शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

मीरा-भार्इंदरमध्ये मध्यरात्रीही फटाक्यांचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 3:29 AM

मीरा - भार्इंदरमध्ये दिवाळीचे तीन दिवस मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यंत सर्रास फटाके फोडले गेले. विशेष म्हणजे, पालिकेत भाजपाची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांचे आवाहनसुद्धा फटाक्यांच्या धुरात विरून गेले आहे.

मीरा रोड / भार्इंदर : दिवाळीत रात्री ८ ते १० दरम्यान फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली वेळ तसेच राज्याचे गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  फटाके फोडू नका’, ‘प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा’, असे आवाहन केले असताना मीरा - भार्इंदरमध्ये मात्र, दिवाळीचे तीन दिवस मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यंत सर्रास फटाके फोडले गेले. विशेष म्हणजे, पालिकेत भाजपाची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांचे आवाहनसुद्धा फटाक्यांच्या धुरात विरून गेले आहे.फटाक्यांमुळे आवाज तसेच फटाक्यांच्या धुराचा विविध प्रकारे होणारा त्रास पाहता बहुसंख्य नागरिकांमध्येही फटाके फोडण्यावरूननाराजी आहे. रु ग्ण, लहान मुले, वृद्ध यांना तर फटाके जाचकच ठरले आहेत. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत ८ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्यास अटीशर्तींनुसार मंजुरी दिली आहे. तर दुसरीकडे स्वत: मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांसह शासनाने देखील फटाके फोडू नका असे आवाहन करत प्रदूषणमुक्त दिवाळीचे धोरण अवलंबले आहे.मात्र, मीरा-भार्इंदर महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असूनही महापालिकेने शासनाचे धोरण न राबवता शहरात रस्ते, पालिकेचे उद्यान, मैदान येथे सर्रास फटाके विक्रीच्या परवानग्या दिल्या आहेत. पालिकेने फटाके विक्र ी तसेच फोडण्यासाठी असे उघड प्रोत्साहन दिले असतानाच दुसरीकडे पोलिसांनीसुद्धा फटाके फोडण्यासाठी मोकळे रान दिले. मंगळवारपासून शहरात मध्यरात्री एक ते दीड वाजेपर्यंत सर्रास ध्वनी आणि वायुप्रदूषण करणारे फटाके फोडले जात आहेत. वास्तविक, रात्री १० वाजेपर्यंतच वेळ असताना बिनधास्त फटाके फोडताना दिसत आहेत. लोकांनी पोलिसांना तक्रारी करूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा अनुभव भार्इंदर, काशिमीरा,नया नगर पोलीस ठाण्यांकडून आला. भार्इंदर व नया नगर पोलीस ठाण्याचा तर नंतर फोनच घेतला जात नव्हता.पोलीस महासंचालक व ठाणे ग्रामीणच्या कंट्रोल रूममध्ये तक्रारी करूनसुद्धा पोलिसांकडून कार्यवाहीच झाली नाही. त्यामुळे दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न सुनील भगत व अन्य नागरिकांना पडला आहे.आम्ही फटाक्यांच्या पूर्णपणेविरोधातच आहोत. कारणआवाज व धुराचा ज्येष्ठ, रु ग्ण, लहानमुलं यांना खूपच त्रास होतो. मुख्यमंत्रीयांनी फटाके न फोडण्याच्या केलेल्याआवाहनानुसार शहरात भाजपासुद्धाजनजागृती करेल. पोलीस आणिपालिका प्रशासनाची जबाबदारी आहेचपण त्याचबरोबर सुशिक्षित आणिजागरूक नागरिकांनीसुद्धा फटाकेफोडणे टाळले पाहिजे. सर्वोच्चन्यायालयाने दिलेल्या वेळेचे पालनकेले पाहिजे.- हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, भाजपासर्वोच्च न्यायालयानेदिलेले आदेश आणिमुख्यमंत्र्यांनी केलेले आवाहन याचेपालन सर्वांनीच केले पाहिजे. कारणलोकांचे आरोग्य व पर्यावरणसंरक्षणासाठी हे गरजेचे आहे .पोलीस आणि पालिकेची जबाबदारीआहे. यात वाद किंवा मतभेदअसण्याचे कारण नाही. आजदिल्लीची जी घातक स्थिती झालीआहे त्याचा आपण आतापासूनचगांभीर्याने विचार केला पाहिजे.- सुरेश खंडेलवाल,विधि व नियोजन समिती सभापतीमीरा-भार्इंदरमध्ये फटाकेविक्रे त्यांवर गुन्हा दाखलकरण्याची कार्यवाही सुरू आहे .फटाके फोडण्याची ठिकाणे व्यापकअसली तरी पोलीस आलेल्यातक्रारीनुसार घटनास्थळी गेले असताफटाके वाजवणारे पळून जात वापोलिसांची गाडी लांबूनच पाहून तेफटाके फोडणे बंद करत. पोलीसठाण्यांनी फोन का घेतले नाहीतयाची चौकशी सुरू आहे.- युवराज कलकुटगे,पोलीस उपनिरीक्षक व जनसंपर्कअधिकारी, ठाणे ग्रामीण

टॅग्स :thaneठाणेfire crackerफटाके