शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

राष्ट्रवादी-शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात , भाजपाने कंबर कसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:29 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्टÑवादी मात्र, अजून संभ्रमात असून शिवसेनेसोबत जायचे की नाही, याचा त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही.

मुरबाड :जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्टÑवादी मात्र, अजून संभ्रमात असून शिवसेनेसोबत जायचे की नाही, याचा त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. दुसरीकडे बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली तरी बेहत्तर; परंतु, आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत हात मिळवणी करून सेवा सोसायट्यांच्या जोरावर निर्विवाद सत्ता स्थापन केली. त्यावेळीच राष्ट्रवादीचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र आणि टीडीसीचे संचालक सुभाष पवार हे शिवसेनेच्या नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले. ते पक्षांतर करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. पण तसे न घडल्याने राष्ट्रवादी सध्या तटस्थ आहे. राष्ट्रवादी १२५ ग्रामपंचायतींवर दावा करत असली; तरी त्यांना एकही ग्रामपंचायत पदरात पाडून घेता आली नाही. तरीही शिवसेनेसोबत जात त्यांनी बाजार समितीवर सत्ता आणली.या निवडणुकीत शिवसेनेने कोणत्या समविचारी पक्षासोबत युती करावी, की स्वबळावर लढावे, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल आणि त्यानुसार कार्यकर्ते आपली जबाबदारी पार पाडतील.- कांतीलाल कंट,तालुकाप्रमुख, मुरबाडआगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाला शह देण्यासाठी मी प्रयत्न करेन. शिवसेनेत प्रवेश न करता राष्ट्रवादीत राहूनच शिवसेना, काँग्रेस या समविचारी पक्षांसोबत युती करु न आम्ही लढणार आहोत.- सुभाष पवार, टीडीसी संचालक व राष्ट्रवादी चे कार्यकर्ते.महापोली गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्यअनगाव : भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या महापोली गट आणि महापोली, अनगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस, मनसे, कुणबी सेना यांच्यासोबत आघाडी असल्याने भाजपाचे लक्ष या गटाकडे लागले आहे. पूर्वीचा गणेशपुरी गट व आता नव्याने महापोली गट निर्माण झाला आहे. या गटात शिवसेना- भाजपाची युती असतानाही राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. या निवडणुकीत भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी जाहीर केले. खासदार कपिल पाटील यांनी येथे भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. या गटात चौदा हजार मतदार आहेत. महापोलीत ३२०० मतदार आहेत तर अनगावमध्ये दोन हजार मतदार आहे. तेथे आघाडीचे प्राबल्य जरी असले तरी त्याला सुरूंग लावण्यात खासदारांना यश आले.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी