शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

आता एका क्लिकवर रेशनकार्डची माहिती; चांगली वागणूक न दिल्यास दुकानदाराची करता येणार तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 02:07 IST

जिल्ह्यातील बहुतांशी शिधावाटप दुकानदार शिधा पत्रिकाधारकाला दरमहा वेळेत व नियमित अन्नधान्य, रॉकेल अन्य किरणा सामान कमी, अधिक प्रमाणात वितरित करतात

सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शिधावाटप दुकानांतील अन्नधान्य गोरगरीब, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना वितरित केले जात आहे. या दुकानात सध्या काय माल आला, कार्ड अधिकृत आहे की नाही, या माहितीसह अन्नधान्याचा पुरवठा वेळेत व नियमित न केल्यास, अन्नधान्याचे वाटप न झाल्यास, शिधा पत्रिकाधारकास चांगली वागणूक न दिल्यास संबंधित दुकानाची तक्रार ‘मेरा रेशन’अॅपद्वारे करता येणार असल्याने शिधावाटप दुकानदारांना लाभार्थींना सौजन्यशील वागणूक द्यावी लागणार आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी शिधावाटप दुकानदार शिधा पत्रिकाधारकाला दरमहा वेळेत व नियमित अन्नधान्य, रॉकेल अन्य किरणा सामान कमी, अधिक प्रमाणात वितरित करतात. काहींकडून धान्याचा पुरवठा न झाल्याचे सांगून सेवा देण्याचे टाळतात. मनमानी करणाऱ्या दुकानदारांची तक्रार दखल करण्यासाठी शासनाने अन्य दुकानावर अन्नधान्य घेण्याचा पर्याय (पोर्टेबिलिटी) कार्डधारकास दिला आहे. त्यामुळे मुजोर दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. त्यात ‘मेरा रेशन’ अॅपद्वारे माहिती मिळवण्याची व तक्रार करण्याची सुविधा होत असल्यामुळे शिधावाटप दुकानांवरील वॉच आता अधिक कडक करण्यात येत आहे. दरम्यान, तक्रार करण्यासाठी आता ‘मेरा रेशन’ या

अॅपद्वारे तक्रार करून दुकानदारांस वेठीस धरण्याच्या घटना वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शिधावाटप दुकानातील कार्डसंबंधीच्या माहितीसह अन्नधान्य किती आले, त्यातून किती वाटप झाले, कार्ड अधिकृत आहे की नाही, अन्नधान्य, किराणा माल स्वस्त व माफक दराने वितरित होत आहे की नाही आदींची तक्रार व माहिती शिधापत्रिकाधारकास ‘मेरा रेशन’ या ॲपवर एका क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी या उपयुकत अॅपला शिधापत्रिकाधारकांना डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. यामुळे संबंधित दुकानाची माहिती मिळवण्यासह त्यातील कार्ड किती अधिकृत, किती बनावट, अन्नधान्याचे आतापर्यंत झालेले वाटप, शिल्लक आदींची माहिती या ॲपद्वारे त्वरित मिळवणे शक्य होत आहे. याचा नक्कीच फायदा होत असल्याचे सांगण्यात आले.

शहरी व ग्रामीणमधील ९५ हजार कार्डधारकांचे अन्नधान्य बंद जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कार्डधारकांनी सहा महिन्यांपासून रेशनिंग दुकानांतून त्यांच्या धान्याचा लाभ घेतला नाही. अशा एक लाख नऊ हजार ९०५ कार्डधारकांपैकी ९४ हजार ९०७ कार्डधारकांचा अन्नधान्य पुरवठा आता कायमचा बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे.  या कार्डवरील अन्नधान्याचा लाभ देण्यासाठी कोरोनामुळे नोकरीस मुकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांना कार्ड देऊन त्यांचा अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांत त्यांच्या नावांचा समावेश केला जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे एक लाख ४८ हजार कार्डधारकांपैकी बहुतांशी सधन कुटुंबांकडून स्वस्त धान्य खरेदी केले जात नाही. तर शहरी भागातील प्राधान्य कुटुंब यादीतील सात लाख ४४ हजार ४७७ कार्डधारकांपैकी पाच लाख १६ हजार ७७५ कार्डधारक दरमहा अन्नधान्य खरेदी करत आहेत.