शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ठाणे तलावांचे नव्हे खड्ड्यांचे शहर, राष्ट्रवादी काँग्रेसने काढले ठामपाचे वाभाडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 13:54 IST

खड्ड्यांची समस्या कायम असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हरिनिवास येथे " ठाणे तलावांचे नव्हे तर खड्ड्यांचे शहर" असे फलक लावले आहेत

ठाणे - ठाणे शहराला खड्ड्यांनी वेढले आहे. नवनव्या प्रयोगाद्वारे खड्डे बुजवण्याची घोषणा जात आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. मात्र खड्ड्यांची समस्या कायम असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हरिनिवास येथे " ठाणे तलावांचे नव्हे तर खड्ड्यांचे शहर" असे फलक लावले आहेत. दरम्यान, ठाणे शहरात प्रवेश करणारे टोलनाके आम्हीच आंदोलन केल्याने बंद झाले आहेत, आता या खड्ड्यात शहर बुडत असल्याने बोट सेवा सुरू करायची का? असा सवाल आ. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. 

ठाणे शहरात सध्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डेमुक्त शहरासाठी कधी अमेरिकन तर कधी अन्य तंत्रज्ञान वापरण्याची घोषणा पालकमंत्री तर ठामपा प्रशासन करीत आहे. पण शहरातील खड्ड्यांचे विघ्न दूर होत नाही. या खड्ड्यांमागे मोठे अर्थकारण असल्यानेच सत्ताधारी शिवसेना आणि  ठाणे महानगर पालिकेच्या प्रशासनाला खड्डे प्रिय असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हे फलक लावण्यात आले आहेत. 

या संदर्भात शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, ठाणे शहर कधीकाळी तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. आता हे शहर खड्ड्यांचे शहर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाण्याची शक्यता अधिक आहे.  येथील सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासन यांना शहराच्या या मुख्य समस्येशी काही देणे घेणे नाही.  गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाही पालकमंत्री आणि पालिका प्रशासनाकडून  केवळ विविध तंत्रज्ञान वापरण्याची घोषणा केली जात आहे.  आता आम्ही हे सहन करणार नाही. जर दहा दिवसात खड्डेमुक्त ठाणे न दिसल्यास आम्ही उग्र आंदो लन छेडू असा इशाराही दिला. तर, खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडे अनेकदा मागणी करूनही निगरगट्ट झालेले हे प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना खड्ड्यात स्वतःची आर्थिक उन्नती शोधत आहेत. त्यामुळेच ठाणेकरांचा प्रवास खड्ड्यात होत आहे, अशी टीका ठामपाचे विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड