शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कांदा शंभरी गाठणार, गृहिणींचे बजेट कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 00:51 IST

८० रुपये किलो : सामान्यांच्या डोळ्यांत अश्रू

ठाणे : अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकांचे नुकसान झाले असून गेल्या १५ दिवसांपासून ठाण्याच्या बाजारपेठेत येणाऱ्या कांद्याचे दर वाढतच आहेत. कांद्याची आवकच घटल्याने कांद्याचे दर सोमवारी ८० रुपये किलो होते. थोड्याच दिवसांत कांदा शंभरी गाठण्याची शक्यता विक्रेत्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पालेभाज्या, फळभाज्यांप्रमाणे कांदाही महागला आहे. ओतूर, जुन्नर, नगर या ठिकाणांहून ठाण्याच्या बाजारपेठेत कांद्याची आवक होत असते. जुना कांदा आता संपत आला आहे. जवळपास ५ ते १० टक्केच जुना कांदा बाजारात उपलब्ध आहे. अवकाळी पावसाचा फटका नवीन कांद्याला बसल्यामुळे येणारा नवीन कांदा खराब स्थितीमधील असल्याने कांद्याची आवक ५० टक्के घटली असल्याची माहिती कांदाविक्रेते संदीप चौधरी यांनी दिली. २२ आॅक्टोबरपासून ठाण्याच्या बाजारपेठेत कांद्याच्या दरात वाढ होत गेली. त्यावेळी कांदा किरकोळ बाजारात ५० रुपये किलो, तर होलसेल बाजारात ४० रुपये किलो होता. चार ते पाच दिवसांनंतर हाच कांदा १० रुपयांनी महागला आणि किरकोळ बाजारात ६० रुपये किलो तर होलसेल बाजारात ५० रुपये किलोवर पोहोचला. ३० आॅक्टोबर रोजी पुन्हा कांद्याचे दर वाढले आणि किरकोळ बाजारात ७० आणि होलसेल बाजारात ६० रुपये किलो अशा दराने विकला जाऊ लागला. सोमवारी हाच कांदा होलसेल बाजारात ६५ ते ७० रुपये तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. जुना कांदा संपत आल्याने आणि नवीन कांद्याचा दर्जा चांगला नसल्याने कांद्याचे दर शंभरीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे चौधरी यांनी सांगितले. पाऊस आता थांबला असला तरी पुढील महिनाभर कांदा महागच असेल, असेही ते म्हणाले. कांदा महागल्यामुळे कांद्याच्या खरेदीवर परिणाम झाला आहे. अडीच ते पाच किलो कांदा नेणारे ग्राहक आता एकच किलो कांदा नेत आहेत. कांदा संपल्यावर पुन्हा विकत घेऊ, अशी प्रतिक्रिया त्यांच्यातून उमटत आहे. कांदा महागल्याची नाराजी विक्रेते आणि ग्राहक दोघांमध्ये आहे. हॉटेलमध्येही गरजेपुरता कांदा वापरला जात असून जेवणाबरोबर ग्राहकांना कांदा देताना मर्यादित प्रमाणातच देत असल्याचे हॉटेलमालकांनी सांगितले.कांदाभजी महागणारठाण्यात खाद्यपदार्थांकरिता अनेक जॉइंट्स लोकप्रिय आहेत. अशा अनेक ठिकाणी कांदाभजी एकतर महागणार आहेत किंवा तूर्त काही दिवस कांदाभजी दिसणार नाहीत, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. ठाण्यातील मिसळ ही लोकप्रिय आहे. अनेकजण मिसळ खाण्याकरिता ठाण्यात येतात. मिसळची लज्जत वाढवणारा कांदा कमी प्रमाणात देण्यास हॉटेलमालकांनी सुरुवात केली आहे किंवा मिसळसोबतचा कांदा गायब झाला आहे. मांसाहारी जेवणासोबत दिला जाणारा कांदाही बंद करण्यात येणार असल्याचे काही हॉटेलमालकांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे