शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

गणेशपुरी ग्रामपंचायतीजवळील कातकरीपाड्यांमध्ये तीव्र टंचाई, बंधाऱ्यात मुबलक पाणी असूनही घशाला कोरड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 1:37 AM

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या उसगाव बंधारा, उसगाव कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या पाच आदिवासी कातकरीपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

अनगाव - भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या उसगाव बंधारा, उसगाव कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या पाच आदिवासी कातकरीपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उसगाव येथील बंधाºयात मुबलक पाणीसाठा आहे. येथील पाणी नालासोपारा, विरार तसेच उसगावला दिले जाते. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या कातकरीवाडीसह या टंचाईग्रस्त पाड्यांना पाणी मिळत नाही.गणेशपुरी ग्रामपंचायत क्षेत्रातील कवाडपाडा येथे बोअरवेल आहे. पाण्याची टाकीही बसवण्यात आली आहे. भिवंडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या पाड्यांमध्ये नागरी सुविधांची वानवा आहे. विशेष म्हणजे गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या ठिकाणी भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. अशा नित्यानंद महाराज यांच्या पावनभूमीत आजही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, ही धक्कादायक बाब आहे.गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली या तीर्थक्षेत्रांना सरकारने पर्यटनाचा दर्जा दिला आहे. मात्र, येथील नागरी समस्या सोडवल्या नाहीत. त्यामुळे पर्यटनक्षेत्र हे कागदोपत्री आहे. त्यामुळे येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणीटंचाई कधीच माहीत नसते. पाणीटंचाईसंबंधी लेखी निवेदन श्रमजीवी संघटनेच्या वतीने दिलेले आहे. त्यामध्ये टंचाईग्रस्त गावपाड्यांची नावे समाविष्ट आहेत. सहा महिने उलटून गेल्यावरही त्यावर पाणीपुरवठा विभागाने का उपाययोजना केल्या नाहीत, असा प्रश्न संघटनेचे कार्यकर्ते जयेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.गणेशपुरी गावाजवळ असणाºया पाड्यांत टंचाई जाणवत असल्याने तालुका व जिल्हा प्रशासन काय करते आहे, की पाण्यासाठी एखादा जीव गमावल्यावर ते येथील टंचाई दूर करणार, असा सवाल संजय कामडी यांनी केला आहे.या पाड्यांवर बोअरवेल आहेत. त्यांना पाणी येत नसल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. येथील पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कवाडपाडा येथे बोअरवेल आहे, मात्र पाणी नाही. पाण्याची टाकी आहे, ती कोरडी आहे. उसगाव येथील कातकरीवाडीत बोअरवेलला पाणी नाही, अशी परिस्थिती आहे.पाणीटंचाईबाबत ग्रामसेवकाकडून माहिती मागवली आहे. अशी माहिती विस्तार अधिकारी इंद्रजित काळे यांनी दिली. दरम्यान, मागीलवर्षीही भिवंडी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई होती. मात्र अधिकारी ते मान्य करत नव्हते. ‘लोकमत’ने जेव्हा हा प्रकार उघड केला तेव्हा अधिकाºयांची धावपळ झाली. लोकप्रतिनिधी यांनी दखल घेत अधिकाºयांना धारेवर धरले. ‘लोकमत’मधील वृत्तानंतर अनेक पाणी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न झाले.समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरूया पाड्यात पाणीटंचाई आहे, हे खरे आहे. ती दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विभागाला माहिती दिलेली आहे. समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- विनोद पाटील, उपसरपंच, गणेशपुरी 

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे