शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाण्यात जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली...
2
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
3
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
4
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
5
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
6
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
7
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
8
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
11
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
12
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
13
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
14
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
15
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
16
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
17
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
19
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
20
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील अपघात बळींची संख्या ४८ ने घटली, उपाययोजना ठरल्या प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:45 IST

राज्यातील अपघातांची संख्या वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. त्याचे सकारात्मक परिणाम आकडेवारीतून उघड झाले आहेत.

- पंकज रोडेकरठाणे - राज्यातील अपघातांची संख्या वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. त्याचे सकारात्मक परिणाम आकडेवारीतून उघड झाले आहेत. जिल्हा प्रशासनाला ठाणे जिल्ह्यातील अपघातांसोबतच, त्यामधील बळींची संख्याही गतवर्षीच्या तुलनेत ४८ ने कमी करण्यात यश आले. अपघातांमधील बळींची संख्या घटवण्यात ठाणे जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब असली तरी, दुसरीकडे ब्लॅक स्पॉट्सची अर्थात अपघातप्रवण स्थळांची संख्या दोनने वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.अपघातांची वाढती संख्या लक्षात घेत, सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी संबंधित यंत्रंणांना काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार, मध्यंतरी संबंधित यंत्रणांची दर गुरूवारी नियमीत बैठक घेतली जात होती. लोकसभा निवडणुकीनंतर २ मे रोजी निवासी जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी पुन्हा बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी पावसाळा डोळ्यासमोर ठेवून काही सूचना केल्या. यावेळी जिल्ह्यातील अपघातांची संख्या घटली असून, बळींची संख्याही ४८ ने कमी घटल्याची आकडेवारी मांडण्यात आली. वाहतुकीसंदर्भात आरटीओ, ठाणे शहर वाहतूक शाखा आणि महामार्ग पोलिसांनाही महामार्गांवर सद्यस्थितीत कुठे दुभाजक तोडले आहेत का? तसेच दुभाजक झिजल्याने रस्त्याच्या समांतर आले आहेत का? याबाबत पाहणी करून विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश यावेळी त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे-नवी मुंबईत नवे ब्लॅक स्पॉट्सजिल्ह्णात १०७ ब्लॅक स्पॉट्स होते. त्यामध्ये दोनने वाढ झाल्याने ही संख्या १०९ झाली आहे. हे स्पॉट्स ठाणे शहरातील गायमुख आणि नवीमुंबईतील घनसोली पुलाजवळ असल्याचे सूत्रांनी सांगितले.खर्डीजवळ लवकरचट्रामा सेंटर?नाशिक महामार्गावर होणाºया अपघातांमधील अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी या बैठकीत खर्डीजवळ ट्रामा सेंटर उभारावे आणि त्यासाठी लागणाºया जागेची पाहणी करण्याचे आदेश ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत.राज्यात ठाणे एक नंबरवरअपघातातील बळींची संख्या जानेवारी ते मार्च २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये ४८ ने कमी झाली आहे. एवढ्या प्रमाणात ही संख्या घटवणारा ठाणे जिल्हा राज्यात एक नंबरवर आहे. त्याखालोखाल पुणे ३२, मुंबई २४, औरंगाबाद २३, तर अमरावतीमध्ये बळींची संख्या १३ ने कमी झाली.५० पत्रकारांचेहोणार शिबिरअपघातांबाबत वृत्तसंकलन करणाºया ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथील ५० पत्रकारांचे एक शिबिर लवकरच आयोजिण्यात यावे. यामध्ये त्यांना नेमका अपघात आणि त्याच्या जनजागृतीबाबत मुंबईच्या धर्तीवर धडे द्यावे, असे म्हटले आहे.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे