शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

ठाणे तलावांचे नव्हे खड्ड्यांचे शहर, राष्ट्रवादी काँग्रेसने काढले ठामपाचे वाभाडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 13:54 IST

खड्ड्यांची समस्या कायम असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हरिनिवास येथे " ठाणे तलावांचे नव्हे तर खड्ड्यांचे शहर" असे फलक लावले आहेत

ठाणे - ठाणे शहराला खड्ड्यांनी वेढले आहे. नवनव्या प्रयोगाद्वारे खड्डे बुजवण्याची घोषणा जात आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. मात्र खड्ड्यांची समस्या कायम असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हरिनिवास येथे " ठाणे तलावांचे नव्हे तर खड्ड्यांचे शहर" असे फलक लावले आहेत. दरम्यान, ठाणे शहरात प्रवेश करणारे टोलनाके आम्हीच आंदोलन केल्याने बंद झाले आहेत, आता या खड्ड्यात शहर बुडत असल्याने बोट सेवा सुरू करायची का? असा सवाल आ. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. 

ठाणे शहरात सध्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डेमुक्त शहरासाठी कधी अमेरिकन तर कधी अन्य तंत्रज्ञान वापरण्याची घोषणा पालकमंत्री तर ठामपा प्रशासन करीत आहे. पण शहरातील खड्ड्यांचे विघ्न दूर होत नाही. या खड्ड्यांमागे मोठे अर्थकारण असल्यानेच सत्ताधारी शिवसेना आणि  ठाणे महानगर पालिकेच्या प्रशासनाला खड्डे प्रिय असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हे फलक लावण्यात आले आहेत. 

या संदर्भात शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, ठाणे शहर कधीकाळी तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. आता हे शहर खड्ड्यांचे शहर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाण्याची शक्यता अधिक आहे.  येथील सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासन यांना शहराच्या या मुख्य समस्येशी काही देणे घेणे नाही.  गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाही पालकमंत्री आणि पालिका प्रशासनाकडून  केवळ विविध तंत्रज्ञान वापरण्याची घोषणा केली जात आहे.  आता आम्ही हे सहन करणार नाही. जर दहा दिवसात खड्डेमुक्त ठाणे न दिसल्यास आम्ही उग्र आंदो लन छेडू असा इशाराही दिला. तर, खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडे अनेकदा मागणी करूनही निगरगट्ट झालेले हे प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना खड्ड्यात स्वतःची आर्थिक उन्नती शोधत आहेत. त्यामुळेच ठाणेकरांचा प्रवास खड्ड्यात होत आहे, अशी टीका ठामपाचे विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड