शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काही मंडळींकडून महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचा होतोय प्रयत्न : जितेंद्र आव्हाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 09:58 IST

पालिका, जि.प. निवडणुकीत सेनेसोबत आघाडीची तयारी.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे ९९ टक्के आघाडी करून लढतील, असा विश्वास व्यक्त करतानाच दोन्ही पक्षांतील काही विघ्नसंतोषी मंडळी महाविकास आघाडीच्या दुधात मिठाचा खडा टाकत असल्याचा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. आव्हाड यांनी नवी मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेवर टीका करताना स्थानिक नेतृत्वावर टीका केली होती. त्यामुळे आव्हाड यांनी नामोल्लेख केला नसल्याने त्यांचा रोख कुणाकडे याबाबत तर्कवितर्क सुरू झाले.राष्ट्रवादी काँग्रेसचा वैचारिक शत्रू भाजप असल्याने त्या पक्षाला पराभूत करण्यासाठी आपल्याला दोन पावले मागे यावे लागले तरी चालेल. परंतु आघाडी करावीच लागेल, असे सांगून आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना तडजोडीला तयार राहण्यास सांगितले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी ठाण्यात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ या कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आव्हाड बोलत होते. आव्हाड म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी आता फक्त ९० दिवस शिल्लक आहेत. आळस झटकून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे. भाजपने नोटबंदी, जीएसटी लागू करून लोकांचे आर्थिक नुकसान केले. इतरही चुकीच्या गोष्टी केल्या. त्याची माहिती प्रत्येक मतदाराला देण्याचे काम कार्यकर्त्याने करावे. राज्यात महाविकास आघाडीचे काम योग्य पद्धतीने सुरू असून, शरद पवार यांच्यानंतर राज्यासाठी काम करणारा नेता कुणी असेल तर तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. येत्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आघाडी होईल, असा विश्वास व्यक्त करून आव्हाड म्हणाले, कदाचित एकनाथ शिंदे यांनाही तसेच वाटत असेल. आमच्यात काही गोष्टींवरून जरी वाद होत असले तरी ते तात्पुरते असल्याने आघाडी निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ओबीसी आरक्षण कोण रोखतंय.. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही लढा सुरू ठेवला असून, तो सुरूच राहणार आहे. राज्यात आरक्षणाची अंमलबजावणी शरद पवार यांनी केली. ओबीसी आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात कोण जात आहेत हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्ष भाजपवर निशाणा साधला.

केवळ सोशल मीडियाने निवडणूक जिंकता येत नाहीराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आव्हाड यांनी कान टोचले. केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून निवडणुका जिंकता येत नाहीत. मतदार नोंदणी, घराघरांत जाऊन संपर्क यावर भर द्यावाच लागेल. आपण नगरसेवक नाही, म्हणून वॉर्डातील कामे करण्याचे टाळू नका. निवडणुकीत पडलो म्हणून पुढील पाच वर्षे वॉर्डात कामच करायचे नाही, असे चालणार नाही, असे ते म्हणाले.

राऊतांनी घडवले माणुसकीचे दर्शन शरद पवार यांना बसण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी स्वत: खुर्ची उचलून दिल्यावरून भाजपची मंडळी टीका करीत आहेत. परंतु वडीलधाऱ्या माणसाला मदत करून राऊत यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. मात्र भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणी यांना उभे राहण्यासाठीदेखील जागा दिली जात नाही, ही त्यांची संस्कृती असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडElectionनिवडणूकthaneठाणे