शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
8
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
9
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
10
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
11
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
12
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
13
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
14
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
15
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
17
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
19
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
20
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास

ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात एकावेळी एका जोडप्याला मिळणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 00:42 IST

वेळ करावी लागणार आरक्षित

ठाणे : सोमवारपासून राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असून ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी येणाऱ्या जोडप्यांसाठीही कडक नियम लागू केले आहेत. यात एकावेळी एकाच जोडपे आणि त्यासोबत येणारे तीन साक्षीदार याशिवाय इतर नातेवाइकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, या कार्यालयात येण्याआधी जोडप्यांनी आधीच वेळ आरक्षित करणे बंधनकारक आहे.कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारला संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करावे लागले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर अनेकांना आपले विवाह. सोहळे रद्द करावे लागले तर काहींना पुढे ढकलावे लागले होते. परंतु, मार्च महिन्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट पाहता पुन्हा एकदा कडक नियम लागू करावे लागले आहेत. विवाहसोहळ्यासाठी येणाऱ्या जोडप्यांना या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यांना सोबत नातेवाईक आणता येणार नाही. गर्दी टाळण्यासाठी वधू, वर आणि तीन साक्षीदार यांनाच प्रवेश दिला जाईल. एका जोडप्याला विवाहाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास दिला जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी विवाहेच्छुक जोडप्यांनी वेळेची आगाऊ नोंदणी करणे बंधनकारक आहे. एखाद्या जोडप्याने एक वेळ आरक्षित केल्यास दुसऱ्या जोडप्याला ती वेळ घेता येणार नाही. जोडप्यांना केवळ फोटो काढण्यापुरतेच चेहऱ्यावरील मास्क काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. पक्षकारांनी स्वतःचे पेन वापरावे, इतरांकडे पेन मागू नये तसेच, कार्यालयात येताना दस्तऐवज आणि संबंधित कागदपत्रे याव्यतिरिक्त बॅग, पर्स नेण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती विवाह नोंदणी कार्यालयाचे यादव यांनी दिली. या व इतर सूचनांची माहिती देणारे फलक विवाह कार्यालयाच्या बाहेरदेखील लावले आहेत. दरम्यान, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना साधेपणाने विवाह करावे लागत आहे. त्यामुळे नाेंदणी विवाहात वाढ झाली आहे.नाेंदणी विवाहाला पसंतीलॉकडाऊनचे नियम शिथिल केले असले तरी गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विवाहसोहळ्यातील उपस्थितींवर मर्यादा आणण्यात आली. त्यामुळे अनेकांनी थाटात लग्नसोहळे पार पाडण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याला पसंती दिली आणि त्याची संख्या लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे काही नियम लावून ही नाेंदणी सुरू आहे.

टॅग्स :marriageलग्न