शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

राष्ट्रवादी-शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात , भाजपाने कंबर कसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:29 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्टÑवादी मात्र, अजून संभ्रमात असून शिवसेनेसोबत जायचे की नाही, याचा त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही.

मुरबाड :जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्टÑवादी मात्र, अजून संभ्रमात असून शिवसेनेसोबत जायचे की नाही, याचा त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. दुसरीकडे बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली तरी बेहत्तर; परंतु, आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत हात मिळवणी करून सेवा सोसायट्यांच्या जोरावर निर्विवाद सत्ता स्थापन केली. त्यावेळीच राष्ट्रवादीचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र आणि टीडीसीचे संचालक सुभाष पवार हे शिवसेनेच्या नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले. ते पक्षांतर करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. पण तसे न घडल्याने राष्ट्रवादी सध्या तटस्थ आहे. राष्ट्रवादी १२५ ग्रामपंचायतींवर दावा करत असली; तरी त्यांना एकही ग्रामपंचायत पदरात पाडून घेता आली नाही. तरीही शिवसेनेसोबत जात त्यांनी बाजार समितीवर सत्ता आणली.या निवडणुकीत शिवसेनेने कोणत्या समविचारी पक्षासोबत युती करावी, की स्वबळावर लढावे, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल आणि त्यानुसार कार्यकर्ते आपली जबाबदारी पार पाडतील.- कांतीलाल कंट,तालुकाप्रमुख, मुरबाडआगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाला शह देण्यासाठी मी प्रयत्न करेन. शिवसेनेत प्रवेश न करता राष्ट्रवादीत राहूनच शिवसेना, काँग्रेस या समविचारी पक्षांसोबत युती करु न आम्ही लढणार आहोत.- सुभाष पवार, टीडीसी संचालक व राष्ट्रवादी चे कार्यकर्ते.महापोली गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्यअनगाव : भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या महापोली गट आणि महापोली, अनगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस, मनसे, कुणबी सेना यांच्यासोबत आघाडी असल्याने भाजपाचे लक्ष या गटाकडे लागले आहे. पूर्वीचा गणेशपुरी गट व आता नव्याने महापोली गट निर्माण झाला आहे. या गटात शिवसेना- भाजपाची युती असतानाही राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. या निवडणुकीत भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी जाहीर केले. खासदार कपिल पाटील यांनी येथे भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. या गटात चौदा हजार मतदार आहेत. महापोलीत ३२०० मतदार आहेत तर अनगावमध्ये दोन हजार मतदार आहे. तेथे आघाडीचे प्राबल्य जरी असले तरी त्याला सुरूंग लावण्यात खासदारांना यश आले.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी