शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील अपघात बळींची संख्या ४८ ने घटली, उपाययोजना ठरल्या प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:45 IST

राज्यातील अपघातांची संख्या वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. त्याचे सकारात्मक परिणाम आकडेवारीतून उघड झाले आहेत.

- पंकज रोडेकरठाणे - राज्यातील अपघातांची संख्या वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. त्याचे सकारात्मक परिणाम आकडेवारीतून उघड झाले आहेत. जिल्हा प्रशासनाला ठाणे जिल्ह्यातील अपघातांसोबतच, त्यामधील बळींची संख्याही गतवर्षीच्या तुलनेत ४८ ने कमी करण्यात यश आले. अपघातांमधील बळींची संख्या घटवण्यात ठाणे जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब असली तरी, दुसरीकडे ब्लॅक स्पॉट्सची अर्थात अपघातप्रवण स्थळांची संख्या दोनने वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.अपघातांची वाढती संख्या लक्षात घेत, सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी संबंधित यंत्रंणांना काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार, मध्यंतरी संबंधित यंत्रणांची दर गुरूवारी नियमीत बैठक घेतली जात होती. लोकसभा निवडणुकीनंतर २ मे रोजी निवासी जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी पुन्हा बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी पावसाळा डोळ्यासमोर ठेवून काही सूचना केल्या. यावेळी जिल्ह्यातील अपघातांची संख्या घटली असून, बळींची संख्याही ४८ ने कमी घटल्याची आकडेवारी मांडण्यात आली. वाहतुकीसंदर्भात आरटीओ, ठाणे शहर वाहतूक शाखा आणि महामार्ग पोलिसांनाही महामार्गांवर सद्यस्थितीत कुठे दुभाजक तोडले आहेत का? तसेच दुभाजक झिजल्याने रस्त्याच्या समांतर आले आहेत का? याबाबत पाहणी करून विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश यावेळी त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे-नवी मुंबईत नवे ब्लॅक स्पॉट्सजिल्ह्णात १०७ ब्लॅक स्पॉट्स होते. त्यामध्ये दोनने वाढ झाल्याने ही संख्या १०९ झाली आहे. हे स्पॉट्स ठाणे शहरातील गायमुख आणि नवीमुंबईतील घनसोली पुलाजवळ असल्याचे सूत्रांनी सांगितले.खर्डीजवळ लवकरचट्रामा सेंटर?नाशिक महामार्गावर होणाºया अपघातांमधील अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी या बैठकीत खर्डीजवळ ट्रामा सेंटर उभारावे आणि त्यासाठी लागणाºया जागेची पाहणी करण्याचे आदेश ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत.राज्यात ठाणे एक नंबरवरअपघातातील बळींची संख्या जानेवारी ते मार्च २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये ४८ ने कमी झाली आहे. एवढ्या प्रमाणात ही संख्या घटवणारा ठाणे जिल्हा राज्यात एक नंबरवर आहे. त्याखालोखाल पुणे ३२, मुंबई २४, औरंगाबाद २३, तर अमरावतीमध्ये बळींची संख्या १३ ने कमी झाली.५० पत्रकारांचेहोणार शिबिरअपघातांबाबत वृत्तसंकलन करणाºया ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथील ५० पत्रकारांचे एक शिबिर लवकरच आयोजिण्यात यावे. यामध्ये त्यांना नेमका अपघात आणि त्याच्या जनजागृतीबाबत मुंबईच्या धर्तीवर धडे द्यावे, असे म्हटले आहे.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे