शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निवडणूक निधीत भ्रष्टाचार झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पक्षाकडे तक्रार 

By धीरज परब | Updated: December 25, 2024 11:42 IST

कार्यकर्ता व पक्ष पदाधिकारी यांच्यासाठी दिल्या गेलेल्या मानधनात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा विषय त्या पत्राच्या दिला गेला आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्ष निधीच्या वाटपात भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेश नेतृत्वा कडे केली आहे.  

मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या ८ ते १० जणांचे सह्या केलेले पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे , उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव , ठाणे - पालघर समन्वयक आनंद परांजपे यांच्या नावाने दिलेले आहे . ठाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मीरा भाईंदर व ओवळा माजिवडा मतदार संघच्या निवडणूक प्रचार -  प्रसार साठी कार्यकर्ता व पक्ष पदाधिकारी यांच्यासाठी दिल्या गेलेल्या मानधनात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा विषय त्या पत्राच्या दिला गेला आहे . 

ठाणे लोकसभा आणि मीरा भाईंदर मधील दोन्ही विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाचे कोणतेही पद नसताना प्रमोद कांबळे यांना दिले गेली होती . परंतु कांबळे यांनी निवडणुकीची दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार न पाडता कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी अभद्र व्यावहार करणे , तानशाही करणे , पैशाच्या रूपात कार्यकर्त्यांना मानधन न देणे अश्या अयोग्य गोष्टी निवडणुकी दरम्यान कांबळे यांनी केल्या आहेत . 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचार व प्रसार साठी मिळालेल्या धनराशीचे वाटप कांबळे यांनी फक्त जवळच्या काही कार्यकर्ते व पदाधिकारी यांनाच केले . उर्वरित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना त्यांचे मानधन मिळू दिले नाही . तसेच योग्य ठिकाणी त्या धनराशीचा विनियोग देखील केला नाही . हा भ्रष्टाचार असून जुन्या निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यां मध्ये झालेल्या प्रकारा बाबत तीव्र नाराजी आहे . त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रमोद कांबळे यांना प्रचार व प्रसार साठी दिलेल्या धनराशीची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी विनंती पत्रात पदाधिकाऱ्यांनी केली आहे .   

लोकमतच्या हाती सादर पत्र लागले असून त्यावर सही केलेल्या एका पदाधिकाऱ्याशी तसेच अन्य एका प्रदेश पदाधिकाऱ्याशी देखील बोलून त्याची खात्री केली . पक्षाचा विषय असल्याने आमचे नाव - पद तसेच प्रतिक्रिया देऊ नका असे देखील त्यांनी सांगितले . 

प्रमोद कांबळे  - काही जणांनी केलेल्या त्या तक्रारीत अजिबात तथ्य नाही . त्यातही जे प्रचारात नव्हते तर काही जण दोन चार दिवस प्रचारात होते त्यांनी तक्रार केली आहे . मला पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद मला मिळू नये म्हणून हे कारस्थान रचले गेले आहे . ह्या सर्व कारस्थानाची कल्पना आपण आपल्या नेतृत्वास दिली आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारsunil tatkareसुनील तटकरे