत चांगला व्यवसाय न झाल्याने आता गावाकडे तरी थोडीफार कमाई होईल, या आशेने अनेक पथकांनी परतीची वाट धरली. गणेशोत्सवानंतर मजुरी करून या पथकांतील सर्वजण आपली दिनचर्या चालवतात. यंदा शहरात व्यवसाय चांगला झाला नाही. एका माणसाला दिवसभरात २०० रुपये खर्च येतो. ग्राहक आले तरी घासाघीस करतात. त्यामुळे दीड हजारात एक आॅर्डर घेतो. काही नाही त्यापेक्षा किमान जेवण व प्रवासाचा खर्च तरी निघावा, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कमी दरात आॅर्डर घेतल्या जातात. त्यामुळे गावी जाईपर्यंत दोन हजार रुपये हातात उरतात, असे पाटोळे यांनी सांगितले.दुकानाबाहेरच काढतात रात्रवाजंत्रीकामासाठी डोंबिवलीतील चाररस्ता परिसरात दरवर्षी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून मंडळी येतात. यंदाही मलकापूर, राहुरी, शेगाव, नांदुरा, अकोला, खामगाव येथून वाजंत्री आले होते.राहण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना दुकानाबाहेरच्या जागेत भटक्या कुत्र्यांसोबत झोप काढावी लागत आहे. त्यांच्या व्यवस्थेसाठी कुणी पुढे येत नाही.सरकारने त्यांची दखल घेतली जावी, अशी अपेक्षा या मंडळींची आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेती चांगली होत नाही, म्हणून आधीच त्रस्त आहे. त्याला वाजंत्रीकामातून काही दोन पैशांची अपेक्षा होती. ती देखील फोल ठरली आहे. अशा परिस्थितीत वाजंत्री काम करणाऱ्यांचा वाली कोण, असा सवालही त्यांनी केला आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८newsबातम्या