शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

ठाणे जिल्ह्यातील अपघात बळींची संख्या ४८ ने घटली, उपाययोजना ठरल्या प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:45 IST

राज्यातील अपघातांची संख्या वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. त्याचे सकारात्मक परिणाम आकडेवारीतून उघड झाले आहेत.

- पंकज रोडेकरठाणे - राज्यातील अपघातांची संख्या वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. त्याचे सकारात्मक परिणाम आकडेवारीतून उघड झाले आहेत. जिल्हा प्रशासनाला ठाणे जिल्ह्यातील अपघातांसोबतच, त्यामधील बळींची संख्याही गतवर्षीच्या तुलनेत ४८ ने कमी करण्यात यश आले. अपघातांमधील बळींची संख्या घटवण्यात ठाणे जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब असली तरी, दुसरीकडे ब्लॅक स्पॉट्सची अर्थात अपघातप्रवण स्थळांची संख्या दोनने वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.अपघातांची वाढती संख्या लक्षात घेत, सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी संबंधित यंत्रंणांना काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार, मध्यंतरी संबंधित यंत्रणांची दर गुरूवारी नियमीत बैठक घेतली जात होती. लोकसभा निवडणुकीनंतर २ मे रोजी निवासी जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी पुन्हा बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी पावसाळा डोळ्यासमोर ठेवून काही सूचना केल्या. यावेळी जिल्ह्यातील अपघातांची संख्या घटली असून, बळींची संख्याही ४८ ने कमी घटल्याची आकडेवारी मांडण्यात आली. वाहतुकीसंदर्भात आरटीओ, ठाणे शहर वाहतूक शाखा आणि महामार्ग पोलिसांनाही महामार्गांवर सद्यस्थितीत कुठे दुभाजक तोडले आहेत का? तसेच दुभाजक झिजल्याने रस्त्याच्या समांतर आले आहेत का? याबाबत पाहणी करून विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश यावेळी त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे-नवी मुंबईत नवे ब्लॅक स्पॉट्सजिल्ह्णात १०७ ब्लॅक स्पॉट्स होते. त्यामध्ये दोनने वाढ झाल्याने ही संख्या १०९ झाली आहे. हे स्पॉट्स ठाणे शहरातील गायमुख आणि नवीमुंबईतील घनसोली पुलाजवळ असल्याचे सूत्रांनी सांगितले.खर्डीजवळ लवकरचट्रामा सेंटर?नाशिक महामार्गावर होणाºया अपघातांमधील अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी या बैठकीत खर्डीजवळ ट्रामा सेंटर उभारावे आणि त्यासाठी लागणाºया जागेची पाहणी करण्याचे आदेश ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत.राज्यात ठाणे एक नंबरवरअपघातातील बळींची संख्या जानेवारी ते मार्च २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये ४८ ने कमी झाली आहे. एवढ्या प्रमाणात ही संख्या घटवणारा ठाणे जिल्हा राज्यात एक नंबरवर आहे. त्याखालोखाल पुणे ३२, मुंबई २४, औरंगाबाद २३, तर अमरावतीमध्ये बळींची संख्या १३ ने कमी झाली.५० पत्रकारांचेहोणार शिबिरअपघातांबाबत वृत्तसंकलन करणाºया ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथील ५० पत्रकारांचे एक शिबिर लवकरच आयोजिण्यात यावे. यामध्ये त्यांना नेमका अपघात आणि त्याच्या जनजागृतीबाबत मुंबईच्या धर्तीवर धडे द्यावे, असे म्हटले आहे.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे