शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

पावसाची दडी : शहापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 03:58 IST

किन्हवली तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारून उघडीप दिली असून कडक उन्हामुळे जोमाने वाढलेली भातपिके तडकली असून शेतकरी धास्तावला आहे.

किन्हवली - तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारून उघडीप दिली असून कडक उन्हामुळे जोमाने वाढलेली भातपिके तडकली असून शेतकरी धास्तावला आहे. या तडकलेल्या भातशेतीमुळे आता काय करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.तालुक्यात १४ हजार हेक्टर जमिनीवर भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी तरी आपल्या पदरी विनासंकट भातपिके पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, शेतावर अनेक रोग पडले आणि १५ दिवस पावसाने उघडीप दिल्याने माळरानातील भातजमिनी तडकल्या. परिणामी, भातपिके कोमेजली.येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर मात्र भातशेतीच्या उत्पन्नावर मोठी आफत येऊन त्याचे मोठे नुकसान होणार आहे. पावसाअभावी शेतीची अशीच स्थिती राहिली, तर यावेळी भातपिके जळून जाण्याची स्थिती आहे. या परिस्थितीत शेतीला पावसाची आवश्यकता असून आता भाताच्या आत दाणा तयार होत असताना पाण्याची नितांत गरज आहे. सोसायटीचे कर्ज काढून शेतकºयांनी शेती लावली असून विकत बियाणे आणि खते मारून तयार केलेल्या भातशेतीवर पावसाने दडी मारल्याने करप्या, बगळ्या हे रोग पडतात. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.पावसाअभावीभात शेती तडकलीभातसानगर : शहापूर तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जोमाने वाढलेली भात पीके उन्हाने तडकल्याने शेतकरी धास्तावला आहे.या तडकलेल्या भात शेतीमुळे आता काय करायचे असा प्रश्न त्याच्या समोर येवून ठेपला आहे. तालुक्यात १४ हजार हेक्टर जमिनीवर भात पिकांचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी तरी आपल्या पदरी विना संकट भात पीके पडतील अशी आशा असताना गेले काही दिवसापासून शेतावर अनेक रोग पडलेले असतानांच आता गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिल्याने माळरानातील भात जमीनी तडकल्याने भात पीके कोमेजुन जावू लागल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे. जर आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर मात्र त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.आता शेतकºयांचे लक्ष पावसाकडे असून पाऊस कधी पडतो अशी चिंता त्यांना लागली आहे. कारण सध्याच्या परिस्थिति शेतीला पावसाची आवश्यकता आहे.सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांनी भातशेतीची कामे वेळीच केली. चालू वर्षी पीक चांगले येईल, या आशेवर असतानाच पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेला घास शेतकºयांच्या तोंडून निघून जाणार आहे.- मल्हारी चंदे, शेतकरी / शेतकरी मार्गदर्शककिन्हवली परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे व आता भातपीक पोटरीवर आहेत. पावसाने दडी मारल्यावर पिकांचे नुकसान होऊन भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.- दिलीप कापडणीस, कृषी अधिकारी, शहापूर

टॅग्स :Farmerशेतकरीshahapurशहापूर