शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

'ऑनलाईन शिक्षण म्हणजे धूळफेक, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाची गरज' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 19:15 IST

ऑनलाईन शिक्षण जर सर्वां पर्यंत पोहचत असते तर अमेरिका शक्तिशाली राष्ट्राला शाळा सुरू करण्याची गरज भासली नसती अशी कोपरखळी मारत विवेक पंडित यांनी मार्गदर्शन केलं.

ठळक मुद्देऑनलाईन शिक्षण जर सर्वां पर्यंत पोहचत असते तर अमेरिका शक्तिशाली राष्ट्राला शाळा सुरू करण्याची गरज भासली नसती अशी कोपरखळी मारत विवेक पंडित यांनी मार्गदर्शन केलं.

भिवंडी - ऑनलाईन शिक्षण हे सर्वदूर सर्व विद्यार्थ्यांपर्यन्त पोहचू शकत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही धूळफेक असल्याचे मत राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी मंगळवारी भिवंडीत व्यक्त केले . भिवंडी पोलीस संकुल येथे आयोजित भिवंडी तालुका स्तरीय बैठकी दरम्यान तेे बोलत होते .या बैठकीस आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर एच किल्लेदार ,उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर ,महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया ,तहसीलदार शशिकांत गायकवाड ,पोलीस उपअधीक्षक दिलीप गोडबोले, गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .          ऑनलाईन शिक्षण जर सर्वां पर्यंत पोहचत असते तर अमेरिका शक्तिशाली राष्ट्राला शाळा सुरू करण्याची गरज भासली नसती अशी कोपरखळी मारत विवेक पंडित यांनी महसूल ,पुरवठा ,शिक्षण ,सार्वजनिक आरोग्य ,महिला व बाल कल्याण ,वन , वीज ,रोजगार हमी योजना या विभागांची झाडाझडती घेत त्यांच्या कडील समस्या जाणून घेतानाच करावयाच्या उपाययोजना या बाबत मार्गदर्शन केले. आज ही पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत तर ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क समस्या असल्याने शासन किती ही म्हणत असलं तरी असंख्य विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहत असल्या बद्दल खंत व्यक्त करीत , कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना सकस पौष्टिक आहार पोहचविण्याची जबाबदारी असून प्रत्येक कामाच्या ठिकाणी उलट तपासणी झाल्यास आपल्या कामातील उणीव दिसून आल्यास त्याच्या निराकरणा साठी मदत होऊ शकते असे स्पष्ट करीत, पुरवठा विभाग कडून आदिवासी कुटुंबा पर्यंत शासनाच्या मोफत व अल्प दरातील धान्य पोहचविण्याची जबाबदारी असून त्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिले आहे.          या बैठकी दरम्यान प्रलंबित वन हक्के दावे निकाली काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर पुढाकार घेण्या बाबत सूचना देत यासाठी समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचे आवाहन केले .या बैठकीस सर्व विभागातील अधिकारी , श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीcorona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण