शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे 'चलो पनवेल', पीडब्ल्यूडी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 15:24 IST

मुंब्र्याची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्र्याच्या नजीक बाय पास रस्ता तयार केला आहे. मात्र हा रस्ता निर्माण करताना येथील रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता बांधला आहे.

मुंब्रा - मुंब्र्याची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्र्याच्या नजीक बाय पास रस्ता तयार केला आहे. मात्र हा रस्ता निर्माण करताना येथील रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता बांधला आहे. आजवर या रत्यावर शेकडो मुंब्रावासियांना जीव गमवावा लागला आहे. आजही या रस्त्याच्या परिसरात राहणारे हजारो रहिवाशी जीव मुठीत घेऊन रात्र जागून काढीत आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीचा बायपास रस्ता नसून खुनी बायपास रस्ता बनला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या विरोधात पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागावर हल्ला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्रा ते पनवेल असा हा संतप्त मुंब्रावासियांचा मोर्चा असणार आहे. त्यामध्ये लाखो मुंब्रावासीय सहभागी होणार आहेत. 

मुंब्र्याच्या जवळून डोंगराच्या कडेने गेलेला मुंब्रा बायपास या नावाने ओळखला जाणारा रस्ता आता खुनी रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मुंब्र्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन जीवितहानी आटोक्यात यावी यासाठी या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून रस्त्याच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी धोक्याचा बनला आहे. येथून होणाऱ्या जड वाहतुकीचा फटका नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. रस्त्यावर बेसुमार खड्डे पडल्याने गाड्या चालविणाऱ्यांना मोठे कसब करून रस्ता पार करावा लागत आहे. अनेक दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. आजवर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा मुब्रा विधानसभा अध्यक्ष आणि युवा नगरसेवक अशरफ शानू पठाण यांच्या पुढाकाराने आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलने केले. मात्र तरीही या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. आता पक्षाने पुन्हा हे खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक विभागाला ८ ऑक्टोबरपर्यंतचा वेळ देत इशारा दिला आहे. ८ ऑक्टोंबर पर्यंत हे खड्डे बुजविण्यात आले नाहीत तर ९ ऑक्टोंबर रोजी पनवेल येथील हल्ला बोल मोर्चा काढण्यात येणार आहे. 

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने काढण्यात येणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान, युवा अध्यक्ष अशरफ शानु पठाणने माजी वेतन किमान आयोग के अध्यक्ष तथा  राज्यमंत्री सैय्यद अली अशरफ़, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, नईम खान, नगरसेवक सिराज डोंगरे, राजन किणे, मेराज खान, जफर नोमानी, मेरेशवर किणे,बाबाजी पाटील, नगरसेविका आशरीन राऊत, अनिता किणे,हफीजा नाईक, हसीना अजीज शेख,साजिया परविन अंसारी, सुलोचना हिरा पाटील, नादीरा यासीन सुरमे, सुनिता सातपुते, रूपाली गोटे, फरजाना शाकिर शेख, जमीला नासीर खान, मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष ब्बलु शेमना, कौसा ब्लॉक अध्यक्ष जावेद शेख मेडीकल, शिळ ब्लॉक अध्यक्ष मेहफूज शेख मामा, युवा अध्यक्ष कौसा ब्लॉक अध्यक्ष मैहसर शेख, कौसा कार्यध्यक्ष साकीब दाते, विदय़ार्थी सेल ठाणे शहऱ अध्यक्ष शाहरूख सैय्यद, मुंब्रा कळवा विदय़ार्थी सेल अध्यक्ष इम्रान हकीम, मुंब्रा कौसा अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष सादिक शेख, ठाणे जिल्हा अध्यक्ष दिव्यांग विभाग मोहम्मद यूसुफ खान तथा पैरंट बाडी महिला कौसा ब्लॉक अध्यक्षा रिनी रिजवी, युवा महीला सेल, वियार्थी सेल, अल्पसंख्यांक विभाग, दिव्यांग विभागाचे पदाधिकारी आणि  कार्यकर्ते व  मुंब्रा शहर जागरूक रहिवाशी या मोर्चात सहभागी होणार आहेत. 

दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी हा मोर्चा निघणार असून त्यामध्ये सर्व मुंब्रावासीय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी यांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन शमीम खान,  अशरफ़ शानु पठाण यांनी केले आहे. हा हल्लाबोल मोर्चा कौसा दोस्त अपार्टमेंट स्थित पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयापासून जाणार असून मोर्चाकरिता बसची व्यवस्था केली आहे.