शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

निवडणूक निधीत भ्रष्टाचार झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पक्षाकडे तक्रार 

By धीरज परब | Updated: December 25, 2024 11:42 IST

कार्यकर्ता व पक्ष पदाधिकारी यांच्यासाठी दिल्या गेलेल्या मानधनात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा विषय त्या पत्राच्या दिला गेला आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्ष निधीच्या वाटपात भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेश नेतृत्वा कडे केली आहे.  

मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या ८ ते १० जणांचे सह्या केलेले पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे , उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव , ठाणे - पालघर समन्वयक आनंद परांजपे यांच्या नावाने दिलेले आहे . ठाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मीरा भाईंदर व ओवळा माजिवडा मतदार संघच्या निवडणूक प्रचार -  प्रसार साठी कार्यकर्ता व पक्ष पदाधिकारी यांच्यासाठी दिल्या गेलेल्या मानधनात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा विषय त्या पत्राच्या दिला गेला आहे . 

ठाणे लोकसभा आणि मीरा भाईंदर मधील दोन्ही विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाचे कोणतेही पद नसताना प्रमोद कांबळे यांना दिले गेली होती . परंतु कांबळे यांनी निवडणुकीची दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार न पाडता कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी अभद्र व्यावहार करणे , तानशाही करणे , पैशाच्या रूपात कार्यकर्त्यांना मानधन न देणे अश्या अयोग्य गोष्टी निवडणुकी दरम्यान कांबळे यांनी केल्या आहेत . 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचार व प्रसार साठी मिळालेल्या धनराशीचे वाटप कांबळे यांनी फक्त जवळच्या काही कार्यकर्ते व पदाधिकारी यांनाच केले . उर्वरित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना त्यांचे मानधन मिळू दिले नाही . तसेच योग्य ठिकाणी त्या धनराशीचा विनियोग देखील केला नाही . हा भ्रष्टाचार असून जुन्या निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यां मध्ये झालेल्या प्रकारा बाबत तीव्र नाराजी आहे . त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रमोद कांबळे यांना प्रचार व प्रसार साठी दिलेल्या धनराशीची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी विनंती पत्रात पदाधिकाऱ्यांनी केली आहे .   

लोकमतच्या हाती सादर पत्र लागले असून त्यावर सही केलेल्या एका पदाधिकाऱ्याशी तसेच अन्य एका प्रदेश पदाधिकाऱ्याशी देखील बोलून त्याची खात्री केली . पक्षाचा विषय असल्याने आमचे नाव - पद तसेच प्रतिक्रिया देऊ नका असे देखील त्यांनी सांगितले . 

प्रमोद कांबळे  - काही जणांनी केलेल्या त्या तक्रारीत अजिबात तथ्य नाही . त्यातही जे प्रचारात नव्हते तर काही जण दोन चार दिवस प्रचारात होते त्यांनी तक्रार केली आहे . मला पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद मला मिळू नये म्हणून हे कारस्थान रचले गेले आहे . ह्या सर्व कारस्थानाची कल्पना आपण आपल्या नेतृत्वास दिली आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारsunil tatkareसुनील तटकरे