शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

निवडणूक निधीत भ्रष्टाचार झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पक्षाकडे तक्रार 

By धीरज परब | Updated: December 25, 2024 11:42 IST

कार्यकर्ता व पक्ष पदाधिकारी यांच्यासाठी दिल्या गेलेल्या मानधनात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा विषय त्या पत्राच्या दिला गेला आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्ष निधीच्या वाटपात भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेश नेतृत्वा कडे केली आहे.  

मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या ८ ते १० जणांचे सह्या केलेले पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे , उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव , ठाणे - पालघर समन्वयक आनंद परांजपे यांच्या नावाने दिलेले आहे . ठाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मीरा भाईंदर व ओवळा माजिवडा मतदार संघच्या निवडणूक प्रचार -  प्रसार साठी कार्यकर्ता व पक्ष पदाधिकारी यांच्यासाठी दिल्या गेलेल्या मानधनात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा विषय त्या पत्राच्या दिला गेला आहे . 

ठाणे लोकसभा आणि मीरा भाईंदर मधील दोन्ही विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाचे कोणतेही पद नसताना प्रमोद कांबळे यांना दिले गेली होती . परंतु कांबळे यांनी निवडणुकीची दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार न पाडता कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी अभद्र व्यावहार करणे , तानशाही करणे , पैशाच्या रूपात कार्यकर्त्यांना मानधन न देणे अश्या अयोग्य गोष्टी निवडणुकी दरम्यान कांबळे यांनी केल्या आहेत . 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचार व प्रसार साठी मिळालेल्या धनराशीचे वाटप कांबळे यांनी फक्त जवळच्या काही कार्यकर्ते व पदाधिकारी यांनाच केले . उर्वरित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना त्यांचे मानधन मिळू दिले नाही . तसेच योग्य ठिकाणी त्या धनराशीचा विनियोग देखील केला नाही . हा भ्रष्टाचार असून जुन्या निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यां मध्ये झालेल्या प्रकारा बाबत तीव्र नाराजी आहे . त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रमोद कांबळे यांना प्रचार व प्रसार साठी दिलेल्या धनराशीची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी विनंती पत्रात पदाधिकाऱ्यांनी केली आहे .   

लोकमतच्या हाती सादर पत्र लागले असून त्यावर सही केलेल्या एका पदाधिकाऱ्याशी तसेच अन्य एका प्रदेश पदाधिकाऱ्याशी देखील बोलून त्याची खात्री केली . पक्षाचा विषय असल्याने आमचे नाव - पद तसेच प्रतिक्रिया देऊ नका असे देखील त्यांनी सांगितले . 

प्रमोद कांबळे  - काही जणांनी केलेल्या त्या तक्रारीत अजिबात तथ्य नाही . त्यातही जे प्रचारात नव्हते तर काही जण दोन चार दिवस प्रचारात होते त्यांनी तक्रार केली आहे . मला पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद मला मिळू नये म्हणून हे कारस्थान रचले गेले आहे . ह्या सर्व कारस्थानाची कल्पना आपण आपल्या नेतृत्वास दिली आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारsunil tatkareसुनील तटकरे