शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शासनाकडून पैसा सुटेना, शाळांत मोफत प्रवेश मिळेना; गरिबांनी शिकायचे कोठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 18:30 IST

२० हजार ८२५ ऑनलाइन प्रवेश अर्ज

- सुरेश लोखंडे 

ठाणे : ‘शिक्षणाचा हक्क’(आरटीई) या कायद्याखाली उच्च व उत्तम दर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळांत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांसाठी २५ टक्के शालेय प्रवेश आरक्षित ठेवले जात आहे. या जागेवर पात्र मुला-मुलींना शालेय प्रवेश मोफत दिला जात आहे. त्यांचे शैक्षणिक शुल्क शासन भरणार आहे. तब्बल सहा वर्षांपासून या मुलांचे शैक्षणिक शुल्क शासनाने दिले नाही. जिल्ह्यातील  कल्याण, अंबरनाथमधील काही शाळांनी यंदा या बालकांचे प्रवेश नाकारले आहेत. 

जिल्हाभरातील पालकांनी त्यांच्या बालकांच्या शालेय प्रवेशासाठी २० हजार ८२५ अर्ज ऑनलाइन केले आहेत. त्यापैकी १३ हजार ११ अर्ज परिपूर्ण असल्यामुळे त्यांची नोंद झाली आहे.  गरिबांच्या मुलांनी शिकायचे कोठे, शासन शुल्क भरत नसल्यामुळे मुलांना शाळेत मोफत प्रवेश मिळत नसल्याची खंत जिल्ह्यातील पालकांनी व्यक्त केली आहे. गरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने खासगी शाळेत २५ टक्के प्रवेश राखीव असतात. मात्र, शासन याेजना राबवून त्याचे पैसेच वेळेवर देत नसल्याचे कारण पुढे करून शाळा प्रवेश नाकारत असल्यामुळे आम्ही जायचे कुठे, असा सवाल पालक उपस्थित करत आहेत. 

२५ कोटींची झाली थकबाकी, शैक्षणिक शुल्क कधी मिळणार ? 

आरटीईच्या २५ टक्के आरक्षणातून जिल्ह्यातील शाळा सहा वर्षांपासून पात्र बालकांना पहिली व पूर्व प्राथमिकच्या वर्गात प्रवेश देत आहेत. या मोफत शालेय प्रवेश मिळालेल्या  प्रत्येक बालकाचे शैक्षणिक शुल्क म्हणून शासनाकडून प्रतिविद्यार्थी १७ हजार ६७० रुपये दिले जातात. पण या बालकांचे शैक्षणिक शुल्क मिळालेले नसल्याने तब्बल २५ कोटींचे शैक्षणिक शुल्क थकीत असल्याचा अंदाज शिक्षण विभागाने दिला आहे. 

६४८ शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश

यंदाच्या  शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महापालिकांत ६४८ शाळा पात्र आहेत. इयत्ता पहिलीसाठी ११ हजार ४६९ व  पूर्व प्राथमिकसाठी ७९८ जागांवर बालकांना शालेय प्रवेश दिले जाणार आहे. पण शुल्क मिळत नसल्याचे कारण पुढे करून आता काही शाळांनी या बालकांचे मोफत प्रवेश करणे टाळले आहे. 

शैक्षणिक शुल्काचे  १२ कोटींचे लवकरच होणार वाटप

मोफत शालेय प्रवेश दिलेल्या शाळांचे शैक्षणिक शुल्क सहा वर्षांपासून रखडले आहेत. अंदाजे २५ कोटी शैक्षणिक शुल्क रखडलेले आहे.  आता २०१७-१८ व २०१९-२० या दोन वर्षांचे शैक्षणिक शुल्काची १२ कोटींची रक्कम शिक्षण विभागाला आली आहे. तिचे वाटप लवकरच केले जाणार आहे. उर्वरित १५ कोटींची रक्कम शासनाकडून आल्यानंतर वाटप होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. -  शिक्षण विभाग, जि.प. ठाणे 

किती तोटा सहन करायचा ! 

शाळा सुरू झाल्यापासून या शालेय प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क आतापर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे थकीत रक्कम मिळेपर्यंत आम्ही हे मोफत शालेय प्रवेश थांबवले आहेत. याशिवाय आर्थिक स्थिती उत्तम असतानाही काही पालक बनावट कागदपत्रांद्वारे या मोफत शालेय प्रवेशाचा लाभ घेत असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळेही आम्ही आता हे प्रवेश थांबवले आहेत. शैक्षणिक शुल्काची पूर्ण रक्कम मिळाल्यानंतर आम्ही विचार करू. - वीरेंद्र पाटील, मुख्याध्यापक, सर्वोदय विद्यालय, कल्याण 

टॅग्स :SchoolशाळाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाStudentविद्यार्थी