शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

राष्ट्रवादीचे 'चलो पनवेल', पीडब्ल्यूडी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 15:24 IST

मुंब्र्याची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्र्याच्या नजीक बाय पास रस्ता तयार केला आहे. मात्र हा रस्ता निर्माण करताना येथील रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता बांधला आहे.

मुंब्रा - मुंब्र्याची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्र्याच्या नजीक बाय पास रस्ता तयार केला आहे. मात्र हा रस्ता निर्माण करताना येथील रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता बांधला आहे. आजवर या रत्यावर शेकडो मुंब्रावासियांना जीव गमवावा लागला आहे. आजही या रस्त्याच्या परिसरात राहणारे हजारो रहिवाशी जीव मुठीत घेऊन रात्र जागून काढीत आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीचा बायपास रस्ता नसून खुनी बायपास रस्ता बनला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या विरोधात पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागावर हल्ला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्रा ते पनवेल असा हा संतप्त मुंब्रावासियांचा मोर्चा असणार आहे. त्यामध्ये लाखो मुंब्रावासीय सहभागी होणार आहेत. 

मुंब्र्याच्या जवळून डोंगराच्या कडेने गेलेला मुंब्रा बायपास या नावाने ओळखला जाणारा रस्ता आता खुनी रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मुंब्र्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन जीवितहानी आटोक्यात यावी यासाठी या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून रस्त्याच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी धोक्याचा बनला आहे. येथून होणाऱ्या जड वाहतुकीचा फटका नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. रस्त्यावर बेसुमार खड्डे पडल्याने गाड्या चालविणाऱ्यांना मोठे कसब करून रस्ता पार करावा लागत आहे. अनेक दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. आजवर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा मुब्रा विधानसभा अध्यक्ष आणि युवा नगरसेवक अशरफ शानू पठाण यांच्या पुढाकाराने आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलने केले. मात्र तरीही या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. आता पक्षाने पुन्हा हे खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक विभागाला ८ ऑक्टोबरपर्यंतचा वेळ देत इशारा दिला आहे. ८ ऑक्टोंबर पर्यंत हे खड्डे बुजविण्यात आले नाहीत तर ९ ऑक्टोंबर रोजी पनवेल येथील हल्ला बोल मोर्चा काढण्यात येणार आहे. 

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने काढण्यात येणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान, युवा अध्यक्ष अशरफ शानु पठाणने माजी वेतन किमान आयोग के अध्यक्ष तथा  राज्यमंत्री सैय्यद अली अशरफ़, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, नईम खान, नगरसेवक सिराज डोंगरे, राजन किणे, मेराज खान, जफर नोमानी, मेरेशवर किणे,बाबाजी पाटील, नगरसेविका आशरीन राऊत, अनिता किणे,हफीजा नाईक, हसीना अजीज शेख,साजिया परविन अंसारी, सुलोचना हिरा पाटील, नादीरा यासीन सुरमे, सुनिता सातपुते, रूपाली गोटे, फरजाना शाकिर शेख, जमीला नासीर खान, मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष ब्बलु शेमना, कौसा ब्लॉक अध्यक्ष जावेद शेख मेडीकल, शिळ ब्लॉक अध्यक्ष मेहफूज शेख मामा, युवा अध्यक्ष कौसा ब्लॉक अध्यक्ष मैहसर शेख, कौसा कार्यध्यक्ष साकीब दाते, विदय़ार्थी सेल ठाणे शहऱ अध्यक्ष शाहरूख सैय्यद, मुंब्रा कळवा विदय़ार्थी सेल अध्यक्ष इम्रान हकीम, मुंब्रा कौसा अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष सादिक शेख, ठाणे जिल्हा अध्यक्ष दिव्यांग विभाग मोहम्मद यूसुफ खान तथा पैरंट बाडी महिला कौसा ब्लॉक अध्यक्षा रिनी रिजवी, युवा महीला सेल, वियार्थी सेल, अल्पसंख्यांक विभाग, दिव्यांग विभागाचे पदाधिकारी आणि  कार्यकर्ते व  मुंब्रा शहर जागरूक रहिवाशी या मोर्चात सहभागी होणार आहेत. 

दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी हा मोर्चा निघणार असून त्यामध्ये सर्व मुंब्रावासीय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी यांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन शमीम खान,  अशरफ़ शानु पठाण यांनी केले आहे. हा हल्लाबोल मोर्चा कौसा दोस्त अपार्टमेंट स्थित पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयापासून जाणार असून मोर्चाकरिता बसची व्यवस्था केली आहे.