शहरं
Join us  
Trending Stories
1
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
2
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
3
विशेष लेखः भाजप - यश कळसाला, शिस्त तळाला! पक्षाची संस्कृती ढासळली तर...
4
फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...
5
निष्ठेला शिक्षा, सत्तेचा दर्प! इतर पक्षातील इच्छुकांना उमेदवारी द्या, हे कोणत्या सर्वेक्षणातून समोर आले?
6
Numerology: 'या' जन्मतारखांसाठी २०२६ ठरणार 'गोल्डन वर्ष'; पैसा, प्रसिद्धी आणि लक्झरीने भरणार झोळी
7
“मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, ममदानी मुंबईत...”; कुणी केला दावा?
8
ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!
9
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
10
तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम
11
Stock Market Today: कमकुवत सुरुवातीनंतर शेअर बाजारात वाढ, निफ्टीत ३० अंकांची तेजी; FMCG इंडेक्स आजही घसरला
12
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
13
Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!
14
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
15
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
16
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
17
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
18
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
19
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
20
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रदूषण मंडळाची नोटीस, सांडपाणी प्रक्रियेत दिरंगाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 01:54 IST

सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारून त्यात प्रक्रिया केलेले सांडपाणीच खाडी आणि नदीत सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था गंभीर नसल्याने उल्हास आणि वालधुनी नदीचे प्रदूषण सुरूच आहे.

कल्याण - सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारून त्यात प्रक्रिया केलेले सांडपाणीच खाडी आणि नदीत सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था गंभीर नसल्याने उल्हास आणि वालधुनी नदीचे प्रदूषण सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच एका समितीने पाहणी केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी प्रक्रियाप्रकरणी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेसह अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेस नोटीस बजावली आहे. त्यांना या नोटिशीवर सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश मंडळाने दिले आहेत.प्रक्रिया न करताच सांडपाणी उल्हास आणि वालधुनी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. याविरोधात वनशक्ती या पर्यावरण संस्थेने २०१३ मध्ये हरित लवाद आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ न ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणली. उल्हास व वालधुनी नदीच्या प्रदूषणास कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेसह अंबरनाथ व बदलापूर पालिकांना जबाबदार धरत त्यांना लवादाने १०० कोटींचा दंड ठोठावला. राज्य सरकारने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यासाठी निधीही उपलब्ध केला. त्यानंतरही प्रकल्प उभारण्यात आलेले नाहीत. राज्य सरकारने त्यांची डेडलाइन डिसेंबर २०१८ पर्यंत आखून घेतली. त्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिले. मात्र, ही डेडलाइन उलटूनही त्याची पूर्तता झाली नाही. ही बाब वनशक्तीने न्यायालयाच्या निदर्शनास आणली. १० एप्रिलला सुनावणीदरम्यान न्यायालयाने दर पंधरा दिवसांनी प्रकल्पाच्या प्रगतीविषयी पाहणी करून त्याचा एकत्रित अहवाल १७ जुलैच्या सुनावणीदरम्यान सादर करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी यांच्या प्रतिनिधींची एक समिती स्थापन करून या समितीने ३० एप्रिल व १ मे रोजी पाहणी केली असता, सांडपाणी प्रक्रियेच्या कामाची प्रगती असमाधानकारक असल्याचा शेरा मारला. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे.कुठे आणि कसेहोतेय प्रदूषण?कल्याण-डोंबिवली : आठ नाल्यांचे प्रवाह वळवून ते सांडपाणी प्रक्रिया केंद्राशी जोडण्याचे काम झालेले नाही. टिटवाळा-वडवली येथील २३ दशलक्ष लीटर क्षमतेच्या प्रक्रिया केंद्रात केवळ ४.५ दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. अन्य ठिकाणच्या १५ दशलक्ष लीटर क्षमतेच्या केंद्रात ४.५ दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. नांदिवली नाल्यातील सांडपाणी ओसंडून वाहत असून तेथे प्रक्रियाच केली जात नाही. याविषयी आक्षेप नोंदविला गेला आहे.उल्हासनगर : घरगुती सांडपाणी प्रक्रिया न करताच वालधुनी नदीत सोडले जात आहे. ड्रेनेज वाहिन्यांचे नेटवर्क उभारलेले नाही.अंबरनाथ : सहा दशलक्ष लीटर सांडपाणीप्रक्रिया न करता वालधुनी नदीत सोडले जाते. ही नदी उल्हास नदीला जाऊन मिळते. त्यामुळे वालधुनीसह उल्हास नदी प्रदूषित होत आहे.बदलापूर : पनवेलकर कॉम्प्लेक्स इमारतीचे एक दशलक्ष लीटर पाणीप्रक्रिया न करता नाल्यात सोडले जात आहे. हेंद्रेपाडा येथील जवळपास १२ दशलक्ष लीटर घरगुती पाणी नाल्यात सोडले जात आहे. त्याचबरोबर २२ दशलक्ष लीटर सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर प्रक्रियेनंतर सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे मोजमाप करण्यासाठी फ्लो मीटर बसवलेला नाही. त्याचबरोबर या प्रक्रिया केंद्राचे कामकाज आॅनलाइन मॉनिटरिंग केलेले नाही.उल्हास नदीचे पाणी पिण्यायोग्य कसे ?कारखान्यांतील रासायनिक आणि घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते कल्याण खाडी, नदीपात्रात सोडले जात असल्याने उल्हास व वालधुनी नदी प्रदूषित झाली आहे. याबाबत हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणप्रकरणी फटकारले आहे. तसेच समितीने केलेल्या पाहणीतही असमाधानकारक स्थिती दिसून आली.त्यानंतर आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली असतानाच उल्हास नदीवरील मोहने बंधाºयानजीकचे पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल मंडळाने दिला आहे. प्रदूषण मंडळाच्या वतीने नदीच्या पाण्याचे अहवाल आॅनलाइन मॉनिटरिंग केले जातात. त्यानंतर ते मंडळाच्या वेबसाइटवर टाकले जातात.याबाबत सेव्ह उल्हास रिव्हर या प्रकल्पाचे प्रमुख अश्वीन अघोर यांनी सांगितले की, शहरात दूषित पाणीपुरवठा केला जातो अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. इतकेच काय तर उल्हासनगरच्या आयुक्तांच्या ग्लासात दूषित पिवळेशार पाणी आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना फैलावर घेतले. त्यामुळे नदीचे पाणी पिण्यायोग्य असल्याच्या अहवालावर प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणkalyanकल्याणdombivaliडोंबिवली