शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

काही मंडळींकडून महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचा होतोय प्रयत्न : जितेंद्र आव्हाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 09:58 IST

पालिका, जि.प. निवडणुकीत सेनेसोबत आघाडीची तयारी.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे ९९ टक्के आघाडी करून लढतील, असा विश्वास व्यक्त करतानाच दोन्ही पक्षांतील काही विघ्नसंतोषी मंडळी महाविकास आघाडीच्या दुधात मिठाचा खडा टाकत असल्याचा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. आव्हाड यांनी नवी मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेवर टीका करताना स्थानिक नेतृत्वावर टीका केली होती. त्यामुळे आव्हाड यांनी नामोल्लेख केला नसल्याने त्यांचा रोख कुणाकडे याबाबत तर्कवितर्क सुरू झाले.राष्ट्रवादी काँग्रेसचा वैचारिक शत्रू भाजप असल्याने त्या पक्षाला पराभूत करण्यासाठी आपल्याला दोन पावले मागे यावे लागले तरी चालेल. परंतु आघाडी करावीच लागेल, असे सांगून आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना तडजोडीला तयार राहण्यास सांगितले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी ठाण्यात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ या कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आव्हाड बोलत होते. आव्हाड म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी आता फक्त ९० दिवस शिल्लक आहेत. आळस झटकून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे. भाजपने नोटबंदी, जीएसटी लागू करून लोकांचे आर्थिक नुकसान केले. इतरही चुकीच्या गोष्टी केल्या. त्याची माहिती प्रत्येक मतदाराला देण्याचे काम कार्यकर्त्याने करावे. राज्यात महाविकास आघाडीचे काम योग्य पद्धतीने सुरू असून, शरद पवार यांच्यानंतर राज्यासाठी काम करणारा नेता कुणी असेल तर तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. येत्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आघाडी होईल, असा विश्वास व्यक्त करून आव्हाड म्हणाले, कदाचित एकनाथ शिंदे यांनाही तसेच वाटत असेल. आमच्यात काही गोष्टींवरून जरी वाद होत असले तरी ते तात्पुरते असल्याने आघाडी निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ओबीसी आरक्षण कोण रोखतंय.. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही लढा सुरू ठेवला असून, तो सुरूच राहणार आहे. राज्यात आरक्षणाची अंमलबजावणी शरद पवार यांनी केली. ओबीसी आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात कोण जात आहेत हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्ष भाजपवर निशाणा साधला.

केवळ सोशल मीडियाने निवडणूक जिंकता येत नाहीराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आव्हाड यांनी कान टोचले. केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून निवडणुका जिंकता येत नाहीत. मतदार नोंदणी, घराघरांत जाऊन संपर्क यावर भर द्यावाच लागेल. आपण नगरसेवक नाही, म्हणून वॉर्डातील कामे करण्याचे टाळू नका. निवडणुकीत पडलो म्हणून पुढील पाच वर्षे वॉर्डात कामच करायचे नाही, असे चालणार नाही, असे ते म्हणाले.

राऊतांनी घडवले माणुसकीचे दर्शन शरद पवार यांना बसण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी स्वत: खुर्ची उचलून दिल्यावरून भाजपची मंडळी टीका करीत आहेत. परंतु वडीलधाऱ्या माणसाला मदत करून राऊत यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. मात्र भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणी यांना उभे राहण्यासाठीदेखील जागा दिली जात नाही, ही त्यांची संस्कृती असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडElectionनिवडणूकthaneठाणे