शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागरीकांच्या माथी नवीन घनकचरा शुल्क; उत्पन वाढीसह पायाभूत सेवेतील आर्थिक तूट भरुन काढण्याचा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 17:15 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेकडुन दरवर्षी सादर केला जाणाऱ्या अंदाजपत्रकात सतत वाढणारा आर्थिक तूटीचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी यंदा पालिकेकडुन नवीन घनकचरा शुल्क नागरीकांच्या माथी मारले जाणार आहे.

राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेकडुन दरवर्षी सादर केला जाणाय््राा अंदाजपत्रकात सतत वाढणारा आर्थिक तूटीचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी यंदा पालिकेकडुन नवीन घनकचरा शुल्क नागरीकांच्या माथी मारले जाणार आहे. तत्पुर्वी त्याला स्थायी व महासभेची मान्यता आवश्यक ठरणार असल्याने त्याचा प्रस्ताव आजच्या स्थायी समिती बैठकीत सादर केला जाणार आहे.पालिका नागरीकांना दिवाबत्तीसह साफसफाई आदी पायाभूत सुविधा मोफत पुरवित असल्याने त्यातून कोणतेही उत्पन्न पालिकेला मिळत नाही. शहराची वाढत्या लोकवस्ती व लोकसंख्येमुळे त्याच्या खर्चात देखील सतत वाढ होत आहे.

यामुळे अंदाजपत्रकातील तूटीचा आकडा दरवर्षी सुमारे १०० कोटींनी वाढू लागला आहे. पालिकेचे मुळ उत्पन्न सरकारी अनुदानासह सुमारे ७५० कोटींचे असले तरी अंदाजपत्रक मात्र सुमारे दिड हजार कोटींचे आहे. मुळ उत्पन्नातील मालमत्ता कराची वसुली एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत सुमारे ५० टक्यांपर्यंत पोहोचली असुन फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत पालिकेला उर्वरीत ५० टक्के कर वसुल करावा लागणार आहे. त्यासाठी सक्तीच्या वसुलीचे आदेश देण्यात आले असले तरी त्याची कार्यवाही धीम्या गतीने सुरु आहे. अशा ढिसाळ प्रशासकीय कारभारामुळे यंदा तर पालिकेला राखीव निधीतून विकासकामे पार पाडावी लागत आहे. हिच परिस्थिती पुढे कायम राहिल्यास पालिका लवकरच आर्थिक दिवाळखोरीत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हि परिस्थिती ओढवू नये, यासाठी लेखा विभागाकडून दरवर्षीच्या अंदाजपत्रकात उत्पन्न वाढीच्या सुचना दिल्या जातात.

मात्र त्याला नेहमीप्रमाणे सत्ताधाय््राांकडुन केराची टोपली दाखविली जात असल्याने पालिकेच्या अंदाजपत्रकीय तूटीत भर पडू लागली आहे. त्याला थोपविण्यासाठी यंदा नवीन रस्ता कराचा बोजा नागरीकांवर टाकण्याचे प्रस्तावित असुन मालमत्ता करात वाढ करण्यात येणार आहे. मात्र सत्ताधारी पुढील वर्षीच्या निवडणुका डोळ्यासमोर त्या प्रस्तावांना सतत बगल देऊन वेळ मारुन नेत आहे. चौथ्यांदा त्याचा फेरप्रस्ताव आजच्या स्थायी सभेत सादर केला जाणार असुन नवीन घनकचरा शुल्क देखील नागरीकांच्या माथी मारले जाणार आहे. शहरात दररोज जमा होणाय््राा कचय््राात सतत वाढ होत असल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांची संख्या वाढविणे पालिकेला आवश्यक बनले आहे.

साफसफाईसाठी कामगारांना देण्यात येणारे वेतन, ओला व सुका कचरा वाहुन नेण्यासाठी वाहने व त्यावरील प्रक्रीयेचा खर्च आदींवर पालिकेला सुमारे १२८ कोटींचा खर्च दरवर्षी सोसावा लागत आहे. तो भरून काढण्यासाठी पालिकेकडुन कोणतेही शुल्क वसुल केले जात नसले तरी यंदा पालिकेने घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील तरतुदीनुसार नागरीकांकडुन घनकचरा शुल्क वसुल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मान्यतेसाठी आजच्या स्थायी समिती बैठकीत सादर केला जाणार आहे. त्याला मान्यता दिल्यास त्यासह नवीन १० टक्के रस्ता कर व मालमत्तेच्या प्रती चौरस फुटामागे सुमारे १ ते दिड रुपये कराचा बोजा नागरीकांच्या माथी मारला जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याला विरोधकांकडुन जोरदार विरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पालिका हद्दीत एकुण ३ लाख ३३ हजार ४४८ मालमत्तांची नोंद असुन त्यात २ लाख ७३ हजार ८०९ निवासी व ५९ हजार ६३९ व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. सफाईसाठी पालिकेकडुन होणारा सुमारे १२८ कोटींचा खर्च वसुल करण्यासाठी निवासी मालमत्ता धारकांकडुन १९५ रुपये प्रती महिन्याप्रमाणे वर्षाला २ हजार ३३७ रुपये व व्यावसायिक मालमत्ताधारकांकडुन ८९४ रुपये प्रती महिन्याप्रमाणे वर्षाला १० हजार ७३१ रुपये घनकचरा शुल्क वसुल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर