शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आईवडिलांना पाहुणचार न केल्याने नवविवाहितेची ठाण्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 9:12 PM

अगदी क्षुल्लक कारणावरुन एका नवविवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या ज्ञानेश्वरनगरमध्ये रविवारी घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस तपास करीत आहेत.

ठळक मुद्देजेवणासाठी विचारपूस न केल्याचा राग रुग्णलयात दाखल केल्यानंतर काही तासातच झाला मृत्युकुटूंबीयांमध्ये हळहळ

ठाणे : औरंगाबाद येथून ठाण्यात लेकीकडे आलेल्या सासू सास-यांना जावयाने पाहुणचारासाठी आग्रह न धरल्याच्या रागातून रविना बाबासाहेब राऊत (२२) या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ज्ञानेश्वरनगर येथे रविवारी घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्ञानेश्वरनगरातील पंचपरमेश्वर चाळीत रविना आणि बाबासाहेब हे दाम्पत्य वास्तव्याला आहे. अवघ्या वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला आहे. त्यांच्यात २ मे रोजी क्षुल्लक कारणावरून आधीच वाद झाला होता. नेमकी त्याचवेळी औरंगाबाद येथून रविनाचे आईवडिल तिला भेटण्यासाठी आले. त्यावेळी जावई त्यांच्याशी फारसे काही बोलले नाही. शिवाय, त्यांना जेवण किंवा राहण्यासाठीही त्यांनी काहीच आग्रह धरला नाही. त्यामुळे ते ३ मे रोजी पुन्हा आपल्या गावी निघून गेले. यातून पुन्हा या दाम्पत्यामध्ये पुन्हा ४ आणि ५ मे रोजी वाद झाला. याच वादातून तिने उंदीर मारण्यासाठी आणलेले विष शनिवारी रात्री प्राशन केले. आपण विष घेतल्याचे तिने पतीला न सांगता रात्री केवळ अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. त्यावर दवाखान्यात जाण्यासही तिने नकार दिला. दुसºया दिवशी ६ मे रोजी पुन्हा त्रास झाल्यानंतर सकाळीच ९ वाजण्याच्या सुमारास ते स्थानिक खासगी रुग्णालयात गेले. त्यावेळी मात्र तिने असे विष घेतल्याचे डॉक्टरांना सागितले. तिला तातडीने नौपाड्यातील ‘निपुण’ या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांनाच ६ मे रोजी रात्री ८.५० वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. घरात सासू सास-यांना राहण्यासाठी आग्रह न केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता, अशी माहिती चौकशीत समोर आल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकार वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेला असल्याने याप्रकरणी सोमवारी (७ मे रोजी ) वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाSuicideआत्महत्या