शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक : डॉ. कुसुममाला यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 19:19 IST

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह अंतर्गत ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्दे आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक : डॉ. कुसुममाला जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह अंतर्गत ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने कार्यक्रमजगात प्रत्येक ४० सेकंदाला एक आत्महत्त्या

ठाणे: जगात प्रत्येक ४० सेकंदाला एक आत्महत्त्या होते. महिलांच्या तुलनेत आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक आहे. दरवर्षी भारतात एक लाख पुरूषांमध्ये २५ पुरूष तर एक लाख महिलांमध्ये १६ महिला आत्महत्त्या करतात अशी माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कुसुममाला यांनी दिली. आत्महत्त्या करण्याचा विचार ज्यांच्या मनात येतो अशांनी कुटुंब, नातेवाईक, मित्र मैत्रिणी किंवा एखाद्या मानसोपचारतज्ज्ञांकडे व्यक्त व्हावे असा सल्लाही त्यांनी दिला.              प्रादेशिक मनोरु ग्णालय ठाणे येथे शुक्रवारपासून जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येत असून त्याअंतर्गत टाटा मोटर्स येथे आत्महत्त्या प्रतिबंध या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मानसीक आरोग्याविषयी माहिती देणारे प्रदर्शनही लावण्यात आले होते. दरम्यान, एमफील सायकॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी आत्महत्त्या करु नका असा संदेश देणारे एक नाटीका सादर केली. २० ते ५० वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्त्येची भावना येत असते. पुरूष जास्त व्यक्त होत नसतात म्हणून त्यांची संख्या अधिक असल्याचे सांगताना डॉ. कुसुममाला म्हणाल्या की, पुरूष खूप धोकादायक पद्धतीने आत्महत्त्या करतात. स्वत:ला शुट करणे, लटकणे किंवा ट्रेनखाली येऊन आत्महत्त्या करतात. महिला तितक्या धोकादायक पद्धतीने करत नाही, गोळ््या घेऊन किंवा हात कापून त्या आत्महत्त्या करतात. मानसीक तणाव, नैराश्य, एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असणे, आर्थिक, मानसीक किंवा कुटुंबाचा पाठिंबा नसले तसेच, घरातील सदस्याने किंवा आजूबाजूला कोणी आत्महत्त्या केली असेल तर ते पाहूनही आत्महहत्त्या होत असल्याची कारणे डॉ. कुसुममाला यांनी स्पष्ट केली. अशा व्यक्ती कशा ओळखाव्या यासंदर्भात बोलताना त्यांनी काही संकेत सांगितले. त्या म्हणाल्या, ती व्यक्ती मरणाच्या गोष्टींबद्दल बोलत असेल, इच्छापत्र बनवून घेत असेल, मी मेलो तर बरे होईल, माझ्यासाठी कोण नाही असे बोलत असेल, रागाच्या भरात वाहन चालवत असेल असे अनेक संकेत असतात. अशी व्यक्ती उदासीन, चिंतेत आणि ताणतणावात असते. जगात दहा आत्महत्त्या होत असतील तर त्यातील चार आत्महत्त्या भारतात होतात, भारत हा ताणतणावाचा देश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आत्महत्त्येचा विचार कोणालाही येऊ शकतो, परंतू ज्यांना मानसीक आजार आहे त्यांच्यात ही भावना तीव्र असल्याचे डॉ. कुसुममाला यांनी सांगितले. सामान्यांनी कशा प्रकारे मानसीक रुग्णांशी वागावे याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, मानसीक आजार झालेल्या व्यक्तीला एकटे सोडू नका, त्यांच्यात मिळून मिशलून रहा, त्यांना समजून घ्या असे सांगितले. आत्महत्त्या ही रोखली जाऊ शकते असेही त्या म्हणाल्या. यावेळी टाटा मोटर्सचे सीएसआरचे प्रमुख विनोद कुलकर्णी, मनोविकृतीतज्ज्ञ परिचारक दत्तात्रय कार्डिले, व्यवसाय उपचारतज्ज्ञ रुपा किणकर, समाजसेवा अधिक्षक फरिदा शेख, सुरेखा वाठोरे व इतर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेmental hospitalमनोरूग्णालयWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना