शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

केवळ १०७ आरक्षणे महापालिकेच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:02 IST

शहराचा विकास आराखडा तयार करताना त्यात ठेवलेली आरक्षणे ही शहर आणि नागरिकांच्या हितासाठी विकसित होणे आवश्यक असते.

- धीरज परबमीरा रोड : शहराचा विकास आराखडा तयार करताना त्यात ठेवलेली आरक्षणे ही शहर आणि नागरिकांच्या हितासाठी विकसित होणे आवश्यक असते. पण, आराखड्याला २१ वर्षे उलटूनही मीरा-भार्इंदरमधील ३३४ पैकी केवळ १०७ आरक्षणेच पालिकेने विकसित केली आहेत, तर १७ आरक्षणांच्या अंशत: जागाच घेतल्या आहेत. महासभेने गेल्या वर्षी केलेल्या आरक्षण ताब्यात घेण्याच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. बिल्डरसाठी पायघड्या घालणाऱ्या नगररचना विभागाकडून शहरहिताची आरक्षणे ताब्यात घेण्यास मात्र टोलवाटोलवी केली जात आहे.१९ गावांचा समावेश करून मीरा-भार्इंदर शहरांचा विकास आराखडा १९९७ मध्ये मंजूर झाला. हा आराखडा बनवताना सीआरझेड, कांदळवन क्षेत्राचा विचार न केल्याने काही आरक्षणे ही पर्यावरणाचा ºहास व नियमांच्या उल्लंघनामुळे विकसित करणे अवघड झाले आहे. नगररचना विभागाने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार ३३४ पैकी केवळ १०७ आरक्षणेच ताब्यात घेण्यात आली आहेत. तर, १७ आरक्षणांच्या अंशत: जागाच ताब्यात आल्या आहेत.विकास आराखड्यास २० वर्षे झाल्याने नव्याने सुधारित आराखडा तयार करण्याचे काम घेण्यात आले होते. पण, काहींनी फायद्यासाठी सोयीचे झोन व आरक्षणे टाकण्याच्या तक्रारी तसेच आराखडाफुटीचे प्रकरण ‘लोकमत’ने उघड केल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. त्यामुळे सरकारने सुधारित आराखडा रद्द केल्याचे जाहीर केले.आरक्षणांच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी कसे संगनमत करतात, हे नाट्यगृहाच्या एकमेव आरक्षणावरून स्पष्ट झाले. नाट्यगृहाचे आरक्षण त्यामुळे रद्द झाले. लोकप्रतिनिधी स्वत:च्या फायद्यासाठी आरक्षण रद्द करण्यापासून त्याचा वापर, बदल आदी अनेक प्रकार नगररचना विभागाच्या संगनमताने करत आले आहेत.आरक्षणाच्या जमिनी देण्याच्या मोबदल्यात टीडीआर दिला जात असला, तरी वजनदार राजकारणी, बिल्डर यांना तो सहज मिळतो. सामान्य शेतकरी वा नागरिकास नगररचना विभाग खेपा मारायला लावतो. टीडीआर देताना आरक्षण वा रस्ता आदींची जमीनही सातबारा नोंदी पालिकेच्या नावे करून घेतली जात नाही. तरीही, पालिका काहीच कारवाई करत नाही.नगररचना विभागातील अधिकारीवर्गावर आयुक्तांपासून लोकप्रतिनिधींची विशेष माया लपून राहिलेली नाही. बिल्डरांना वाटेल तशी बांधकाम परवानगी व सुधारित परवानगी देण्याचा उतावीळपणा असलेल्या आयुक्त व नगररचना विभागाकडून शहरातील आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी मात्र धडपड होताना दिसत नाही.अनेक आरक्षणांच्या जागेत बेकायदा बांधकामे झाली आहेत. तर, सर्रास वाणिज्यवापर सुरू आहे. गेल्या वर्षी महासभेत आरक्षणाच्या जागेवरील बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे हटवण्यासह जागा ताब्यात घेण्यासाठी भूसंपादन आदी कार्यवाही त्वरित सुरू करण्याचा ठराव सत्ताधारी भाजपाने केला होता.माहिती नसल्याने कारवाई कशी करणारआरक्षणाच्या जागेत कोणतीच परवानगी देऊ नये तसेच अतिक्रमण विभागाने बेकायदा अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करण्याचे ठरावात स्पष्ट केले होते. पण, नगररचना विभागाकडून कारवाईच झाली नाही. अतिक्रमण विभागासही आरक्षणांच्या जागेतील अतिक्रमण, बांधकामे यांची माहिती व सीमारेखा आखून दिली नसल्याने कारवाई तरी कशी करणार, असा सवाल एका अधिकाऱ्याने केला.आरक्षण लवकर ताब्यात घेण्यासह अतिक्रमण हटवण्याबाबतचा अढावा घेऊ. टीडीआर देण्यासाठी अडवणूक होत नाही. मालकी वाद असल्याने काही आरक्षणांचा टीडीआर देता येत नाही.- बालाजी खतगावकर, आयुक्त

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक