शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ढोलताशा पथकांनी धरली परतीची वाट, अवघा ३५ ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याने बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 03:08 IST

गणेशोत्सवात वाजंत्री करून चार पैसे मिळतील, या आशेने राज्यभरातील शेतमजुरी, मोलमजुरी करणारे मुंबई, ठाणे उपनगरांत दाखल होतात.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : गणेशोत्सवात वाजंत्री करून चार पैसे मिळतील, या आशेने राज्यभरातील शेतमजुरी, मोलमजुरी करणारे मुंबई, ठाणे उपनगरांत दाखल होतात. अनेक गणेशभक्तही आपल्या लाडक्या बाप्पाला ढोलताशांच्या गजरात निरोप देण्यासाठी त्यांना वाजंत्रीच्या कामाच्या आॅर्डर देतात. यंदाही डोंबिवलीत ५०० वाजंत्री दाखल झाले होते. मात्र, यंदा व्यवसाय तेजीत नसल्याने अंदाजे ३०० पथकांनी परतीची वाट धरली आहे. यंदाच्या वर्षी ३५ ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याचे एका पथकाचे प्रमुख भारत पाटोळे यांनी सांगितले.पाटोळे म्हणाले, ‘बुलडाणा जिल्ह्यातून अंदाजे ६० पथके डोंबिवलीत आली आहेत. मागील १० वर्षांपासून आम्ही गणेशोत्सवात येथे येतो. या दिवसांत गावी फार कामे नसतात. यंदा ढोलताशा वाजवून चांगली कमाई होईल, असे वाटत होते. परंतु, गेल्या काही वर्षांत या आशा फोल ठरत आहे. मागील वर्षी पावसामुळे व्यवसाय कमी झाला होता. तरीदेखील, ५० टक्के ग्राहकांकडून आॅर्डर मिळाल्या होत्या. परंतु, यंदा त्याहीपेक्षा कमी व्यवसाय झाला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यंदा मानधनही कमी केले आहे. मागील वर्षी एक तासाला तीन हजार रुपये मिळाले होते. यंदा दोन हजार रुपये मिळाले आहेत. दीड, पाच, सात आणि अनंत चतुर्दशीला गणेशाला निरोप दिला जात असल्याने त्या दिवसापुरते काम मिळते. त्यानंतरचे दिवस बसून काढावे लागतात. एका पथकात चार माणसे ढोलताशा वाजवण्यासाठी जातात. ढोलताशांकडे हळूहळू लोकांचा कल कमी होत असल्याचे दिसून येत आहे.’बुलडाण्यामध्ये सर्व गणपतींचे अनंत चतुर्दशीला विसर्जन होते. मागील सात दिवसांत चांगला व्यवसाय न झाल्याने आता गावाकडे तरी थोडीफार कमाई होईल, या आशेने अनेक पथकांनी परतीची वाट धरली. गणेशोत्सवानंतर मजुरी करून या पथकांतील सर्वजण आपली दिनचर्या चालवतात. यंदा शहरात व्यवसाय चांगला झाला नाही. एका माणसाला दिवसभरात २०० रुपये खर्च येतो. ग्राहक आले तरी घासाघीस करतात. त्यामुळे दीड हजारात एक आॅर्डर घेतो. काही नाही त्यापेक्षा किमान जेवण व प्रवासाचा खर्च तरी निघावा, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कमी दरात आॅर्डर घेतल्या जातात. त्यामुळे गावी जाईपर्यंत दोन हजार रुपये हातात उरतात, असे पाटोळे यांनी सांगितले.दुकानाबाहेरच काढतात रात्रवाजंत्रीकामासाठी डोंबिवलीतील चाररस्ता परिसरात दरवर्षी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून मंडळी येतात. यंदाही मलकापूर, राहुरी, शेगाव, नांदुरा, अकोला, खामगाव येथून वाजंत्री आले होते.राहण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना दुकानाबाहेरच्या जागेत भटक्या कुत्र्यांसोबत झोप काढावी लागत आहे. त्यांच्या व्यवस्थेसाठी कुणी पुढे येत नाही.सरकारने त्यांची दखल घेतली जावी, अशी अपेक्षा या मंडळींची आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेती चांगली होत नाही, म्हणून आधीच त्रस्त आहे. त्याला वाजंत्रीकामातून काही दोन पैशांची अपेक्षा होती. ती देखील फोल ठरली आहे. अशा परिस्थितीत वाजंत्री काम करणाऱ्यांचा वाली कोण, असा सवालही त्यांनी केला आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८newsबातम्या