शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक : डॉ. कुसुममाला यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 19:19 IST

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह अंतर्गत ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्दे आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक : डॉ. कुसुममाला जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह अंतर्गत ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने कार्यक्रमजगात प्रत्येक ४० सेकंदाला एक आत्महत्त्या

ठाणे: जगात प्रत्येक ४० सेकंदाला एक आत्महत्त्या होते. महिलांच्या तुलनेत आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक आहे. दरवर्षी भारतात एक लाख पुरूषांमध्ये २५ पुरूष तर एक लाख महिलांमध्ये १६ महिला आत्महत्त्या करतात अशी माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कुसुममाला यांनी दिली. आत्महत्त्या करण्याचा विचार ज्यांच्या मनात येतो अशांनी कुटुंब, नातेवाईक, मित्र मैत्रिणी किंवा एखाद्या मानसोपचारतज्ज्ञांकडे व्यक्त व्हावे असा सल्लाही त्यांनी दिला.              प्रादेशिक मनोरु ग्णालय ठाणे येथे शुक्रवारपासून जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येत असून त्याअंतर्गत टाटा मोटर्स येथे आत्महत्त्या प्रतिबंध या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मानसीक आरोग्याविषयी माहिती देणारे प्रदर्शनही लावण्यात आले होते. दरम्यान, एमफील सायकॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी आत्महत्त्या करु नका असा संदेश देणारे एक नाटीका सादर केली. २० ते ५० वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्त्येची भावना येत असते. पुरूष जास्त व्यक्त होत नसतात म्हणून त्यांची संख्या अधिक असल्याचे सांगताना डॉ. कुसुममाला म्हणाल्या की, पुरूष खूप धोकादायक पद्धतीने आत्महत्त्या करतात. स्वत:ला शुट करणे, लटकणे किंवा ट्रेनखाली येऊन आत्महत्त्या करतात. महिला तितक्या धोकादायक पद्धतीने करत नाही, गोळ््या घेऊन किंवा हात कापून त्या आत्महत्त्या करतात. मानसीक तणाव, नैराश्य, एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असणे, आर्थिक, मानसीक किंवा कुटुंबाचा पाठिंबा नसले तसेच, घरातील सदस्याने किंवा आजूबाजूला कोणी आत्महत्त्या केली असेल तर ते पाहूनही आत्महहत्त्या होत असल्याची कारणे डॉ. कुसुममाला यांनी स्पष्ट केली. अशा व्यक्ती कशा ओळखाव्या यासंदर्भात बोलताना त्यांनी काही संकेत सांगितले. त्या म्हणाल्या, ती व्यक्ती मरणाच्या गोष्टींबद्दल बोलत असेल, इच्छापत्र बनवून घेत असेल, मी मेलो तर बरे होईल, माझ्यासाठी कोण नाही असे बोलत असेल, रागाच्या भरात वाहन चालवत असेल असे अनेक संकेत असतात. अशी व्यक्ती उदासीन, चिंतेत आणि ताणतणावात असते. जगात दहा आत्महत्त्या होत असतील तर त्यातील चार आत्महत्त्या भारतात होतात, भारत हा ताणतणावाचा देश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आत्महत्त्येचा विचार कोणालाही येऊ शकतो, परंतू ज्यांना मानसीक आजार आहे त्यांच्यात ही भावना तीव्र असल्याचे डॉ. कुसुममाला यांनी सांगितले. सामान्यांनी कशा प्रकारे मानसीक रुग्णांशी वागावे याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, मानसीक आजार झालेल्या व्यक्तीला एकटे सोडू नका, त्यांच्यात मिळून मिशलून रहा, त्यांना समजून घ्या असे सांगितले. आत्महत्त्या ही रोखली जाऊ शकते असेही त्या म्हणाल्या. यावेळी टाटा मोटर्सचे सीएसआरचे प्रमुख विनोद कुलकर्णी, मनोविकृतीतज्ज्ञ परिचारक दत्तात्रय कार्डिले, व्यवसाय उपचारतज्ज्ञ रुपा किणकर, समाजसेवा अधिक्षक फरिदा शेख, सुरेखा वाठोरे व इतर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेmental hospitalमनोरूग्णालयWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना