शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, पालकमंत्री एकनाथ शिंदेचे तातडीने अहवाल देण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 10:09 IST

सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचण्यात आला असता, यावर्षी एकही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

भिवंडी :  परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भातपिकांची गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील कांदळी गावात पाहणी करत शेतकरी यांच्याशी संवाद साधला. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तातडीने पंचनामे करून सरकारकडे तातडीने अहवाल पाठवण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकारी यांना दिले.सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचण्यात आला असता, यावर्षी एकही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यावर्षी तालुक्यात १६ हजार हेक्टरवर भातशेतीची लागवड करण्यात आली होती. मात्र, परतीच्या पावसाने सुमारे आठ हजारांहून अधिक भातशेतीचे नुकसान झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात ४५ टक्के नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून येत्या चार ते पाच दिवसांत उर्वरित सर्व पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, राज्याच्या हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, प्रांताधिकारी मोहन नळदकर, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, तहसीलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे व कृषी अधिकारी उपस्थित होते.

मुरबाड तालुक्यातही पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिदवाडी येथील भातशेतीची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा कृषी अधिकारी अंकुश माने, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावार्थे, रेखा कंटे तसेच कृषी विभागाचे अधिकारी सोबत होते.अवकाळी पावसाने मुरबाड तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शिदगाव येथील चिमा शिद यांच्या शेताची पाहणी केली. यावेळी संपूर्ण पीक वाया गेल्याने शिद यांना अश्रू अनावर झाले. त्यांचे पाणावलेले डोळे पाहून पालकमंत्री यांनी धीर देत सरकारकडून योग्य ती मदत मिळेल, असे आश्वासन दिले. तशा सूचना जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांना दिल्या. शिद यांच्या पाच एकरमधील सगळा भात कुजला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी