शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

राष्ट्रवादीचे 'चलो पनवेल', पीडब्ल्यूडी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 15:24 IST

मुंब्र्याची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्र्याच्या नजीक बाय पास रस्ता तयार केला आहे. मात्र हा रस्ता निर्माण करताना येथील रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता बांधला आहे.

मुंब्रा - मुंब्र्याची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्र्याच्या नजीक बाय पास रस्ता तयार केला आहे. मात्र हा रस्ता निर्माण करताना येथील रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता बांधला आहे. आजवर या रत्यावर शेकडो मुंब्रावासियांना जीव गमवावा लागला आहे. आजही या रस्त्याच्या परिसरात राहणारे हजारो रहिवाशी जीव मुठीत घेऊन रात्र जागून काढीत आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीचा बायपास रस्ता नसून खुनी बायपास रस्ता बनला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या विरोधात पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागावर हल्ला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्रा ते पनवेल असा हा संतप्त मुंब्रावासियांचा मोर्चा असणार आहे. त्यामध्ये लाखो मुंब्रावासीय सहभागी होणार आहेत. 

मुंब्र्याच्या जवळून डोंगराच्या कडेने गेलेला मुंब्रा बायपास या नावाने ओळखला जाणारा रस्ता आता खुनी रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मुंब्र्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन जीवितहानी आटोक्यात यावी यासाठी या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून रस्त्याच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी धोक्याचा बनला आहे. येथून होणाऱ्या जड वाहतुकीचा फटका नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. रस्त्यावर बेसुमार खड्डे पडल्याने गाड्या चालविणाऱ्यांना मोठे कसब करून रस्ता पार करावा लागत आहे. अनेक दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. आजवर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा मुब्रा विधानसभा अध्यक्ष आणि युवा नगरसेवक अशरफ शानू पठाण यांच्या पुढाकाराने आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलने केले. मात्र तरीही या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. आता पक्षाने पुन्हा हे खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक विभागाला ८ ऑक्टोबरपर्यंतचा वेळ देत इशारा दिला आहे. ८ ऑक्टोंबर पर्यंत हे खड्डे बुजविण्यात आले नाहीत तर ९ ऑक्टोंबर रोजी पनवेल येथील हल्ला बोल मोर्चा काढण्यात येणार आहे. 

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने काढण्यात येणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान, युवा अध्यक्ष अशरफ शानु पठाणने माजी वेतन किमान आयोग के अध्यक्ष तथा  राज्यमंत्री सैय्यद अली अशरफ़, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, नईम खान, नगरसेवक सिराज डोंगरे, राजन किणे, मेराज खान, जफर नोमानी, मेरेशवर किणे,बाबाजी पाटील, नगरसेविका आशरीन राऊत, अनिता किणे,हफीजा नाईक, हसीना अजीज शेख,साजिया परविन अंसारी, सुलोचना हिरा पाटील, नादीरा यासीन सुरमे, सुनिता सातपुते, रूपाली गोटे, फरजाना शाकिर शेख, जमीला नासीर खान, मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष ब्बलु शेमना, कौसा ब्लॉक अध्यक्ष जावेद शेख मेडीकल, शिळ ब्लॉक अध्यक्ष मेहफूज शेख मामा, युवा अध्यक्ष कौसा ब्लॉक अध्यक्ष मैहसर शेख, कौसा कार्यध्यक्ष साकीब दाते, विदय़ार्थी सेल ठाणे शहऱ अध्यक्ष शाहरूख सैय्यद, मुंब्रा कळवा विदय़ार्थी सेल अध्यक्ष इम्रान हकीम, मुंब्रा कौसा अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष सादिक शेख, ठाणे जिल्हा अध्यक्ष दिव्यांग विभाग मोहम्मद यूसुफ खान तथा पैरंट बाडी महिला कौसा ब्लॉक अध्यक्षा रिनी रिजवी, युवा महीला सेल, वियार्थी सेल, अल्पसंख्यांक विभाग, दिव्यांग विभागाचे पदाधिकारी आणि  कार्यकर्ते व  मुंब्रा शहर जागरूक रहिवाशी या मोर्चात सहभागी होणार आहेत. 

दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी हा मोर्चा निघणार असून त्यामध्ये सर्व मुंब्रावासीय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी यांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन शमीम खान,  अशरफ़ शानु पठाण यांनी केले आहे. हा हल्लाबोल मोर्चा कौसा दोस्त अपार्टमेंट स्थित पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयापासून जाणार असून मोर्चाकरिता बसची व्यवस्था केली आहे.