शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

पुणधे येथील पुरातन लेणी नामशेष होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 04:14 IST

गड, किल्ले, लेणी या इतिहासाच्या पाऊलखुणा समजल्या जातात. त्याच्यावरून आपल्या समाजाची, संस्कृतीची तसेच चालीरीतींची ओळख होते.

- वसंत पानसरेकिन्हवली  - गड, किल्ले, लेणी या इतिहासाच्या पाऊलखुणा समजल्या जातात. त्याच्यावरून आपल्या समाजाची, संस्कृतीची तसेच चालीरीतींची ओळख होते.शहापूर शहराजवळील आटगाव-पुणधे येथील इतिहासकालीन पांडवलेणी हा असाच एक अनमोल ठेवा असून सध्या मात्र तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पुरातत्त्व विभागाने वेळीच याकडे लक्ष देऊन त्याचा जीर्णोद्धार करण्याची मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे.मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारादरम्यान आटगाव स्थानक आहे. शहापूरपासून केवळ पाच किमी अंतरावरील आटगावपासून अगदी जवळ म्हणजे केवळ दोन किमीच्या अंतरावर पुणधेजवळ एक टेकडी आहे. या टेकडीच्या शिखरावर भग्नावस्थेत ही लेणी आहेत. या लेण्यांमध्ये अनेक रेखीव शिल्पे आहेत. या लेण्यांची उभारणी केव्हा झाली, ती कुणी बांधली, याविषयी कुठेच माहिती उपलब्ध नाही. मात्र, या लेण्यांचा काळ इ.स. ५५० ते ९०० असावा, असा अंदाज आहे.पुणधेपासून अगदी अर्धा किमीच्या अंतरावरील या लेण्यांकडे पुणधे गावातून जाणारी एक पायवाट आहे. काट्याकुट्यांनी वेढलेल्या या रस्त्याने टेकडी चढल्यावर प्रथम आपणास दिसतात, ते प्रवेशद्वाराजवळील दोन स्तंभ. त्यावर आकर्षक कोरीवकाम असून पुरातनकाळातील शिल्पकलेचा आविष्कार दिसतो. मध्यभागी एक मंदिर असून या मंदिराला घडीव दगडांचा पाया असून त्यावर मोठी शिल्पे दिसतात. या लेण्यांना भेट दिल्यावर काही शिल्पशिला इतस्तत: पडलेल्या दिसतात.या लेण्यांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या आस्थेने येतात. मात्र, इथे पिण्यासाठी पाणी नाही, जाण्यासाठी रस्ता नाही की, विश्रांतीगृहही नाही. रस्त्यावरील दगडगोटे तसेच काट्याकुट्यांमधून रस्ता काढत जावे लागते.सध्या पांडवलेण्यांत करवंदांच्या झाडीत सापडलेल्या देवीची स्थापना करण्यात आली असून अधूनमधून या देवीची पूजा केली जाते. नवरात्र तसेच रामनवमीला येथे उत्सव भरतो. लेण्यांतील अलंकारिक वैभव केव्हाच नष्ट झाले आहे. त्यातील सौंदर्य पुन्हा प्रस्थापित करायचा, असेल तर या लेण्यांच्या जीर्णोद्धाराची गरज आहे.या लेण्यांतील शिलांचे आणि स्तंभांवरील शिल्पांचे घारापुरीतील लेण्यांमधील शिल्पांशी साधर्म्य वाटते. इ.स. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुरबाड, वाडा, म्हसा भागांतील शैवपंथीय तसेच ग्रामदेवतेची मंदिरे मोगलांच्या आक्र मणाने उद्ध्वस्त झाली, असे इतिहास सांगतो. पुणधे येथील भग्नावस्थेतील ही लेणीही बहुधा त्याच्या तडाख्यात सापडली असावीत.ऐतिहासिक वारसा असलेल्या आटगाव-पुणधेतील लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. मात्र, या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांची सुविधा नाही. पाणी, रस्ते, विश्रांतीगृह, सुरक्षितता अशा कोणत्याच सुविधा येथे नसल्याने इतिहास अभ्यासक नाराज होतात. येथे मोठ्या प्रमाणात शिल्पे विखुरलेल्या स्थितीत पडून असल्याने ती नामशेष होण्याचा धोका आहे. याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. - राम विशे, इतिहास अभ्यासकवनविभागाकडून याठिकाणी काळजी म्हणून काँक्रि टीकरण करण्यात आले आहे. वनसंवर्धनाप्रमाणेच अशी पुरातन प्राचीन लेणी जोपासली पाहिजे.-सुनील वेखंडे, सचिव, सह्याद्री वनसंवर्धन संस्था

टॅग्स :historyइतिहासthaneठाणे