शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भिवंडीतील कामवारी नदीच्या प्रदूषणाकडे यंत्रणांचे दुर्लक्ष; प्लास्टिक कचरा, केमिकलमुळे नदीची बनली गटार

By नितीन पंडित | Updated: January 25, 2024 16:04 IST

या नदीच्या स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासन,प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक ग्राम पंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.

भिवंडी: शहरालागत असलेल्या कामवारी नदीच्याप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे.प्रतिबंधित प्लास्टिक कचरा व डाइंग सायजिंगचे दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने या नदीची सध्या गटार गंगा झाली आहे.या नदीच्या स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासन,प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक ग्राम पंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.

        कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून भिवंडी शहर सर्वत्र परिचित आहे.यंत्रमाग व्यवसायाबरोबरच कापडावर रंग प्रक्रिया करणाऱ्या डाइंग व सायजिंग देखील भिवंडीत मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत.शहरात व शहरालगत असलेल्या शेलार, मिठपाडा परिसरात देखील मोठ्या प्रमाणात डाइंग सायजिंग थाटण्यात आल्या आहेत.या डाइंग सायजिंग मधून निघणारे केमिकल मिश्रित दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट कामवारी नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे.

           या नदीपात्रात दोन्ही बाजू कडील केमिकल युक्त पाणी थांबविण्याची गरज असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही कारवाई करीत नसल्याने कामवारी नदीची सध्या पुरता गटारगंगा झाली असून आता ही नदी मरणासन्न अवस्थेत आलेली आहे.दुर्दैव म्हणजे याची जबाबदारी सांभाळणारी यंत्रणा,सरकार अथवा स्थानिक महापालिका प्रशासन हे सर्वच याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करीत असल्याची खंत खुद्द राष्ट्रीय जलपुरुष मॅगसेस पुरस्कार विजेते डॉ राजेंद्र सिंग यांनी या नदीच्या पाहणी दौऱ्या प्रसंगी व्यक्त केली होती.

           गुरुवारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत चला जाणूया नदीला या उपक्रमाबाबत मनपा मुख्यालयात मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला मनपा अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,जलनायिका डॉ.स्नेहल दोंदे, ठाणे मायनर इरिगेशनचे अधिकारी,वनपरिक्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण कल्याण विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी शहरालगत वाहणारी कामवारी नदी प्रदूषण मुक्त करून प्रवाहित करण्याचे काम जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे, जिल्हा नियोजन समितीमध्ये याकरिता निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे, लवकरच कामवारी नदी प्रदूषण मुक्त करून नदी पूर्व प्रवाहित करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीriverनदीpollutionप्रदूषण