शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल आज 5 तास वाहतुकीसाठी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 7:51 AM

मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवारी (19 सप्टेंबर) तपासणीसाठी सकाळी 5 तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नवीन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहन प्रवास टाळावा,  असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मीरारोड/ठाणे, दि. 16- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवारी (19 सप्टेंबर) तपासणीसाठी सकाळी 5 तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नवीन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहन प्रवास टाळावा,  असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी केले आहे. मुंबईला जोडणारा वसई खाडीवरील जुना वरसावे पूल हा गेल्या वर्षी सप्टेंबरपासून गर्डरला तडा गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. 

सकाळी 8 वाजल्यापासून तपासणीसाठी जुना पूल वाहतुकीकरीता बंद ठेवला जाणार आहे.  तपासणीचे काम जवळपास 5 तास चालणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरुन वसई - गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक नवीन पुलावरुन वळवली जाणार आहे. जेणे करुन वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने पोलीस व वाहतूक पोलिसांसह प्राधिकरणदेखील तयारीला लागले आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी मीरा भार्इंदर वाहतूक शाखेचे 18,  पालघर शाखेचे 22 तर महामार्ग वाहतूक शाखेचे 11 असे मिळून ५१ अधिकारी व कर्मचारी येथे तैनात केले जाणार आहेत. शिवाय पालिकेच्या वतीने ट्रॅफिक वॉर्डनसुद्धा दिले जाणार आहेत. 

कुठल्या पद्धतीनं या पुलाची दुरुस्ती करायची यावर मोठा काथ्याकुट झाल्यावर अखेर उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेम (ट्रस )चा आधार देऊन दुरुस्ती करण्यात आली. पूल बंद असल्याच्या काळात नवीन पुलावरुनच दोन्ही बाजूची वाहतुक सुरू होती. परंतु यामुळे काही तास वाहतूक कोंडीत लोकांना घालवावे लागत होते. 9 महिन्यांपासून बंद असलेला हा पूल अखेर मे मध्ये सुरु करण्यात आला.

सध्या जुना पुलावरुन एका मार्गिकेतून लहान तर एका मार्गिकेतून मोठी वाहनं सोडली जात आहेत. तसे असले तरी पुलाची नियमित तपासणी करणे गरजेचे बनले आहे. कारण महाड पूल दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही. शिवाय जुन्या पुलावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. नियमित तपासणीमध्ये पुलाची वजन झेलण्याची क्षमता, तडा गेलेल्या गर्डरची स्थिती दुरुस्ती केलेल्या ट्रसची तपासणी केली जाणार असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले. अशा प्रकारची तपासणी ही दर तीन ते चार महिन्यांनी केली जाणार आहे.

अवजड व मोठी वाहनं भिवंडी - चिंचोटी मार्गे वळवण्यासाठी सांगण्यात आले आहे. दर वीस मिनिटांनी नवीन पुलावरुन एका एका बाजूची वाहनं सोडली जाणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी दिली आहे.