शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर पोलिसांकडुन दुचाकींवर एकतर्फी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 20:02 IST

नियमांना बगल देऊन पार्कींग करुन वाहतुक तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांपैकी केवळ दुचाकींवर भार्इंदर पोलिसांनी दोन दिवसांपासुन कारवाई सुरु केली असुन या कारवाईमागे काहींनी तक्रार केल्याचे समोर आले आहे.

 - राजू काळे 

भार्इंदर - नियमांना बगल देऊन पार्कींग करुन वाहतुक तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांपैकी केवळ दुचाकींवर भार्इंदर पोलिसांनी दोन दिवसांपासुन कारवाई सुरु केली असुन या कारवाईमागे काहींनी तक्रार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अशा तक्रारींना प्राधान्य देऊन केलेल्या एकतर्फी कारवाईमुळे दुचाकीचालकांमध्ये रोष पसरला आहे. 

भार्इंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उत्तन मार्गावरील पोलिस ठाणे ते भार्इंदर सेकंडरी शाळेदरम्यान वाहतुक रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्कींग करुन वाहतुकीचा रस्ता अरुंद केला जातो. याच मार्गावरील पोलिस ठाण्यासमोर उत्तनकडे जाणारा बस थांबा असुन या थांब्यालगतच रिक्षा स्टॅन्ड सुरु करण्यात आला आहे. येथे थांबणाऱ्या रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागत असुन त्या डबल पार्कींगप्रमाणे (अगोदरच पार्कींग केलेल्या खाजगी वाहनाशेजारी पार्कींग) रस्त्यावर उभ्या केल्या जातात. त्यामुळे येथुन ये-जा करणाऱ्या   नागरीकांना पदपथाचा पर्याय उपलब्ध असला तरी दुकानदारांच्या पसाऱ्यामुळे तेथुन ये-जा करणे अडचणीचे ठरते. परिणामी  नागरीकांना वाहतुकीच्या रस्त्यावरुनच ये-जा करावी लागते. या स्टॅन्डच्या विरुद्ध दिशेला देखील वाहनांची पार्कींग होत असल्याने एखादी बस, बसथांब्यावर थांबल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन वाहतुक काहीवेळेपुरती ठप्प होते. त्यातच अनेक दुकानांसमोर खाजगी वाहने उभी केली जात असल्याने त्यांच्या व्यवसायावर त्या वाहनांच्या पार्कींगमुळे परिणाम होत असल्याचा दावा दुकानदारांकडुन केला जात असल्याने त्या वाहनांच्या प्रामुख्याने दुचाकी वाहनांच्या पार्कींगची तक्रार भार्इंदर पोलिस ठाण्यात अनेकदा केली जाते. त्याची दखल घेत भार्इंदर पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासुन थेट येथील दुचाकी पार्कींगवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईतून मात्र चारचाकी तसेच दुकानात वस्तू देण्यासाठी रस्त्यावर उभे करण्यात येणाऱ्या  अवजड वाहनांना हेतुपुरस्सर वगळण्यात येत असल्याने पोलिसांच्या या दुचाकींवरील एकतर्फी कारवाईवर दुचाकीचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे भार्इंदर पोलिस ठाणे ते सेकंडरी शाळेदरम्यानचा रस्ता ‘पार्कींग-नो पार्कींग’च्या कक्षात अद्याप आणण्यात आला नाही. तसेच स्थानिक वाहतुक शाखेने अद्याप तेथे फलक देखील लावले नाहीत. अशा स्थितीत पोलिसांनी केवळ तक्रारींवरुन केलेली एकतर्फी कारवाई सरसकट वाहनांवर केली जावी, तत्पुर्वी वाहनचालकांच्या माहितीसाठी ‘पार्कींग, नो-पार्कींग’चे फलक लावावेत, अशी मागणी दुचाकीचालकांकडुन करण्यात येऊ लागली आहे. याबाबत भार्इंदर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना संपर्क साधला असता त्यांनी, वाहतुक कोंडी होत असल्यानेच कारवाई सुरु करण्यात आल्याचे सांगुन त्याविरोधात तक्रारीदेखील येत असल्याचे सांगितले. सुरु केलेली कारवाई सर्वच वाहनांवर  केली जात असुन चारचाकींवरील कारवाईसाठी जॅमरचा वापर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMira Bhayanderमीरा-भाईंदर