शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कल्याण आरटीओ हद्दीत एक लाख वाहनांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 4:46 AM

तीन वर्षांतील आकडेवारी : दुचाकी, मोटार, रिक्षांची संख्या मोठी ; पार्किंगच्या सुविधेकडे महापालिकांचे दुर्लक्ष

मुरलीधर भवार

कल्याण : सार्वजनिक वाहतूकव्यवस्था अपुरी पडत असल्याने दुचाकी, मोटारी आदी खाजगी वाहने खरेदी करण्यावर नागरिकांचा भर आहे. राज्य सरकारच्या मुक्त परवाना धोरणामुळे रिक्षांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे तीन वर्षांत कल्याण आरटीओ हद्दीत एक लाख नऊ हजार ४४३ वाहनांची नोंदणी झाली आहे.

कल्याण आरटीओ हद्दीत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, मुरबाड हा परिसर येतो. या परिसरात दुचाकींची २०१५-१६ मध्ये ५० हजार ३७०, २०१६-१७ मध्ये ६८ हजार १२६, तर यंदाच्या वर्षी ७६ हजार १८४ इतकी नोंद झाली आहे. मोटारींची २०१५-१६ मध्ये आठ हजार ९२७, २०१६-१७ मध्ये १२ हजार १३३, तर यंदाच्या वर्षी १५ हजार ३२७ इतकी नोंदणी झाली आहे. रिक्षांची २०१५-१६ मध्ये तीन हजार १४४, २०१६-१७ मध्ये पाच हजार ६२४, तर यंदाच्या वर्षी १३ हजार ३४६ इतकी नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर स्कूलबस, रुग्णवाहिका, ट्रक, टँकर, ट्रॅक्टर या वाहनांची नोंदणी झाली आहे. २०१५-१६ मध्ये ६५ हजार ७१९, २०१६-१७ मध्ये ९० हजार ७३५, तर यंदाच्या वर्षी ही संख्या एक लाख नऊ हजार ४४३ च्या घरात पोहोचली आहे. दोन वर्षांमध्ये वाहनांच्या नोंदणीत ३० टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी वाहननोंदणीपोटी आरटीओ कार्यालयाला २३७ कोटी रुपये, तर मागील तीन वर्षांत एकूण ६०९ कोटींचा महसूल मिळाला आहे, अशी माहिती आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.

केडीएमसी हद्दीत पुरेसे वाहनतळ नसल्याने नागरिक त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. बेकायदा पार्किंगवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांकडे टोइंग व्हॅन कमी आहेत. वाहनांची संख्या वाढत असताना पार्किंगच्या सुविधेचा विचार महापालिकांकडून होत नाही. त्यामुळे नव्याने येत असलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. प्रत्येक शहरातील चौकांत व शहराच्या मुख्य रस्त्यांवर रिक्षास्टॅण्ड आहेत. मात्र, बहुतांश स्टॅण्ड अधिकृत नाहीत. रिक्षांसाठी वेगळी पार्किंगची व्यवस्थाही उपलब्ध नाही. डोंबिवलीत एलिव्हेटेड रिक्षास्टॅण्ड रेल्वेस्थानकादरम्यान उभारला जाणार होता. मात्र, ते काम अद्याप सुरू झालेले नाही.सार्वजनिक वाहतूकव्यवस्था दुबळीच्केडीएमसीचा परिवहन उपक्रम आर्थिक कारणामुळे डबघाईला आला आहे. त्याचे खाजगीकरण होणार आहे.च्एसटीच्या बस लांब पल्ल्यावर धावत असल्या, तरी कल्याण डेपोतून शहर व ग्रामीण परिसरातील बसफेऱ्या बंद पडल्याआहेत. विठ्ठलवाडी-डोंबिवली-पुणे एसटी बस सुरू करूनबंद करण्यात आली.च्उल्हासनगर महापालिकेची परिवहनसेवा खाजगी कंपनीला देऊनही बंद पडली आहे.च्कल्याण हे मध्य रेल्वेवरील जंक्शन आहे. त्यामुळे येथे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे उपनगरी गाड्यांचा दररोजच खोळंबा होतो. अन्य नगरपालिकांनी परिवहन सेवाच सुरू केलेली नाही.च्सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे जाळे सक्षम नाही. त्यामुळे स्वत:च्या मालकीची वाहनखरेदी करण्यावर नागरिकांचा भर आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाParkingपार्किंग