शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

नेपाळमधील विटी - दांडूच्या जागतीक स्पर्धेत आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थीनींना दोन सुवर्ण पदक

By सुरेश लोखंडे | Updated: January 4, 2019 15:22 IST

काठमांडू येथे जागतिक टिक टॉक (विटी-दांडू ) स्पर्धा १ ते २ जानेवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, जर्मनी, अफगाणिस्तान, कोरिया या आठ देशांतील विटी - दांडू खेळाडूंनी सहभाग घेतला. भारतीय संघाकडून खेळणाºया पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी पाच विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनींनी या दोन्ही संघांनी पुरूष व महिला गटातील दोन सुवर्ण पदके पटकवून जागतीक नावलौकीक प्राप्त केला, असे या कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयाचे प्रशिक्षक विवेक कुवरा यांनी लोकमतला सांगितले.

ठळक मुद्देकाठमांडू येथे जागतिक टिक टॉक (विटी-दांडू ) स्पर्धा १ ते २ जानेवारी दरम्यान पार पडली भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, जर्मनी, अफगाणिस्तान, कोरिया या आठ देशांतील विटी - दांडू खेळाडूंनी सहभाग घेतला कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी पाच विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनींनी या दोन्ही संघांनी पुरूष व महिला गटातील दोन सुवर्ण पदके

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कुबेराची संपत्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी कुटुंबातीलखेळाडू होतकरून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य होणे अपेक्षित आहे. पण त्यापासून वंचित असूनही खेळाडू वृत्ती जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी कंपनीत काम करीत पैसे मिळवलेले. त्यातून नेपाळच्या कांटमांडू येथील स्पर्धेतेचे शुल्क भरणा-या पालघर जिल्ह्यातील या आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थीनींनी जागतीक विटी दांडू (टिक टॉक) स्पर्धेत दोन्ही गटात दोन सुवर्ण पदक पटकून जागतीक नावलौकीक मिळवला आहे.काठमांडू येथे जागतिक टिक टॉक (विटी-दांडू ) स्पर्धा १ ते २ जानेवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, जर्मनी, अफगाणिस्तान, कोरिया या आठ देशांतील विटी - दांडू खेळाडूंनी सहभाग घेतला. भारतीय संघाकडून खेळणा-या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी पाच विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनींनी या दोन्ही संघांनी पुरूष व महिला गटातील दोन सुवर्ण पदके पटकवून जागतीक नावलौकीक प्राप्त केला, असे या कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयाचे प्रशिक्षक विवेक कुवरा यांनी लोकमतला सांगितले.या विजेत्या पुरु ष संघाने जर्मनीला अंतिम सामन्यात पराभूत करून सुवर्ण पदक पटकावले. तर महिलांनी नेपाळच्या संघाला पराभूत करून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. ग्रामीण इंडियाच्या भारतीय संघाकडून खेळणाºया पुरूष गटातील या पाच विजेत्यांमध्ये उपकर्णधार मेहुल नांगरे (डहाणू), चिनेश महाले (तलासरी), अतुल महाले(तलासरी), नित्यानंद तुंबडा (वाडा) आणि अजय नाट्या (तलासरी) यांचा समावेश आहे. तर महिला संघतील विजेत्यांमध्ये कीर्ती भरसट (विक्र मगड), कुसुम चौधरी (डहाणू) या विद्यार्थीनींचा समावेश आहे. या आदिवासी स्पर्धकांना प्रशिक्षक डहाणू येथील विवेक कुवरा विजय गुहे यांचे सखोल मार्गदर्शन लाभले. पालघर जिल्हा विटी दांडू असोसिएशनकडून या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून त्यांचे स्वागताची तयारी देखील सुरू झाल्याचे आदिवासी कार्यकर्ते गुरूनाथ सहारे यांनी सांगितले. पालघर जिल्हा आदिवासी समाजाकडून हार्दिक अभिनंदनविजेत्या खेडूंप्रमाणेच वाडा तालुक्यातील इंदगाव येथील नित्यानंद तुंबडा याचे वडील दगावलेले आहे. आई शेत मजुरी करीत आहे. तर तो स्वत: कंपनीत काम करून पदवीचे शिक्षण घेत आहे. तरी देखील त्यांनी स्पर्धेसाठी सुमारे १७ हजार रूपयांचा खर्च स्वकष्ठाने प्राप्त केला आहे. त्याच्या प्रमाणेच सर्वच खेळाडू विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. आता जर्मनीमध्ये या टिक टॉक स्पर्धेचे सामने होणार आहेत. त्यासाठी या विद्यार्थ्यांना जावे लागणार आहे. या प्रमाणे जागतीक पातळी विटी - दांडूचे सामने रंगल्यानंतर हा खेळ आॅलंम्पीकच्या खेळांमध्ये समाविष्ठ होईल आणि शाळांमध्ये देखील तो खेळला जाणारअसल्याचे कुवरा यांनी सांगितले. या स्पर्धांसाठी एका विद्यार्थ्यास सुमारे १७ हजार पेक्षा जास्त खर्च आहे. हा खर्च जाणकार धर्मदाय संस्थांसह आदिवासी विकास विभागाकडून करण्याची अपेक्षा सहारे यांच्यासह प्रशिक्षक कुवरा यांनी व्यक्त केली. त्यासाठी ते येथील अपर आयुक्त कार्यालयाच्या आदिवासी विकास विभागास साकडे घालण्याच्या तयारीत आहे. 

टॅग्स :thaneठाणेpalgharपालघरStudentविद्यार्थी