शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

साडेसहाशे कोटींचा जलमार्ग कराराच्या मसुद्यात रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 23:50 IST

वाहतूककोंडीतून मुक्ती नाहीच : ११ वाहनतळांचा प्रस्तावही रखडलेलाच

सुरेश लोखंडे।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील वाहतूककोंडी दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहेत. मुंबईचे प्रवेशद्वार असलेले ठाणे शहर चोहोबाजूंनी वाहतूककोंडीत सापडले आहे. यातून मुक्त करण्यासाठी दिवाळीत घोषित झालेल्या ११ वाहनतळांची उपाययोजना रखडलेली आहे. याशिवाय, पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त असा पहिल्या टप्प्यातील ६६१.१४ कोटींचा जलमार्गही विविध विभागांच्या संयुक्त करारात अडकून पडल्याचे वास्तव उघड झाले आहे.

वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहने थांबवून अन्य वाहनांना प्राधान्याने सोडण्यासाठी ११ वाहनतळे उभारण्याची घोषणा महानगरपालिकेने दिवाळीत केली होती. मात्र, या घोषणेचा लाभ ठाणेकरांना झालेला नाही. याशिवाय, ठाणे महापालिकेच्या जलमार्गाचा पहिला टप्पा २०१६ पासून फायलींमध्येच फिरत आहे. ६६१.१४ कोटी रुपये खर्चाच्या या पहिल्या टप्प्यातील जलमार्ग क्र. ५३ ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देऊन संयुक्त करार करण्याचे आदेश २४ एप्रिल २०१८ रोजी जारी केले. मात्र, संयुक्त कराराच्या मसुद्यावर विविध विभागांचे एकमत झाले नसल्याचे वास्तव दिशा समितीच्या अहवालावरून उघड होत आहे.

जलवाहतुकीसाठी ठाण्याला ३२ किलोमीटरचा खाडीकिनारा लाभलेला आहे. म्हणूनच, वसई-ठाणे आणि कल्याण या जलवाहतूक मार्ग क्र. ५३ ला मंजुरी मिळाली आहे. या जलमार्गासाठी ६६१.१४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातून, कोलशेत येथे मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. वसई, मीरा-भार्इंदर, घोडबंदर, नागलाबंदर, काल्हेर, अंजूर दिवे, पारसिक, डोंबिवली (ठाकुर्ली) आणि कल्याण या नऊ ठिकाणच्या खाडीकिनारी जेटी बांधून आवश्यक सुधारणा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मंजूर डीपीआरनुसार जलवाहतुकीच्या पुढील कामासाठी भारतीय आंतरदेशीय जलमार्ग दिल्ली, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौकानयन व जलसंपदा केंद्रीय मंत्रालय आणि ठाणे महानगरपालिका यांच्यातील संयुक्त कराराचा मसुदा केंद्र अद्याप अंतिम झाला नसल्याचे ‘दिशा’च्या अहवालातून उघड झाले आहे.

सल्लागाराकडून जलमार्गांचा अभ्यासजलमार्ग क्र.५३ च्या पहिल्या टप्प्याच्या मंजुरीनंतर दुसऱ्या टप्प्याच्या दोन जलमार्गांवर ६८६ कोटी रुपये खर्चाचे नियोजन आहे. ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते नवी मुंबई हे ते दोन जलमार्ग असून, याबाबत अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराकडून अभ्यास सुरू आहे. ठाणे ते मुंबई या जलवाहतूक मार्गादरम्यान साकेत, कळवा, विटावा, मीठबंदर ऐरोली, वाशी, ट्रॉम्बे, एलिफंटा, फेरीव्हार्फ, गेटवे आॅफ इंडिया या १० ठिकाणी जेटींच्या बांधकामांचे नियोजन आहे. यशिवाय, ठाणे ते नवी मुंबई या जलमार्गासाठी वाशी, नेरूळ, बेलापूर, तळोजा, जुईगाव, पनवेल, जेएनपीटी आणि मोरा या आठ ठिकाणी जेटी बांधून प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्याचे नियोजन आहे. ठाणे पालिकेला प्रथम टप्प्याच्या जलमार्गासाठी केंद्राकडून १०० टक्के अनुदान, तर दुसºया टप्प्यातील दोन जलमार्गांसाठी ५० टक्के अनुदान मिळणार आहे.