शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

साडेसहाशे कोटींचा जलमार्ग कराराच्या मसुद्यात रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 23:50 IST

वाहतूककोंडीतून मुक्ती नाहीच : ११ वाहनतळांचा प्रस्तावही रखडलेलाच

सुरेश लोखंडे।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील वाहतूककोंडी दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहेत. मुंबईचे प्रवेशद्वार असलेले ठाणे शहर चोहोबाजूंनी वाहतूककोंडीत सापडले आहे. यातून मुक्त करण्यासाठी दिवाळीत घोषित झालेल्या ११ वाहनतळांची उपाययोजना रखडलेली आहे. याशिवाय, पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त असा पहिल्या टप्प्यातील ६६१.१४ कोटींचा जलमार्गही विविध विभागांच्या संयुक्त करारात अडकून पडल्याचे वास्तव उघड झाले आहे.

वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहने थांबवून अन्य वाहनांना प्राधान्याने सोडण्यासाठी ११ वाहनतळे उभारण्याची घोषणा महानगरपालिकेने दिवाळीत केली होती. मात्र, या घोषणेचा लाभ ठाणेकरांना झालेला नाही. याशिवाय, ठाणे महापालिकेच्या जलमार्गाचा पहिला टप्पा २०१६ पासून फायलींमध्येच फिरत आहे. ६६१.१४ कोटी रुपये खर्चाच्या या पहिल्या टप्प्यातील जलमार्ग क्र. ५३ ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देऊन संयुक्त करार करण्याचे आदेश २४ एप्रिल २०१८ रोजी जारी केले. मात्र, संयुक्त कराराच्या मसुद्यावर विविध विभागांचे एकमत झाले नसल्याचे वास्तव दिशा समितीच्या अहवालावरून उघड होत आहे.

जलवाहतुकीसाठी ठाण्याला ३२ किलोमीटरचा खाडीकिनारा लाभलेला आहे. म्हणूनच, वसई-ठाणे आणि कल्याण या जलवाहतूक मार्ग क्र. ५३ ला मंजुरी मिळाली आहे. या जलमार्गासाठी ६६१.१४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातून, कोलशेत येथे मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. वसई, मीरा-भार्इंदर, घोडबंदर, नागलाबंदर, काल्हेर, अंजूर दिवे, पारसिक, डोंबिवली (ठाकुर्ली) आणि कल्याण या नऊ ठिकाणच्या खाडीकिनारी जेटी बांधून आवश्यक सुधारणा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मंजूर डीपीआरनुसार जलवाहतुकीच्या पुढील कामासाठी भारतीय आंतरदेशीय जलमार्ग दिल्ली, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौकानयन व जलसंपदा केंद्रीय मंत्रालय आणि ठाणे महानगरपालिका यांच्यातील संयुक्त कराराचा मसुदा केंद्र अद्याप अंतिम झाला नसल्याचे ‘दिशा’च्या अहवालातून उघड झाले आहे.

सल्लागाराकडून जलमार्गांचा अभ्यासजलमार्ग क्र.५३ च्या पहिल्या टप्प्याच्या मंजुरीनंतर दुसऱ्या टप्प्याच्या दोन जलमार्गांवर ६८६ कोटी रुपये खर्चाचे नियोजन आहे. ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते नवी मुंबई हे ते दोन जलमार्ग असून, याबाबत अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराकडून अभ्यास सुरू आहे. ठाणे ते मुंबई या जलवाहतूक मार्गादरम्यान साकेत, कळवा, विटावा, मीठबंदर ऐरोली, वाशी, ट्रॉम्बे, एलिफंटा, फेरीव्हार्फ, गेटवे आॅफ इंडिया या १० ठिकाणी जेटींच्या बांधकामांचे नियोजन आहे. यशिवाय, ठाणे ते नवी मुंबई या जलमार्गासाठी वाशी, नेरूळ, बेलापूर, तळोजा, जुईगाव, पनवेल, जेएनपीटी आणि मोरा या आठ ठिकाणी जेटी बांधून प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्याचे नियोजन आहे. ठाणे पालिकेला प्रथम टप्प्याच्या जलमार्गासाठी केंद्राकडून १०० टक्के अनुदान, तर दुसºया टप्प्यातील दोन जलमार्गांसाठी ५० टक्के अनुदान मिळणार आहे.