शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पुणधे येथील पुरातन लेणी नामशेष होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 04:14 IST

गड, किल्ले, लेणी या इतिहासाच्या पाऊलखुणा समजल्या जातात. त्याच्यावरून आपल्या समाजाची, संस्कृतीची तसेच चालीरीतींची ओळख होते.

- वसंत पानसरेकिन्हवली  - गड, किल्ले, लेणी या इतिहासाच्या पाऊलखुणा समजल्या जातात. त्याच्यावरून आपल्या समाजाची, संस्कृतीची तसेच चालीरीतींची ओळख होते.शहापूर शहराजवळील आटगाव-पुणधे येथील इतिहासकालीन पांडवलेणी हा असाच एक अनमोल ठेवा असून सध्या मात्र तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पुरातत्त्व विभागाने वेळीच याकडे लक्ष देऊन त्याचा जीर्णोद्धार करण्याची मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे.मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारादरम्यान आटगाव स्थानक आहे. शहापूरपासून केवळ पाच किमी अंतरावरील आटगावपासून अगदी जवळ म्हणजे केवळ दोन किमीच्या अंतरावर पुणधेजवळ एक टेकडी आहे. या टेकडीच्या शिखरावर भग्नावस्थेत ही लेणी आहेत. या लेण्यांमध्ये अनेक रेखीव शिल्पे आहेत. या लेण्यांची उभारणी केव्हा झाली, ती कुणी बांधली, याविषयी कुठेच माहिती उपलब्ध नाही. मात्र, या लेण्यांचा काळ इ.स. ५५० ते ९०० असावा, असा अंदाज आहे.पुणधेपासून अगदी अर्धा किमीच्या अंतरावरील या लेण्यांकडे पुणधे गावातून जाणारी एक पायवाट आहे. काट्याकुट्यांनी वेढलेल्या या रस्त्याने टेकडी चढल्यावर प्रथम आपणास दिसतात, ते प्रवेशद्वाराजवळील दोन स्तंभ. त्यावर आकर्षक कोरीवकाम असून पुरातनकाळातील शिल्पकलेचा आविष्कार दिसतो. मध्यभागी एक मंदिर असून या मंदिराला घडीव दगडांचा पाया असून त्यावर मोठी शिल्पे दिसतात. या लेण्यांना भेट दिल्यावर काही शिल्पशिला इतस्तत: पडलेल्या दिसतात.या लेण्यांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या आस्थेने येतात. मात्र, इथे पिण्यासाठी पाणी नाही, जाण्यासाठी रस्ता नाही की, विश्रांतीगृहही नाही. रस्त्यावरील दगडगोटे तसेच काट्याकुट्यांमधून रस्ता काढत जावे लागते.सध्या पांडवलेण्यांत करवंदांच्या झाडीत सापडलेल्या देवीची स्थापना करण्यात आली असून अधूनमधून या देवीची पूजा केली जाते. नवरात्र तसेच रामनवमीला येथे उत्सव भरतो. लेण्यांतील अलंकारिक वैभव केव्हाच नष्ट झाले आहे. त्यातील सौंदर्य पुन्हा प्रस्थापित करायचा, असेल तर या लेण्यांच्या जीर्णोद्धाराची गरज आहे.या लेण्यांतील शिलांचे आणि स्तंभांवरील शिल्पांचे घारापुरीतील लेण्यांमधील शिल्पांशी साधर्म्य वाटते. इ.स. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुरबाड, वाडा, म्हसा भागांतील शैवपंथीय तसेच ग्रामदेवतेची मंदिरे मोगलांच्या आक्र मणाने उद्ध्वस्त झाली, असे इतिहास सांगतो. पुणधे येथील भग्नावस्थेतील ही लेणीही बहुधा त्याच्या तडाख्यात सापडली असावीत.ऐतिहासिक वारसा असलेल्या आटगाव-पुणधेतील लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. मात्र, या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांची सुविधा नाही. पाणी, रस्ते, विश्रांतीगृह, सुरक्षितता अशा कोणत्याच सुविधा येथे नसल्याने इतिहास अभ्यासक नाराज होतात. येथे मोठ्या प्रमाणात शिल्पे विखुरलेल्या स्थितीत पडून असल्याने ती नामशेष होण्याचा धोका आहे. याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. - राम विशे, इतिहास अभ्यासकवनविभागाकडून याठिकाणी काळजी म्हणून काँक्रि टीकरण करण्यात आले आहे. वनसंवर्धनाप्रमाणेच अशी पुरातन प्राचीन लेणी जोपासली पाहिजे.-सुनील वेखंडे, सचिव, सह्याद्री वनसंवर्धन संस्था

टॅग्स :historyइतिहासthaneठाणे